Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News: कर भरूनही नशिबी नरकयातना! उत्तर नागपुरात धुरामुळे मुलांच्या आरोग्याशी खेळ; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष

अनेक वर्षांपासून २० ते २५ विटभट्ट्या सुरू आहेत, ज्या आता नागरिकाच्या आरोग्यासाठी धोका बनल्या आहेत. दररोज भट्टधा पेटवल्या जातात, त्यातून निघणारा दाट घूर संपूर्ण परिसरात पसरतो आणि बेट घरांमध्ये शिरतो.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 14, 2026 | 10:58 AM
Nagpur News: कर भरूनही नशिबी नरकयातना! उत्तर नागपुरात धुरामुळे मुलांच्या आरोग्याशी खेळ; प्रशासनाचे मात्र दुर्लक्ष
Follow Us
Close
Follow Us:
  • शुद्धोधननगर, सम्राटनगर, समतानगर आणि मंगलमूर्ती ले-आऊट हे २० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित
  • सांडपाणी लाईन नसल्यामुळे घाण पाणी वस्त्यांमध्ये साचून राहते
  • अनेक वर्षांपासून २० ते २५ विटभट्ट्या सुरू
Nagpur News: उत्तर नागपूरच्या प्रभाग क्रमांक २ अंतर्गत येणारे राजा शुद्धोधननगर, सम्राटनगर, समतानगर आणि मंगलमूर्ती ले-आऊट हे २० वर्षांपासून मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. एकीकडे नागपूर शहर विकासाची गती पकडत असताना या भागांत आजतागायत पक्के रस्ते आणि सांडपाणी व्यवस्था पोहोचलेली नाही. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की ते नियमितपणे महानगरपालिकेला पूर्ण कर भरतात. तरीही त्यांना मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. रस्ता ही मूलभूत गरजदेखील नागरिकांना स्वतःच्या खर्चान पूर्ण करावी लागली. परंतु तो रस्ताही तात्पुरताच ठरला आहे.

सांडपाणी लाईन नसल्यामुळे घाण पाणी वस्त्यांमध्ये साचून राहते, त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका कायम असतो. पावसाळ्यात परिस्थिती आणखी भीषण होते. संपूर्ण परिसर गुडघ्यापर्यंत पाण्यात बुडतो, त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना बाहेर पडणे कठीण होते. अनेक वेळा मुलांना ४-४ दिवस शाळेत जाता येत नाही. नागरिकांनी आशीनगर झोन कार्यालयात अनेक वेळा लेखी तक्रारी दिल्या, आंदोलनेही केली; परंतु आजतागायत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. मनपा प्रशासनाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

Devendra Fadnavis in Delhi: फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचा ‘सस्पेन्स’: केवळ सदिच्छा भेट की महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भुकंपाची

नावापुरते उद्यानः एनआयटीने लहान मुले आणि ज्येष्ठांसाठी तयार केलेले उद्यान आज दुरवस्थेला सामोरे जात आहे. बांधकामानंतर त्याच्या देखभालीकडे कोणतेही लक्ष दिले गेले नाही. हिरवळ नाहीशी झाली आहे आणि चसण्याची व्यवस्था अत्यल्प आहे. दुर्लक्षामुळे हे उद्यान वापरासाठी नसून केवळ दिखाऊ ठिकाण बनले आहे. नागरिकांनी उद्यानाच्या दुरुस्ती व नियमित देखभालीची मागणी केली आहे.

विटभट्ट्या ठरताहेत आरोग्यासाठी घातक

अनेक वर्षांपासून २० ते २५ विटभट्ट्या सुरू आहेत, ज्या आता नागरिकाच्या आरोग्यासाठी धोका बनल्या आहेत. दररोज भट्टधा पेटवल्या जातात, त्यातून निघणारा दाट घूर संपूर्ण परिसरात पसरतो आणि बेट घरांमध्ये शिरतो. या विषारी धुराचा सवांधिक परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांवर होत आहे. मुलांना वर्षभर सदी, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशा तक्रारी सतत असतात, तर ज्येष्ठांचे जुने आजार अधिवक गंभीर होत आहेत, अनेक कुटुंबांचे म्हणणे आहे की धुरामुळे रात्री श्वास घेणेही कठीण होते. वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण विभाग आणि मनपा प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. नियमांच्या विरोधात निवासी भागात सुरू असलेल्या या विटभट्टचा केवळ पर्यावरणालाच हानी पोहोचवत नाहीत, तर येणाऱ्या पिढीच्या आरोग्याशीही खेळ करत आहेत.

