Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jitendra Awhad : “खून हा खून असतो अन् खुनाला माफी नाही…”, सुरेश धसांवर बरसले जितेंद्र आव्हाड

परभणीतून निघालेल्या लॉंग मार्चवरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून आता सुरेश धस यांच्यावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निशाणा साधला आहे. नेमकं काय म्हणाले जितेंद्र आव्हाड...

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 10, 2025 | 03:53 PM
Ncp jitendra awhad target mahayuti over ed office fire and pahalgam terror attack

Ncp jitendra awhad target mahayuti over ed office fire and pahalgam terror attack

Follow Us
Close
Follow Us:

Jitendra Awhad On Suresh Dhas: परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात पोलीस आणि आंदोलकांमध्ये मध्यस्थी केल्याबद्दल भाजप आमदार सुरेश धस यांच्याविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. ” एवढेच जर आपल्यामध्ये माफीची भावना असेल तर कृपया हिमालयात जाऊन साधूसंत व्हावे आणि वाल्मिकी कराडलाही माफ करावे, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदार धस यांच्यावर निशाणा साधला आहे.

सुरेश धस यांच्यावर टीका करताना जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, ल्या तीन महिन्यांमध्ये महाराष्ट्रात तीन मोठी प्रकरण झाली. एक अक्षय शिंदे प्रकरणात कोर्टाने मत नोंदवलं. सोमनाथ सूर्यवंशींची हत्या झाली. संतोष देशमुख यांची हत्या झाली. माझ्या दृष्टीने हे तीन खून आहे. यातील तीन खूनात ज्याने कोणी खून केला आहे, ते कोणीही असो त्यांना ती योग्य ते शिक्षा झाली पाहिजे. परभणी मध्ये कोणीच बोलायला तयार नाही, काही निवडक लोकच परभणी विषयी बोलतात. सोमनाथ सूर्यवंशी माणूस नाही का? त्याला आई नव्हती? पोटचा गोळा हरवल्याने त्याच्या आईला दुःख नसेल. त्या आईने सांगितलं की, तुमच्या सरकारचे दहा लाख रुपये नको… माझा मला पोरगा परत द्या.. सरकारने कधी गांभीर्याने घेतलं सोमनाथ सूर्यवंशीला? अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

मुंबईत टाटांच्या आणखी एका नव्या हॉटेलचे भूमीपूजन; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

तसेच किंबहुना विधानसभेमध्ये उत्तर द्यायला लागलं तो श्वासो श्वासाच्या त्रासामुळे मेला आहे. खरा सोमनाथ सूर्यवंशी त्याला मारण्यात आलं. तसा पोस्टमार्टम रिपोर्ट आहे. तो बेदम मारहाणीत बसलेल्या धक्क्यामुळे मेला असणार. अच्छा कुठे गेला सांगायला तयार नाही. तो मेला आहे, तो कारागृहात मेला आहे. तो पोलीस लॉकअप मध्ये मिळालेला नाही. मग तो कसा मेला? किती वाजता मेला? त्याला औषध कधी दिलं? त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं कधी? कुठली उत्तर सरकार द्यायला तयार नाही,असा सवाल यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला.

तसेच काही समविचारी संघटना आंबेडकरवादी संघटना यांनी लाँग मार्च काढला. परभणी ते नाशिक ते पाई ४०० किलोमीटर चालत आले. सरकारला तोपर्यंत जाग आली नाही. काल नाशिक मध्ये त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला. मग सरकारने त्यांना खोटे नाटे आश्वासन दिले. परदेशी शिखर परदेशी नावाचे ऑफिसर आहे. त्यांच्या सहीने ते एवढे दिवस काय करत होतात, सोमनाथ सूर्यवंशीला मरून आज जवळजवळ अडीच महिने व्हायला आलेत. हे सरकार झोपलो होतो का? या सरकारला छोट्या समाजाबद्दल काही वाटत नाही का? तो काय अशिक्षित पोरगा होता का? तो लॉ चां विद्यार्थी, कट्टर आंबेडकरवादी होता. मी कोरोना मध्ये आजारी होतो. तो माझा ओळखीचा नाही पाळखीचा नाही. मी गंभीर रित्या आजारी आणि माझी वाचण्याची क्षमता कमी आहे. तेव्हा त्या सोमनाथ सूर्यवंशीने ट्विट केलं होतं. फेसबुक वर लिहिलं होतं. जितेंद्र आव्हाड लढवय्या योद्धा आहे. हा लढवय्या कार्यकर्ता आहे.हा सोमनाथ सूर्यवंशी माझा विचारांनी भाऊ लागतो. त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नव्हतं.

