Top Marathi News Today : अग्नि-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी; 5000 किलोमीटरपर्यंत करू शकते अचूकपणे लक्ष्य
महाराष्ट्रात गेल्या ४ दिवसांपासून पावसाने प्रचंड हाहाःकार माजवला असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे. मुंबईत समुद्र खवळला असून महाराष्ट्रातील नद्यांची पातळीदेखील ओलांडली आहे आणि यामुळे सगळीकडेच धोका वाढलाय. आज सकाळच्या पावसामुळे भांडुपच्या एलबीएस मार्गावरील रस्त्यावर पाणी साचले असून ठाण्याकडे जाणारी वाहतूक आणि मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे. अधिक माहितीसाठी सविस्तर वाचा
19 Aug 2025 07:47 PM (IST)
मुंबई: मुंबईमध्ये गेले काही दिवस मुसळधार पाऊस कोसळत आहे. आज दिवसभरात मुंबईत काही ठिकाणी 300 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मात्र या पावसातच आता मोठी घटना मुंबईत घडली आहे. मुंबईतील मोनोरेल अचानक वाटेतच बंद पडली आहे. गेल्या दीड ते दोन तासांपेक्षा जास्त काळ प्रवासी मोनोरेलमध्ये अडकून पडले आहेत. अग्निशमन दल, पोलिस प्रशासन यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले आहे.
19 Aug 2025 06:55 PM (IST)
कर्जत/ संतोष पेरणे : तालुक्यात सलग दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे.मात्र तरीदेखील कर्जत तालुक्यातील तिन्ही नद्या आणि नाले या धोक्याच्या पातळीवर जाऊन वाहत नाहीत.परंतु या सततच्या पावसामुळे दोन शेतकऱ्यांच्या घराच्या भिंती कोसळल्याने त्या कुटुंबांचे नुकसान झाले आहे.दरम्यान कर्जत तालुका प्रशासनाने अद्याप कोणत्याही दरडग्रस्त कुटुंबाला स्थलांतरित केलेले नाही.
19 Aug 2025 06:23 PM (IST)
Vice President Election 2025: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अलिकडेच अचानक राजीनामा दिल्यानंतर, सध्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी वेगाने सुरू आहे. भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीए आणि इंडिया आघाडी या दोन्ही पक्षांकडून आपापले उमेदवारांच्या नावाची घोषणाही करण्यात आली आहे. पुढच्या महिन्यात ९ सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. सुरूवातीला ही निवडणूक एकतर्फी होईल असे वाटत असतानाच विरोधी इंडिया आघाडीकडूनही उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. पण या निवडणुकीपूर्वीही भारतात आतापर्यंत उपराष्ट्रपती पदासाठी एकूण १६ निवडणुका झाल्या आहेत. त्यापैकी ४ निवडणुका बिनविरोध जिंकल्या गेल्या.
19 Aug 2025 05:50 PM (IST)
दिव्यात नालेसफाई झाली नसल्यामुळे यंदा पुन्हा एकदा नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. चाळीतल्या घरांमध्ये पाणी शिरलं, रस्ते तुंबले, तर बेडेकर नगर, गणेश नगर, बी.आर. नगर, मुंब्रा देवी कॉलनी, डीजे कॉम्प्लेक्स, दिवा आगासन मुख्य रस्ता अशा अनेक भागात पाणी साचल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, अशा टीका ठाकरे गटाच्या रोहिदास मुंडे यांनी केली आहे.
19 Aug 2025 05:40 PM (IST)
मुंबई: इतिहासाशी नवीन पिढीला जोडण्याची भूमिका श्रीमंत राजे रघुजी भोसले यांच्या ऐतिहासिक तलवारीने पार पाडली आहे. या तलवारीमुळे आपण इतिहासाशी जोडले गेलो आहे. नागपूरसह इतर ठिकाणी ही तलवार पोहोचेल आणि त्यामुळे आपल्या हिंदवी स्वराज्याचा विस्तार कसा झाला, हे नवीन पिढीपर्यंत पोहोचेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
19 Aug 2025 05:40 PM (IST)
दिव्यात नालेसफाई झाली नसल्यामुळे यंदा पुन्हा एकदा नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. चाळी-चाळीत घरांमध्ये पाणी घुसले, रस्ते तुंबले, तर बेडेकर नगर, गणेश नगर, बी.आर. नगर, मुंब्रा देवी कॉलनी, डीजे कॉम्प्लेक्स, दिवा आगासन मुख्य रस्ता अशा अनेक भागात पाणी साचून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
19 Aug 2025 05:20 PM (IST)
सतत पडत असलेल्या पावसामुळे कल्याणच्या ठाणकर पाडा परिसरात घराची भिंत कोसळली.कल्याण डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांनी घटनास्थळाची पाहणी केली असून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.
