Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बारसू रिफायनरीवरून खालच्या पातळीचं राजकारण सुरु, दुटप्पी राजकारण बाजूला ठेवत सर्वपक्षीयांनी एकत्र यावं’; उदय सामंत यांचे आवाहन

बारसूवासियांचे गैरसमज दूर केले जातील. शेतकऱ्यांशी बोलू शकतो, अजून वेळ आहे. बारसूबाबत ठाकरे गटाचे मतांसाठी राजकारण सुरु आहे. बारसूमधील जागा उद्धव ठाकरेंनी सुचवली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 25, 2023 | 02:31 PM
‘बारसू रिफायनरीवरून खालच्या पातळीचं राजकारण सुरु, दुटप्पी राजकारण बाजूला ठेवत सर्वपक्षीयांनी एकत्र यावं’; उदय सामंत यांचे आवाहन
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : बारसू रिफायनरीचा (Barsu Refinery) मुद्दा पेटत आहे. त्यात बारसू रिफायनरी सर्वेक्षण स्थगित करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात आंदोलनही सुरू आहे. त्यानंतर आता यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी माध्यमांशी संवाद साधत सरकारची भूमिका स्पष्ट केली.

उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केले. ते म्हणाले, ‘बारसूवासियांचे गैरसमज दूर केले जातील. शेतकऱ्यांशी बोलू शकतो, अजून वेळ आहे. बारसूबाबत ठाकरे गटाचे मतांसाठी राजकारण सुरु आहे. बारसूमधील जागा उद्धव ठाकरेंनी सुचवली होती. प्रकल्पांबाबत बोलणारे आता बारसूबाबत का? बोंबलत आहेत. रिफायनरीसाठी उद्धव ठाकरेंनी स्वत: पंतप्रधानांना पत्र लिहिले. बारसूवासियांमध्ये दडपशाही केली जाणार नाही. ठरवून केलेले हे राजकीय षडयंत्र आहे. प्रकल्प आणि आंदोलनाबाबत शरद पवार यांनी माहिती घेतली होती’.

खालच्या पातळीचं राजकारण सुरु

बारसू रिफायनरीवरून सध्या महाराष्ट्रात खालच्या पातळीचं राजकारण सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनीही ही जागा सुचवली होती. त्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिले होते. या पत्रामुळेच सर्वेक्षण सुरु झालं. पण बारसूबाबत राजकारण नको. दुटप्पी राजकारण बाजूला ठेवत सर्वपक्षीयांनी एकत्र यावं, समर्थन करावं, असेही सामंत यांनी म्हटले आहे.

आंदोलक आक्रमक

बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधात आंदोलन सुरू आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी मात्र पोलिसांच्या गाड्या अडवल्या. जीव गेला तरी बेहत्तर, पण आम्ही इथून हटणार नाही, अशी भूमिका आंदोलक महिलांनी घेतली होती.

Web Title: Low level politics started over barsu refinery all parties should put aside double politics and come together says uday samant nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2023 | 02:31 PM

Topics:  

  • Barsu
  • maharashtra
  • Mumbai
  • Uday Samant

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: महापालिकेच्या ‘पे अँड पार्क’ला कापड बाजार व्यापारी असोसिएशनचा तीव्र विरोध; आंदोलनाचा इशारा
1

Ahilyanagar News: महापालिकेच्या ‘पे अँड पार्क’ला कापड बाजार व्यापारी असोसिएशनचा तीव्र विरोध; आंदोलनाचा इशारा

खेड तालुक्यात भेसळयुक्त मँगो पल्पवर मोठी कारवाई; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
2

खेड तालुक्यात भेसळयुक्त मँगो पल्पवर मोठी कारवाई; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

Mumbai Accident: विरारमध्ये भीषण अपघात! हायवा ट्रकची जोरदार धडक; शाळेत जात असलेल्या शिक्षिकेचा मृत्यू
3

Mumbai Accident: विरारमध्ये भीषण अपघात! हायवा ट्रकची जोरदार धडक; शाळेत जात असलेल्या शिक्षिकेचा मृत्यू

“महावितरणला ३२ हजार कोटींचे अर्थसाहाय्य, एसटीला सुद्धा भरीव निधी द्या”, एसटी कर्मचारी काँग्रेसची राज्य सरकारकडे मागणी
4

“महावितरणला ३२ हजार कोटींचे अर्थसाहाय्य, एसटीला सुद्धा भरीव निधी द्या”, एसटी कर्मचारी काँग्रेसची राज्य सरकारकडे मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.