Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News: राजापुरात ५१ ग्रा.पं. वर नेमणार प्रशासक; सरपंच संघटनेकडूनही ठराव पारीत

तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक मुदत फेब्रुवारी दरम्यान संपणार असल्याने शासनाच्या नविन आदेशानुसार या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणार हे सिध्द होत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 31, 2026 | 02:49 PM
Ratnagiri News: राजापुरात ५१ ग्रा.पं. वर नेमणार प्रशासक; सरपंच संघटनेकडूनही ठराव पारीत

Ratnagiri News: राजापुरात ५१ ग्रा.पं. वर नेमणार प्रशासक; सरपंच संघटनेकडूनही ठराव पारीत

Follow Us
Close
Follow Us:

ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याच्या निर्णयाचे पत्रक निर्गमित
शासनाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महत्वाचे ओदश
नवीन ग्रामपंचायत अद्याप अस्तित्वात नाही

राजापूर: शासनाने २६ जानेवारी रोजी ग्रामपंचयतीवर प्रशासक नेमण्याचा निणर्याचे पत्रक २३ जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आले असल्याने राजापूर तालुक्यातील जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ५१ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणार असल्याचे निश्चित झाले आहे. तर दुसरीकडे यामधून ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणूकाही लांबणिवर पडणार असल्याचे सिध्द होत आहे. या निणर्यामुळे सरपंच संघटनेने केलेल्या मागणीचा विचार शासनाने केला नसल्याचे समोर येत आहे.

राज्यातील ग्रामपंचायतीच्या कार्यकाळाबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत राज्यातील अनेक ग्रामपंचायतींची मुदत संपणार असून, अशा परिस्थितीत प्रशासकीय कामकाज सुरळीत सुरू राहावे यासाठी त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत पत्रक २३ जानेवारी रोजी राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आले आहे.

Raigad News: निवडणूक नियमांची पायमल्ली? २ उमेदवारांनी अनामत रक्कम भरली नाही, छाननीमध्ये उघड झाली धक्कादायक माहिती

सरपंच संघटनेकडूनही ठराव पारीत

यावेळी तालुक्यातील सरपंच संघटनानेही ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये ठराव पारीत केले होते. सरपंच संघटनेच्या या मागणीचा विचार शासनाने केला नसल्याचे पुढे येत आहे. शासनाने सरपंच संघटनेच्या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक मुदत फेब्रुवारी दरम्यान संपणार असल्याने शासनाच्या नविन आदेशानुसार या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमणार हे सिध्द होत आहे. तर शासनाने हा आदेश काढून ग्रामपंचातीच्या निवडणूका पुढे जाणार हे सुचित केले आहे.

शासनाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना महत्वाचे ओदश

या संदर्भातील महत्त्वाचे आदेश राज्य शासनाकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिका-यांना पाठविण्यात आले आहेत. हे आदेश अपर सचिव, महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आले असून, त्यानुसार आता संबंधित जिल्हयांमध्ये मुदत संपलेल्या किंवा संपणाऱ्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही सुरू केली जाणार आहे. प्रशासक नेमल्यानतर त्या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालवण्यात येईल, यामध्ये विकासकामे, योजनांची अंमलबजावणी,आर्थिक व्यवहार तसेच ग्रामस्थांच्या तक्रारीचे निवारण यांचा समावेश असेल. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊन नवीन लोकप्रतिनिधी निवडून येताच प्रशासकाची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल आणि नव्याने निवडून आलेली ग्रामपंचायत कार्यभार स्वीकारेल. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेत विलंब झाला तरी ग्रामीण भागातील प्रशासन ठप्प होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच, ग्रामपंचायतीच्या कारभारात सातत्य राहण्यासाठी हा निर्णय महत्वाचा ठरणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Web Title: Maharashtra goerment posted administrator in rajapur 51 grampanchayat lection news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • Election News
  • Rajapur News Update
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Ratnagiri News: कोकणातील कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती
1

Ratnagiri News: कोकणातील कोळीवाड्यांचे होणार सीमांकन; विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती

जिल्हा परिषद अन् पंचायत समिती निवडणुकांबाबत सपकाळांचा मोठा विश्वास; म्हणाले…
2

जिल्हा परिषद अन् पंचायत समिती निवडणुकांबाबत सपकाळांचा मोठा विश्वास; म्हणाले…

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अन् मतदान एकाच दिवशी; परीक्षार्थी संभ्रमात
3

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अन् मतदान एकाच दिवशी; परीक्षार्थी संभ्रमात

Zp Election 2026 : विरोधकांच्या भुलथापांना, अमिषाला बळी बडू नका; देवराज पाटील यांचे आवाहन
4

Zp Election 2026 : विरोधकांच्या भुलथापांना, अमिषाला बळी बडू नका; देवराज पाटील यांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.