खलिस्तानी दहशतवादी पन्नू हत्येचा कट उघड; भारतीय नागरिक Nikhil Gupta ने दिली गुन्ह्याची कबुली

२० वर्षे टँकरवर भागवली तहान

66 या भागात अनेक वर्षे पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. नागरिकांनी १५ ते २० वर्षे टैंकस्वर अवलंबून राहून तहान भागवली. आता जाऊन सुमारे वर्षेभरापूर्वी पाइपलाइन टाकून नळजोडणी देण्यात आली आहे.- अर्चना भिमटे, स्थानिक नागरिक

सांडपाणी लाईन नाही, घाणीचा साठा

सांडपाणी व्यवस्थेअभावी पाण त्यामुळे मलेरिया, हेग्यू सारख्या आजाराचा धोका कायम असतो. संपूर्ण परिसरात हीच स्थिती आहे. एखादा अधिकारी किया जनप्रतिनिधी येथे येऊन नागरिकांच्या समस्या ऐकेल, अशी अपेक्षाही नाही. निवडणुकीच्या देळी चेहरे दाखवतात, पण निवडणूक झाल्यानंतर दर्शनही देत नाहीत. – नलिनी वानखेडे, स्थानिक नागरिक

Maharashtra Crime: गोंदियाची तरुणी प्रियकराला भेटायला मध्यप्रदेशात गेली आणि…; मृतदेह थेट सेप्टिक

दरवर्षी पावसाळा ठरतो संकट

66 पक्क्या रस्त्याचा आणि जलनिस्सारण व्यवस्थेचा अभाव असल्याने पावसाळ्यात मुडघ्यापर्यंत पाणी साचते, महिला आणि मुलांना घराबाहेर पडणे कठीण होते, साथ-विव यांचाही धोका असतो. आजारपणाची – रोशनी साहू स्थानिक नागरिक

तक्रारी आणि आंदोलने, तरीही कारवाई शून्य

८ स्थानिक नागरिकांनी अनेकदा मनपा प्रशासनाकडे तक्रारी केल्या, आदोलने केली, तरीही कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. आम्हाला जनप्रतिनिधी आणि प्रशासनाने अक्षरश वान्यावर सोडले आहे. – हीरावती भगत, स्थानिक नागरिक

Web Title: Smoke in north nagpur is playing havoc with childrens health however the administration is indifferent

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 10:58 AM

Topics:  

  • Marathi News
  • Nagpur
  • Nagpur News

संबंधित बातम्या

Ch. Sambhajinagar : ‘महाशिवरात्रीनिमित्त महास्वच्छता अभियान’ ; 2 हजार नागरिकांनी वेरूळ केले चकाचक !
1

Ch. Sambhajinagar : ‘महाशिवरात्रीनिमित्त महास्वच्छता अभियान’ ; 2 हजार नागरिकांनी वेरूळ केले चकाचक !

Maharashtra Politics: कॅबिनेट मंत्र्याचे कार्यालय सील होण्याची पहिलीच घटना! नरहरी झिरवाळ ‘नॉटरिचेबल’ झाल्याने संशय वाढला
2

Maharashtra Politics: कॅबिनेट मंत्र्याचे कार्यालय सील होण्याची पहिलीच घटना! नरहरी झिरवाळ ‘नॉटरिचेबल’ झाल्याने संशय वाढला

Sangali News: तासगावच्या रंगभूमीवर आजपासून रंगणार ‘आबां’चा स्मृती जागर; राज्यभरातील २० संघांचा अभिनयाचा महासंग्राम
3

Sangali News: तासगावच्या रंगभूमीवर आजपासून रंगणार ‘आबां’चा स्मृती जागर; राज्यभरातील २० संघांचा अभिनयाचा महासंग्राम

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!
4

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.