Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापूर-सांगली जिल्हा पूरसमस्येपासून होणार मुक्त; काढण्यात आला ‘हा’ पर्याय

कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला 2019 साली महापुराने प्रचंड नुकसान केले होते. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांना महापुराचा फटका दरवर्षी सहन करावा लागत होता. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 11, 2025 | 11:46 AM
कोल्हापूर-सांगली जिल्हा पूरसमस्येपासून होणार मुक्त; काढण्यात आला 'हा' तोडगा

कोल्हापूर-सांगली जिल्हा पूरसमस्येपासून होणार मुक्त; काढण्यात आला 'हा' तोडगा

Follow Us
Close
Follow Us:

इचलकरंजी : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात दरवर्षी भेडसावणाऱ्या पूर परिस्थितीमुळे हजारो हेक्टर जमीन पुराच्या पाण्याखाली जात होती. नागरी वस्तीत पाणी शिरत असल्याने कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान होत होते. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून सरकारने पर्याय काढला आहे. आता दोन्ही जिल्हे पूरसमस्येतून मुक्त होणार आहेत.

जागतिक बँकेच्या अर्थ सहाय्यातून हा महत्वपूर्ण प्रकल्प राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केली. राज्य सरकारने सांगली व कोल्हापूर या दोन जिल्ह्यासाठी जागतिक बँकेच्या सहकार्याने 3 हजार 200 कोटींचा प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले आहे. यामुळे भविष्यात दोन्ही जिल्हे महापुरापासून मुक्त होऊ शकतात.

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प 2025-26 मध्ये राज्याच्या पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास आणि सामाजिक कल्याणासाठी विविध महत्त्वपूर्ण उपक्रम जाहीर करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूरसाठी पूरप्रतिबंधक आणि जलव्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. मात्र, यासाठी जागतिक बँकेची मदत घेतली जाणार आहे.

3200 कोटींचा प्रकल्प घेतला हाती

महाराष्ट्र प्रतिसाद विकास कार्यक्रम अंतर्गत जागतिक बँकेच्या मदतीने 3 हजार 200 कोटींचा हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. याचा सांगली, कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांना फायदा होणार आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांमध्ये वारंवार होणाऱ्या पुरांमुळे होणारे जीवित व आर्थिक नुकसान टाळण्यासाठी हा प्रकल्प राबवला जाईल. या अंतर्गत जास्तीचे पाणी कोरड्या भागात वळवले जाईल, जेणेकरून दुष्काळी भागांनाही त्याचा फायदा होईल, असे याचे नियोजन आहे.

17 हजार कोटींची करण्यात आली तरतूद 

या जिल्ह्यांना पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकास अंतर्गत केंद्रीय अर्थसंकल्प 2025 अंतर्गत महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा आणि औद्योगिक विकासासाठी देखील 17 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय कोल्हापूरसाठी नेमके कोणते प्रकल्प आहेत, याची सविस्तर माहिती अद्याप उपलब्ध झाली नाही. पण या निधीचा उपयोग संपूर्ण राज्यातील रस्ते, वाहतूक आणि उद्योग वाढीसाठी केला जाणार आहे, ज्याचा कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना देखील फायदा होईल.

अर्थसंकल्पावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका

राज्यातील महायुती सरकारने जाहीर केलेल्या या अर्थसंकल्पाचा विरोधकांनी खिल्ली उडविली आहे. केवळ घोषणाबाजी करून जनतेची फसवणूक करणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिली आहे. तर महायुतीने या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे.

दोन्ही जिल्ह्यांना दिलासा

कोल्हापूर व सांगली जिल्ह्याला 2019 साली महापुराने प्रचंड नुकसान केले होते. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांना महापुराचा फटका दरवर्षी सहन करावा लागत होता. यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत होती. याला राज्य सरकारने सकारात्मकता दाखवली होती. सरकारने जागतिक बँकेच्या मदतीने हा प्रकल्प राबवून दोन्ही जिल्ह्यांना महापुरापासून दिलासा देण्याचा प्रयत्न महायुती सरकारने केला आहे .या निर्णयाचे दोन्ही जिल्ह्यातून स्वागत होत आहे.

Web Title: Kolhapur sangli district will be free from flood problem nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2025 | 11:46 AM

Topics:  

  • Flood situation
  • kolhapur news
  • World Bank

संबंधित बातम्या

Kolhapur News : उन्हाच्या कडाक्यानंतर पावसाची दमदार बॅटींग; अवकाळी गारांमुळे कोल्हापूरकरांची उडाली दाणादाण
1

Kolhapur News : उन्हाच्या कडाक्यानंतर पावसाची दमदार बॅटींग; अवकाळी गारांमुळे कोल्हापूरकरांची उडाली दाणादाण

Kolhapur News : जोतिबा मंदिरातील ‘पुजारी हटाव’ मागणीसाठी महामोर्चा
2

Kolhapur News : जोतिबा मंदिरातील ‘पुजारी हटाव’ मागणीसाठी महामोर्चा

Kolhapur News : पश्चिम महाराष्ट्र जोरदार तापला! कोल्हापुरचा पारा थेट 36 अंशांवर; बाहेर पडाल तर घामाघूम व्हाल
3

Kolhapur News : पश्चिम महाराष्ट्र जोरदार तापला! कोल्हापुरचा पारा थेट 36 अंशांवर; बाहेर पडाल तर घामाघूम व्हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.