Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी जूनपासून; पहिलीत नवा अभ्यासक्रम, रचनेतच झाला बदल

नवीन शैक्षणिक धोरणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शिक्षणाची पूर्वीची प्राथमिक आणि माध्यमिक अशी रचना आता चार स्तरांमध्ये विभागली जाणार आहे. यात पायाभूत, पूर्वतयारी, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक हे टप्पे वयोगटानुसार ठरवले गेले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 25, 2025 | 07:07 AM
होन्याळीच्या प्राथमिक शाळेत पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या घरफाळा माफीचा निर्णय

होन्याळीच्या प्राथमिक शाळेत पहिलीत प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या घरफाळा माफीचा निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची अंमलबजावणी शालेय शिक्षणात यावर्षीपासून प्रत्यक्षात सुरू होत आहे. शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, येणाऱ्या जून 2025 पासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. हा निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने जाहीर केला असून, शिक्षणाच्या पद्धतीत आणि रचनेत मोठा बदल अपेक्षित आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शिक्षणाची पूर्वीची प्राथमिक आणि माध्यमिक अशी रचना आता चार स्तरांमध्ये विभागली जाणार आहे. यात पायाभूत, पूर्वतयारी, पूर्व माध्यमिक आणि माध्यमिक हे टप्पे वयोगटानुसार ठरवले गेले असून, मुलांच्या मानसिक आणि शैक्षणिक गरजेनुसार अभ्यासक्रम आखण्यात आले आहेत. यामध्ये 2025-26 मध्ये पहिलीसाठी नव्या अभ्यासक्रमाची सुरुवात, 2026-27 मध्ये दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचे नवे अभ्यासक्रम, 2027-28 मध्ये पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीतील बदल, 2028-29 मध्ये आठवी, दहावी आणि बारावीचे अभ्यासक्रम नव्याने रचले जातील. या धोरणानुसार मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी पहिलीतूनच हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य करण्यात आले आहे.

अभ्यासक्रमाच्या रचनेतील बदल नेमके काय?

या नवीन शिक्षणपद्धतीत एनसीईआरटीच्या धर्तीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने नव्या अभ्यासक्रमाची रूपरेषा तयार केली आहे. त्यामुळे शालेय अभ्यासक्रम अधिक समग्र. मूल्यमापनाधिष्ठित व कौशल्याधारित होणार आहे. शाळांचे वेळापत्रक, विषयांचे नियोजन, मूल्यांकन पद्धती आणि परीक्षा वेळापत्रकातही आवश्यक त्या सुधारणा करण्यात येणार आहेत. संपूर्ण शैक्षणिक वर्षाचे नियोजनच्या मार्गदर्शनाखाली केले जाईल आणि शाळांना हे नियोजन जूनपूर्वी उपलब्ध करून दिले जाईल.

विद्यार्थ्यांना उपस्थिती अनिवार्य

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी यापूर्वीच महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. हा निर्णय लागूही करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम नव्हता. मात्र, मार्च 2023 मधील परीक्षांसाठी विद्यार्थ्यांची 75 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. यासंदर्भात सर्व शाळा आणि ज्युनिअर कॉलेजांना आदेशही देण्यात आले होते.

Web Title: Implementation of new education policy from june

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 06:59 AM

Topics:  

  • Education System In India
  • Maharashtra Education
  • School Education

संबंधित बातम्या

राज्यातील तब्बल ‘इतक्या’ शिक्षकांची प्रक्रिया अजूनही अपूर्णच तर 33572 शिक्षक प्रशिक्षणादरम्यान उत्तीर्ण
1

राज्यातील तब्बल ‘इतक्या’ शिक्षकांची प्रक्रिया अजूनही अपूर्णच तर 33572 शिक्षक प्रशिक्षणादरम्यान उत्तीर्ण

संचमान्यता केली जाणार जुन्याच नियमानुसार; शालेय शिक्षण विभागाने घेतली पुन्हा एकदा माघार
2

संचमान्यता केली जाणार जुन्याच नियमानुसार; शालेय शिक्षण विभागाने घेतली पुन्हा एकदा माघार

राज्यातील जिल्हा परिषद शाळांचे रुपडं पालटणार; शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी प्लॅनच सांगितला…
3

राज्यातील जिल्हा परिषद शाळांचे रुपडं पालटणार; शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी प्लॅनच सांगितला…

राज्यातील शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येणार? ‘हे’ कारण ठरतंय चर्चेचं
4

राज्यातील शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात येणार? ‘हे’ कारण ठरतंय चर्चेचं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.