
या बैठकीत ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, सांगली मनपा आयुक्त सत्यम गांधी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, निवासी गजानन गुरव उपजिल्हाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. ३ विभागाच्या समन्वयातून प्रकल्प कार्यान्वित होणा
नगरविकास, जलसंपदा व आपती विभागाच्या समन्वयातून हा प्रकल्प आगामी २ ते ३ वर्षात कार्यान्वि होईल, असा आशावादही या बैठकीत व्यक्त करण्यात आला. यावेळी मित्राचे तांत्रिक संचालक विन कुलकर्णी, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता स्मिता माने, मना जल अभियंता हर्षजित घाटगे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह सांगल कोल्हापूर, इचलकरंजी महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सांगली, इचलकरंजी व कोल्हापूर समन्वय
आ.क्षीरसागर म्हणाले, संबंधित जिल्ह्यात नदीच्या पुराचे पाणी शहरात येऊ नये यासाठी जलसंपदा विभागाने सांगली, इचलकरंजी व कोल्हापूर शहराशी समन्वय साधून उपाययोजना कराव्यात, यासाठी आवश्यक तो निधी मित्रा संस्थेमार्फत देण्यात येईल. उल्लेखित शहरांच्या ठिकाणी जास्त लांबीचे जे नाले आहेत. या नाल्याच्या सभोवतालचा परिसर कसा विकसीत करता येईल, त्याचबरोबर या ठिकाणी विरंगुळा केंद्राची कशी उभारणी करता येईल याबाबतचा विचार या प्रकल्पामध्ये करावा.
बाधित नागरी वस्तीबाबत पीपीटीद्वारे केले सादरीकरणतसेच शहरातील मुख्य नद्यांच्या सुधारणेसह दुय्यम व तृतीय स्तरावरील नाले यांचाही विचार पूर नियंत्रणासाठी करावा, अशी सूचनाही त्यांनी केली. तसेच क्षीरसागर यांनी सांगली, इचलकरंजी व कोल्हापूर शहरातील किती नाले पूरबाधित आहेत, याचा सविस्तर आढावा संबंधित अधिकाऱ्याकडून जाणून घेतला. यावेळी वरील शहरातील नागरी वस्तीमध्ये किती नाल्यांमुळे मानवी जीवन प्रभावीत होते याचे पीपीटीद्वारे सादरीकरण करण्यात आले.