Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar News: अखेर संयम सुटला! नगर–मनमाड रस्त्यासाठी सामान्य नागरिकाकडून 600 कोटी रुपयांची कर्ज मागणी

अनेक वर्षांपासून अहिल्यानगर-मनमाड रोडची दुरावस्था अजूनच वाईट होत चालली आहे. अखेर, हा रोड बांधण्यासाठी एका सामान्य नागरिकाने स्टेट बँकेकडून 600 कोटी रुपयांची कर्ज मागणी केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 01, 2026 | 06:22 PM
नगर–मनमाड रस्त्यासाठी सामान्य नागरिकाकडून 600 कोटी रुपयांची कर्ज मागणी

नगर–मनमाड रस्त्यासाठी सामान्य नागरिकाकडून 600 कोटी रुपयांची कर्ज मागणी

Follow Us
Close
Follow Us:
  • अहिल्यानगर-मनमाड रोडची दुरावस्था
  • संतप्त नागरिकाने बँकेकडे केली थेट 600 कोटी रुपयांची कर्जमागणी
  • अर्जाची प्रत मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठवण्यात आली
रियाज पठाण/अहिल्यानगर: नगर–मनमाड महामार्गाच्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या दुरवस्थेमुळे अखेर नागरिकांचा संयम सुटल्याचे चित्र समोर आले आहे. देहरे (ता. राहुरी) येथील सुनील चांदणे यांनी थेट स्टेट बँक ऑफ इंडिया, एमआयडीसी शाखेकडे 600 कोटी रुपयांच्या वैयक्तिक कर्जाची उपरोधिक मागणी करत प्रशासनालाच आरसा दाखवला आहे. विशेष म्हणजे, या अर्जाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना माहितीस्तव पाठवण्यात आली असून, त्यामुळे या महामार्गाच्या प्रश्नाला राज्य आणि केंद्र पातळीवर लक्ष वेधले गेले आहे.

अर्जात सुनील चांदणे यांनी नमूद केले आहे की, ते देहरे येथील रहिवासी असून त्यांच्या कुटुंबातील पाच सदस्यांचा रोजचा प्रवास अहिल्यानगर–मनमाड महामार्गावरूनच होतो. स्वतःचा देहरे–राहुरी, पत्नीचा देहरे–वांबोरी, वहिनीचा देहरे–अहिल्यानगर, पुतणीचा देहरे–विळद घाट येथील शाळेसाठी, तर मोठ्या भावाचा जिल्ह्यातील विविध ठिकाणी या महामार्गावरून नियमित प्रवास होत असल्याने हा रस्ता त्यांच्या कुटुंबासाठी जीवघेणा ठरत असल्याचे त्यांनी अर्जात स्पष्ट केले आहे.

Bangladesh Violence : बांगलादेशात अल्पसंख्याकांना राहिला नाही वाली; आणखी एका हिंदूची निर्घृण हत्या

महामार्गाची स्थिती इतकी विदारक झाली आहे की, तो रस्ता कमी आणि खड्ड्यांचे साम्राज्य अधिक वाटते. परिणामी, या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे बनले आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली आहे.

पगारातून हप्ता कापण्याची तयारी

कर्जमागणी केलेले 600 कोटी रुपये अहिल्यानगर–मनमाड महामार्गाच्या कामासाठी वापरावेत, असे अर्जात नमूद करतानाच, या खर्चाचा संपूर्ण तपशील बँकेला सादर करण्याची तयारी असल्याचे चांदणे यांनी म्हटले आहे. इतकेच नव्हे, तर “माझ्या पगारातून दरमहा हप्ता कापून घ्या”, असे लिहून त्यांनी शासनाच्या निष्क्रीयतेवर उपरोधिक, पण अत्यंत गंभीर प्रहार केला आहे.

राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत थेट इशारा

या अर्जाची प्रत थेट मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांना पाठवण्यात आल्याने, हा प्रश्न केवळ स्थानिक मर्यादेत न राहता राज्य आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवलेला इशारा ठरतो. सरकारकडून रस्ता होणार नसेल, तर नागरिक स्वतः पुढाकार घेतील, असा स्पष्ट संदेश यातून देण्यात आला आहे. वरवर हसवणारा वाटणारा हा अर्ज प्रत्यक्षात रडवणारे वास्तव मांडतो. तरीही यंत्रणा शांत राहिली, तर उद्या उरतील ते फक्त अपघातांचे आकडे आणि निष्क्रीयतेची नोंद.

आयाराम–गयारामची राजकारणाला लागली कीड; महापालिकेत सर्वच पक्षांसमोर विश्वासार्हतेचे आव्हान

विनोद नव्हे, तर अपयशाचे वास्तव

हा अर्ज हसण्याचा विषय नसून, गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या अहिल्यानगर–मनमाड महामार्गाबाबत शासनाच्या अपयशाची लक्तरे वेशीवर टांगणारा प्रकार आहे. या मार्गावर आतापर्यंत असंख्य अपघात झाले असून, अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर काही प्रवासी कायमचे अपंग झाले आहेत. मात्र प्रत्येक अपघातानंतर केवळ आश्वासनांची पुनरावृत्ती होते आणि काही दिवसांत सर्वकाही विसरले जाते.

पूर्वी ज्या प्रवासासाठी 45 मिनिटे लागत होती, त्याच प्रवासासाठी आज तीन तासांहून अधिक वेळ खर्ची पडत असल्याचे वास्तव या महामार्गाची भयावह अवस्था अधोरेखित करते.

Web Title: Local resident sunil chandane applied for 600 crore loan for nagar manmad road

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • Marathi News
  • Road Work

संबंधित बातम्या

Navi Mumbai : खारघरमध्ये रक्तपेढीची इमारत तयार होऊनही सेवा बंद; स्थानिकांमध्ये नाराजी
1

Navi Mumbai : खारघरमध्ये रक्तपेढीची इमारत तयार होऊनही सेवा बंद; स्थानिकांमध्ये नाराजी

Samnapur News : “दारू दुकान बंद करा, अन्यथा…”; समनापूरच्या रणरागिणींनी प्रशासनाला झुकावले
2

Samnapur News : “दारू दुकान बंद करा, अन्यथा…”; समनापूरच्या रणरागिणींनी प्रशासनाला झुकावले

Navi Mumbai : पाम बीच ते सायन पनवेल आर्म उड्डाणपुलाचे लोकार्पण
3

Navi Mumbai : पाम बीच ते सायन पनवेल आर्म उड्डाणपुलाचे लोकार्पण

Diesel Price Hike : बाप रे! डिझेल थेट 28 रुपयांनी महागलं; आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार मोठी कात्री
4

Diesel Price Hike : बाप रे! डिझेल थेट 28 रुपयांनी महागलं; आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार मोठी कात्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.