Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्मचारीच नसल्याने तासगाव विश्रामगृहाला टाळे लावण्याची वेळ; पाचपैकी तीन पदे रिक्तच

गेल्या दोन वर्षांपासून पाचपैकी तीन पदे रिक्त आहेत. कर्मचारी नसल्यामुळे बंद ठेवण्यात आलेले राज्यातील एकमेव विश्रामगृह असल्याचे बोलले जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 10, 2025 | 02:50 PM
कर्मचारीच नसल्याने तासगाव विश्रामगृहाला टाळे लावण्याची वेळ; पाचपैकी तीन पदे रिक्तच

कर्मचारीच नसल्याने तासगाव विश्रामगृहाला टाळे लावण्याची वेळ; पाचपैकी तीन पदे रिक्तच

Follow Us
Close
Follow Us:

तासगाव : तासगाव शहरातील बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृह कर्मचारी नाही म्हणून बंद करण्यात आले आहे. सदर विश्रामगृहसाठी मंजूर पाच कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंधापैकी तीन पदे रिक्त आहेत. तर एक कर्मचारी रजेवर गेला आहे. एका कर्मचाऱ्यावर विश्रामगृह चालू ठेवणे शक्य नाही म्हणून सदर विश्रामगृह बंद करण्यात आल्याची माहिती उपअभियंता आकाश हुद्दार यांनी दिली आहे.

तासगाव येथील विश्रामगृहासाठी एक चौकीदार, एक खानसमा, तीन कक्षसेवक आणि एक माळी/मैलमजूर असा पाच कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर आहे. यापैकी चौकीदार पद गेली अनेक वर्षे रिक्तच आहे. तर दोन वर्षांपूर्वी खानसामाची बदली झाल्यानंतर त्या ठिकाणी दुसरा खानसमा देण्यात आलेला नाही. तीन कक्षसेवकांपैकी दोन कक्षसेवक दोन वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यापासून ही दोन पदे रिक्तच आहेत.

एक कक्षसेवक आणि एक माळी अशा दोन कर्माचाऱ्यांच्या जीवावर विश्रामगृह चालू ठेवलेले होते. यापैकी एक कर्मचारी रजेवर गेला. उर्वरीत एका कर्मचाऱ्यांच्या जीवावर विश्रामगृह सुरू ठेवता येणे शक्य नसल्याने बंद करण्याचा निर्णय बांधकाम विभागाने घेतला आहे.

राज्यातील एकमेव विश्रामगृह

गेल्या दोन वर्षांपासून पाचपैकी तीन पदे रिक्त आहेत. कर्मचारी नसल्यामुळे बंद ठेवण्यात आलेले राज्यातील एकमेव विश्रामगृह असल्याचे बोलले जात आहे. देशात सर्वात तरुण आमदार म्हणून निवडून आलेल्या आमदार रोहित पाटील यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

अभिनेते भरत जाधव यांना बसला फटका

ज्येष्ठ सिने आणि नाट्य अभिनेते भरत जाधव येत्या 18 एप्रिल रोजी एका नाटकाच्या प्रयोगासाठी तासगाव शहरामध्ये येत आहेत. त्यांच्यासाठी शासकीय विश्रामगृह बुक करायला गेल्यानंतर सदर विश्रामगृह कर्मचाऱ्यांच्या अभावी बंद करण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, बांधकाम विभागाच्या या निर्णयाचा फटका अभिनेते भरत जाधव यांना बसला आहे. त्यांना विश्रामगृह देण्यास नकार देण्यात आला आहे.

Web Title: Lack of manpower in tasgaon rest house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2025 | 02:50 PM

Topics:  

  • sangli news
  • Tasgaon

संबंधित बातम्या

आगामी निवडणुकांसाठी सांगलीत भाजपची जोरदार तयारी; कार्यकारिणी केली जाहीर
1

आगामी निवडणुकांसाठी सांगलीत भाजपची जोरदार तयारी; कार्यकारिणी केली जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.