19 Aug 2025 05:00 PM (IST)
उल्हासनगर शहरात मुसळधार पावसामुळे उल्हासनगरातील अनेक भाग जलमय झाले आहेत. सरासरी 118 मिलिमीटर पावसाची नोंद झाल्यामुळे कानसई रोडवरील भरत नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, अंदाजे 170 घरांमध्ये पाणी शिरले आहे.
19 Aug 2025 05:00 PM (IST)
गेल्या दोन दिवसापासून ठाणे शहरात पावसाची संततधार सुरू असून हवामानखात्याने ठाण्यासाठी रेड अलर्ट दिला आहे. अतिवृष्टीदरम्यान नागरिकांची गैरसोय होवू नये यासाठी शहरातील पाणी साचण्याची जी ठिकाणे आहेत त्या ठिकाणी पाण्याचा निचरा लवकर होईल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका प्रशासनाला दिल्या. सोमवारपासून ठाणे शहरात मुसळधार पाऊस सुरू असून या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयुक्त सौरभ राव व महापालिका अधिकाऱ्यांसमवेत चिखलवाडी, भांजेवाडी या परिसराची पाहणी करुन या ठिकाणी साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच आवश्यकता भासल्यास नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना दिल्या.
19 Aug 2025 04:55 PM (IST)
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेकेदारांचे भर पावसात भिजत आंदोलन केलं आहे. केलेल्या कामांचा विकास निधी ठेकेदारांना मिळत नसल्याने आज पालघर मधील शेकडो ठेकेदारांनी भर पावसात पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं . काम पूर्ण करून वर्ष उलटलं तरी देखील सरकार केलेल्या कामाचा मोबदला देत नसल्याने आक्रमक झालेल्या ठेकेदारांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिलं आहे.
19 Aug 2025 04:40 PM (IST)
रोड नंबर २८, रामनगर, वागळे इस्टेट, ठाणे(प.) या ठिकाणी रस्त्यावरती लोखंडी कमान कोसळली होती.अतिक्रमण विभागाचे कर्मचारी १ जेसीबी मशीन सह, अग्निशमन दलाचे जवान १ रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी १ गॅस कटर सह उपस्थित होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही.
19 Aug 2025 04:30 PM (IST)
कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मीरा-भाईंदर परिसरात जनजीवन विस्कळीत झाले आहे. शहरातील अनेक भागांत पाणी साचून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.विशेषत: काशिमिरा ते दहिसर पश्चिमेकडील महामार्गावर पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून वाहनांची मोठी कोंडी झाली आहे. प्रवाशांना तासन्तास रस्त्यात अडकून पडावे लागत आहे.
19 Aug 2025 04:20 PM (IST)
सोमवार आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे गोरगरीबांचे संसार वाहून गेले आहेत. या प्रकारास ठाणे महानगर पालिकेची यंत्रणाच जबाबदार आहे. त्यामुळे ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे, त्या सर्वांना ठामपाने तातडीची मदत म्हणून पन्नास हजार रूपयांचे अर्थसाहाय्य करावे, अशी मागणी मा. विरोधीपक्ष नेते शानू पठाण यांनी केली आहे.
19 Aug 2025 04:15 PM (IST)
ठाणे जिल्ह्याला देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्व विभागांमध्ये सतर्क ठेवण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून खाडीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.
19 Aug 2025 04:10 PM (IST)
गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे. अनेक कंत्राटदारांनी कर्ज काढून शासनाची कामे केली आहेत. मात्र, त्यांना त्यांची देयके दिलीच जात नाहीत. एकीकडे सरकार कोट्यवधींची कर्जे घेत आहे. मात्र, कंत्राटदारांना निधी दिला जात नाही. हा निधी जातो कुठे? असा सवाल करीत राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली ठेकेदारांनी भरपावसात जोरदार धरणे आंदोलन केले.
19 Aug 2025 04:05 PM (IST)
मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. याचपाार्श्वभूमीवर ठाण्यात पावसामुळे दरड कोसळल्याचं समोर आलं आहे. ठाण्यातील लोकमान्य नगर येथे आज दरड कोसळल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झालं आहे.