आज जेव्हा मुंबईकडे जी काही कूच होणार आहे, त्यामुळे सरकारने काही उद्योग केले. काहीतरी लिहून दिलेलं आहे. माझ्याकडे पत्र देखील आहे. आज कसं काय सस्पेंड करतात लोकांना? आधी का नाही केलं? अधिकारी गुन्हेगार नव्हते हे प्रकरण दडपण्यासाठी म्हणून सरकार दलाचा हस्तक हस्तकांचा उपयोग करताय. आम्ही हे प्रकरण दाबून देणार नाही. कोणी केला लाठी चार्ज? कोणी केलं कोंबिंग ऑपरेशन? त्याची काही उत्तर नाही द्यायची, जे आयपीएस ऑफिसर जबाबदार आहे. ज्यांनी लाठीचार्ज चा हुकूम काढला ते दोशी नाही. चार हवालदारांना काढलं तर काम संपल असल्याचे यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

अक्षय शिंदे मागासवर्गीय यांचा त्याला न्याय नाही देणार. कोर्टात त्याच्या आईवडिलांना सांगायला लावतात की, आम्हाला खटला नाही चालवायचा, हे कुठल्या लेवलला चालला आहे. हिंदी पिक्चरचा डायलॉग आठवेल लोकांना. गरीबो की जान जान नही होती. आम्ही लढू अक्षय शिंदे, सोमनाथ सूर्यवंशी, संतोष देशमुख साठी देखील लढू. खून खून आहे. आणि ते कोणाचाही असो. जे कोणी खून करतो त्याला सजा झालीच पाहिजे. तुम्ही शोधा तिथे कोण गेलं होतं? ते एवढे दिवस कुठे गेले होते? आधी का नाही गेले? ते असं कसं बोलू शकतात हे माफ करा. माफ करा अरे वा! हे साधू संतांची अवलाद आहे. खुण्याला माफ करा. सेकंड इयर मध्ये लॉ करणारा विद्यार्थी जातो. आपण माफ करून टाकायचं अरे वा! माफ करा असं कोणी घरातला मेला तर माफ करणार का , बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानुसार न्याय समान असतो, असं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं आहे.

Pune Crime : कारचालकाला लुटणाऱ्या दोघांना सापळा रचून पकडले; पुणे पोलीसांची मोठी कारवाई

Web Title: Jitendra awhad on suresh dhas news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2025 | 03:53 PM

Topics:  

  • Jitendra Awhad
  • Parbhani
  • Suresh Dhas

संबंधित बातम्या

Parbhani Crime News: ओबीसी आरक्षण गमावल्याच्या भीतीने २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या; चार बहिणींचा एकुलता एक भाऊ
1

Parbhani Crime News: ओबीसी आरक्षण गमावल्याच्या भीतीने २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या; चार बहिणींचा एकुलता एक भाऊ

Thane News : “दसऱ्यापर्यंत पाणी टंचाई दूर न केल्यास आयुक्तांना…”, जितेंद्र आव्हाडांचा इशारा
2

Thane News : “दसऱ्यापर्यंत पाणी टंचाई दूर न केल्यास आयुक्तांना…”, जितेंद्र आव्हाडांचा इशारा

परभणीत भीषण अपघात, भरधाव ट्रक थेट झाडावर आदळला, अपघातात चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू
3

परभणीत भीषण अपघात, भरधाव ट्रक थेट झाडावर आदळला, अपघातात चालक आणि क्लिनरचा जागीच मृत्यू

जातीपातीच्या राजकारणामुळे शरद जोशी, बाबासाहेब आंबेडकर पराभूत – बच्चू कडू
4

जातीपातीच्या राजकारणामुळे शरद जोशी, बाबासाहेब आंबेडकर पराभूत – बच्चू कडू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.