Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साेलापूरमध्ये मतदान न करताच नागरिकांना परतावं लागलं, शेकडो तक्रारींची आता होणार चौकशी

मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले, पण मतदार यादी सदोष करता आली नाही. मतदानादिवशी मतदार याद्यांमध्ये प्रचंड चुका पाहायला मिळाल्या. अनेकांची नावे जिवंत असतानाही मयत म्हणून होती.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 09, 2024 | 11:38 AM
साेलापूरमध्ये मतदान न करताच नागरिकांना परतावं लागलं, शेकडो तक्रारींची आता होणार चौकशी
Follow Us
Close
Follow Us:
सोलापूर : मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले, पण मतदार यादी सदोष करता आली नाही. मतदानादिवशी मतदार याद्यांमध्ये प्रचंड चुका पाहायला मिळाल्या. अनेकांची नावे जिवंत असतानाही मयत म्हणून होती. दुसरीकडे अनेकांकडे मतदान कार्ड होते, पण मतदार यादीत नावेच नव्हती. अनेकांच्या नावातील बदलामुळे त्यांना मतदान करता आले नाही. आता या सर्व तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी होऊन मतदार यादीत दुरुस्ती केली जाणार आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात २० लाख ३० हजार ११९ तर माढा लोकसभा मतदारसंघात १९ लाख ९१ हजार ४५४ मतदारांची नोंदणी झाली होती. यंदा किमान ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होईल, असा विश्वास प्रशासनाला होता. गावोगावी मतदारांमध्ये जागृती करण्यात आली. मतदानावर बहिष्कार घातलेल्या गावांमध्येही मतदान झाले. मात्र, मतदानासाठी केंद्रावर आलेल्यांना रिकाम्या पावलानं मतदान न करताच परतावे लागले. त्यासंदर्भात संबंधित तालुक्याच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे व थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील तक्रार प्राप्त झाल्या आहेत.
मतदार यादीतील गंभीर बाबी म्हणजे जिवंत मतदारांची नावे मयत म्हणून यादीत होती. तर मयत व्यक्ती जिवंत आहेत म्हणून त्यांच्या नोंदी होत्या. अनेकांनी मागील निवडणुकांमध्ये नियमित मतदान केलेले असतानाही त्यांची नावे यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या यादीत सापडलीच नाहीत. या गंभीर तक्रारींची आता पडताळणी होणार आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनीही तक्रारींच्या अनुषंगाने पडताळणी होईल, त्यात कोणत्या बीएलओंची चूक असल्यास त्यांच्यावर कारवाई होईल, असे स्पष्ट केले.
[blockquote content=”बीएलओंच्या माध्यमातून मतदार यादीचे शुद्धीकरण करण्यात आले. त्यात स्थलांतर केलेले, मयत झालेले व मूळ त्या पत्त्यावर राहात नसलेले मतदार कमी झाले. पण, मतदार यादीत नाव नाही किंवा जिवंत असूनही मयतमध्ये नाव असल्यासंदर्भातील तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याअनुषंगाने त्या तक्रारींची पडताळणी केली जाईल.” pic=”” name=”- गणेश निऱ्हाळी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर”]
मतदार यादीतील नेमकी चूक कोणाची?
जिल्ह्यातील तीन हजार ५९९ बीलओंच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीची मतदार यादी अंतिम करण्यात आली. बीएलओंनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन मयत मतदारांची नावे कमी केल्याचा दावा प्रशासनाने यापूर्वी केला होता. दुबार मतदारांची नावे देखील काढून टाकल्याचे सांगण्यात आले. परंतु, मतदानावेळी हा दावा फोल ठरल्याचे पाहायला मिळाले. काहींची नावे चुकून डिलीट झाली तर काहींची नावे स्थलांतरित म्हणून यादीत नव्हती. यात आता नेमकी चूक बीएलओंची की माहिती देणाऱ्या मतदारांची हे तक्रारींच्या चौकशीतून समोर येणार आहे.

Web Title: Hundreds of complaints will be investigated voters had to return without voting in sollapur nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2024 | 11:38 AM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Election
  • maharashtra
  • praniti shinde

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
1

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण
2

Delhi Blast : कॉंग्रेसचे नेते बरळले! थेट केली दिल्ली दहशतवादी हल्ला करणाऱ्या डॉ. उमरची पाठराखण

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
3

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा
4

Supreme Court: चेक बाउन्स प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल! व्यापारी कर्मचारींसह सामान्य नागरिकांनी दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.