Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांचा पुन्हा एल्गार; शिरोळमधून सरकारला दिला इशारा

मराठा आरक्षणाची ही अंतिम लढाई आहे. २९ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्र मुंबईला धडकणार असून, पुन्हा एकदा ताकद दाखवण्यासाठी मुंबईत या, असे आवाहन मराठा आंदाेलक मनोज जारंगे पाटील यांनी केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 09, 2025 | 01:48 PM
Maratha Reservation : मराठा समाजाचे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता; मनोज जरांगेंनी सरकारला दिला 'हा' इशारा

Maratha Reservation : मराठा समाजाचे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता; मनोज जरांगेंनी सरकारला दिला 'हा' इशारा

Follow Us
Close
Follow Us:

शिरोळ : मराठा आरक्षणाची ही अंतिम लढाई आहे. २९ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्र मुंबईला धडकणार असून आरक्षणाचा निर्णय लागल्याशिवाय आता थांबणार नाही. एक घर, एक गाडी मुंबईला दाखल होणार असून आता मराठा समाज थांबणार नाही. आमची ताकद पूर्ण महाराष्ट्राने बघितली आहे. पुन्हा एकदा ताकद दाखवण्यासाठी मुंबईत या, असे आवाहन मराठा आंदाेलक मनोज जारंगे पाटील यांनी केले. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. २९ तारखेला मराठा समाज मुबईत जाणार असल्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे.

शिरोळ येथील घोंगडी बैठकीत ते बाेलत हाेते. मराठा आरक्षणा संदर्भात २९ ऑगस्टला मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाने पुन्हा एकदा आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिरोळ येथे घोंगडी बैठक झाली. प्रारंभी सकल मराठा समाज व शिरोळकरांच्या वतीने जरांगे-पाटील यांचे स्वागत करण्यात आले. स्वागत दीपक पाटील यांनी तर प्रास्ताविक जयश्री पाटील यांनी केले. माजी आमदार उल्हास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाने आम्ही सधन आहोत, असे न समजता आरक्षणासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. ५८ लाख मराठा समाज कुणबी सापडला आहे. अजून तीन कोटी मराठा समाजाला कुणबी दाखले मिळतील. याचा फायदा नक्कीच समाजाला होणार आहे. शिरोळकरांच्या दाखल्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. २९ ऑगस्टला संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज मुंबईत दाखल होणार आहे. आंदोलन यशस्वी होईपर्यंत माघार नाही. या आंदोलनामुळे समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक प्रगतीला आता कोणीही अडवू शकणार नाही, असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.

यावेळी श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक दरगू गावडे, ‘आंदोलन अंकुश’चे संस्थापक धनाजी चुडमुंगे, मुस्तफा इनामदार, राकेश जगदाळे, कृष्णा देशमुख, मंगेश नलवडे, एकनाथ माने, सचिन गावडे, विकास सेसावरे, अनिल हुपरीकर, रणजीत महाडिक, दत्तात्रय जगदाळे अक्षय पाटील यांच्यासह सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठा-ओबीसी संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न

जरांगे-पाटील म्हणाले, फडणवीस सरकार मराठा-ओबीसी असा संघर्ष पेटवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र असे झाल्यास फडणवीस यांना आमची ताकद दाखवून देऊ. मराठा समाजावर ओबीसी समाजाला भडकून आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. त्यांना त्यांची जागा दाखवू.

तालुक्यातील ५२ गावे पिंजून काढणार

२९ ऑगस्टला मनोज जरांगे-पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला जाण्यासाठी संपूर्ण तालुक्यातून बैठका घेऊन जागृती करणार आहे. तालुक्यातील ५२ गावे पिंजून काढून प्रत्येक मराठा बांधवांना आंदोलनाचे महत्त्व पटवून देऊन मुंबईचे आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार सकल मराठा समाज शिरोळच्या वतीने बैठकीत घेण्यात आला.

मराठा समाजातील प्रत्येक घरातून एक गाडी २९ ऑगस्टला मुंबईला येणे गरजेचे आहे. कोणतेही सणवार व आपले काम बाजूला ठेवून समाजासाठी एक दिवस मुंबईला या. तेथून पुढील आंदोलन मी यशस्वी करून दाखवतो. -मनाेज जरांगे पाटील, मराठा आंदाेलक

Web Title: Manoj jarange patil has warned the government from shirol regarding maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2025 | 01:48 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • CM Devedra Fadnavis
  • Cmomaharasahtra
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

गॅसचा तुटवडा भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे, आंदोलन करून सरकारला धारेवर धरले पाहिजे; काँग्रेसचे आवाहन
1

गॅसचा तुटवडा भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे, आंदोलन करून सरकारला धारेवर धरले पाहिजे; काँग्रेसचे आवाहन

Pune ZP : पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी दावेदारांची रांग; राष्ट्रवादीत अंतर्गत चुरस
2

Pune ZP : पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी दावेदारांची रांग; राष्ट्रवादीत अंतर्गत चुरस

बारामती तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे, तर उपसभापतीपदी…
3

बारामती तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी किरण तावरे, तर उपसभापतीपदी…

चाकणला प्लॅस्टिकबंदीचा फज्जा, बाजारपेठेत कॅरीबॅगचा सुळसुळाट; कठोर कारवाईची मागणी
4

चाकणला प्लॅस्टिकबंदीचा फज्जा, बाजारपेठेत कॅरीबॅगचा सुळसुळाट; कठोर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.