Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News : शहरात तापमानाचा पार चढतोय; होळीपर्यंत तापमान 40 अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता

दिवसाचे कमाल तापमान सुमारे 38 अंश तर रात्री यात 24 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण होऊन किमान तापमान 14 पर्यंत नोंदवले जात आहे. त्यामुळे काही तासांमध्येच तापमानाच्या मोठ्या फरकाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 09, 2025 | 11:53 AM
राज्यात उन्हाचा कडाका वाढला; अकोल्यात तापमानाचा पारा 43.5 अंशांवर तर मुंबईत...

राज्यात उन्हाचा कडाका वाढला; अकोल्यात तापमानाचा पारा 43.5 अंशांवर तर मुंबईत...

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : शहरात सकाळी थंडी व दिवसा कडक उन्ह असे चित्र वातावरण असले तरी कमाल तापमानात सतत वाढ होत आहे. त्यामुळे होळीपर्यंत शहराचा पारा 40 अंश सेल्सिअस ओलांडण्याची शक्यता आहे. सध्या शहरातील हवामानात बदल होताना दिसत आहे. रात्री उशिरापासून सकाळी 8-9 वाजेपर्यंत थंड वातावरण असते. त्यामुळे दुचाकी चालकांना रात्रीच्या वेळी उबदार कपडे तर दिवसा सनकोटचा वापर करावा लागत आहे.

दिवसाचे कमाल तापमान सुमारे 38 अंश तर रात्री यात 24 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण होऊन किमान तापमान 14 पर्यंत नोंदवले जात आहे. त्यामुळे काही तासांमध्येच तापमानाच्या मोठ्या फरकाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. दुपारी कूलर किंवा एसीचा वापर करावा लागत आहे तर रात्री साधा पंखा पुरेसा ठरत आहे. शनिवारी शहराचे कमाल तापमान 38 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. परंतु, किमान तापमान 14.8 अंश सेल्सिअस होते.

दिवसा चटके, सकाळी थंडावा

12 मार्चपासूनच शहराचे तापमान 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विभागाच्या अंदाजानुसार, 14 मार्चपर्यंत शहराचे कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. पारा 40 च्या पुढेही जाऊ शकतो. किमान तापमानही 17 ते 19 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

कमाल तापमान 35 ते 39 अंश सेल्सिअस

शनिवारी, विदर्भातील कमाल तापमान 35 ते 39 अंश सेल्सिअस दरम्यान होते. अकोला हे सर्वात उष्ण होते. येथे 39.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. ब्रह्मपुरीचे कमाल तापमान 38.7 अंश सेल्सिअस होते.

तापमानवाढीचा दिला होता इशारा

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात पूर्वेकडून येणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे, गुरुवारपासून मुंबईसह आसपारच्या परिसरात तापमानात वाढ होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. ही स्थिती आठवडाभर टिकून राहू शकते. अरबी समुद्रात उच्च दाब असल्याने समुद्रावरून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग मंद राहील, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: In nagpur temperatures likely to reach 40 degrees celsius by holi nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 09, 2025 | 11:53 AM

Topics:  

  • Climate Change
  • Increase in Temperature
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Nagpur News  : नागपूरात परवानगीविना चालवल्या अल्पसंख्यांक शाळांवर गुन्हा दाखल
1

Nagpur News : नागपूरात परवानगीविना चालवल्या अल्पसंख्यांक शाळांवर गुन्हा दाखल

शेती आणि संस्कृती फुलवणारा ‘होलोसीन’ काळ संपतोय? पृथ्वी आता विनाशाच्या उंबरठ्यावर
2

शेती आणि संस्कृती फुलवणारा ‘होलोसीन’ काळ संपतोय? पृथ्वी आता विनाशाच्या उंबरठ्यावर

राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; 2 एप्रिलपर्यंत…
3

राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; 2 एप्रिलपर्यंत…

अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका; आधीच मजुरांची टंचाई अन् आता पाऊस
4

अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादकांना मोठा फटका; आधीच मजुरांची टंचाई अन् आता पाऊस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.