19 Aug 2025 04:00 PM (IST)
Ajit Doval Wang Yi Meeting: भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल (Ajit Doval )आणि चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी (Wang Yi) यांच्यात नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली.
19 Aug 2025 03:57 PM (IST)
‘चिरंजीवी हनुमान-द एटरनल’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. हा चित्रपट देखील खास आहे कारण देशातील पहिला एआय जनरेटेड चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. आज मंगळवारी निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
19 Aug 2025 03:48 PM (IST)
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नारिकांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागत आहे. राज्यात सततच्या पावसामुळे आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोकांना वाचवण्यात आले आहे. मुसळधार पावसामुळे पूर, रस्ते अडथळे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
19 Aug 2025 03:36 PM (IST)
Maharashtra Rain News: राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस कोसळत आहे. सातारा जिल्ह्यात असणारे कोयना धरण हे महाराष्ट्रासाठी भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाते. दरम्यान कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे.
19 Aug 2025 03:28 PM (IST)
सोशल मीडियाच्या जगात नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं. इथे बरेच असे व्हिडिओज व्हायरल होतात जे आपल्या कल्पनेपलीकडचे ठरतात. सोशल मीडियावर जुगाड, अपघात आणि निरनिराळ्या स्टंट्सचे बरेच व्हिडिओ शेअर केले जातात जे युजर्सचे लक्ष वेधून घेतात आणि आताही असाच एक लक्षवेधी व्हिडिओ इथे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
19 Aug 2025 03:18 PM (IST)
शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक खास बातमी आली आहे. एका छोट्या कंपनीने असा निर्णय घेतला आहे, जो लोकांना आश्चर्यचकित करतो. साउदर्न गॅस लिमिटेड नावाच्या या कंपनीने आपल्या शेअरधारकांना प्रति शेअर ५० रुपये लाभांश देण्याची घोषणा केली आहे.
19 Aug 2025 03:06 PM (IST)
आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव यांना टीम इंडियाचा कर्णधार करण्यात आले आहे. भारताचा सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आशिया कप स्पर्धा खेळणार आहे.
19 Aug 2025 02:47 PM (IST)
पुणे/Pune Heavy Rain Update: राज्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान मध्यंतरी काही दिवस पुणे शहरात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसून आले होते. मात्र दोन दिवसांपासून पुणे शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान खडकवासला धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे.
19 Aug 2025 02:41 PM (IST)
गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी मोठ्या जलौषात सगळीकडे तयारी केली जात आहे. मकर, पूजेचे साहित्य, नैवेद्य आणि बाप्पाच्या प्रसादासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीला सुरुवात झाली आहे. सणावाराच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई उपलब्ध असतात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मिठाई खायला खूप जास्त आवडते. पण उत्सवाच्या दिवसांमध्ये मिठाईच्या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. भेसळ युक्त मिठाई बाजारात विकत जात आहे. त्यामुळे भेसळ युक्त मिठाईचे सेवन करण्याऐवजी तुम्ही बाप्पाच्या स्वागतासाठी घरच्या घरी सुद्धा मिठाईतील पदार्थ बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला केशरी बुंदीचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मऊ रसरशीत लाडू पाहुण्यांसह घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडतील. चला तर जाणून घेऊया बुंदीचे लाडू बनवण्याची सोपी रेसिपी.
19 Aug 2025 02:39 PM (IST)
पुणे/Pune Heavy Rain Update: राज्यात गेले काही दिवस मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान मध्यंतरी काही दिवस पुणे शहरात पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र दिसून आले होते. मात्र दोन दिवसांपासून पुणे शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पुणे शहरात मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान खडकवासला धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे.
19 Aug 2025 02:39 PM (IST)
२०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला. आता या चित्रपटाचा प्रीक्वल येत आहे. ‘कांतारा चॅप्टर १’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षक खूप उत्सुक आहेत. अभिनेता गुलशन देवैय्या यांनी या चित्रपटात प्रवेश केला आहे. आज मंगळवारी निर्मात्यांनी अभिनेत्याचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. अभिनेताचा हा लूक आणि पोस्टरने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे.
19 Aug 2025 02:38 PM (IST)
तुम्ही देखील 15 हजार रुपयांच्या किंमतीत एखादा बजेट स्मार्टफोन शोधत आहात का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. टेक ब्रँड Redmi ने एक नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये मोठी बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. Redmi चा नवीन स्मार्टफोन Redmi 15 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. बजेट स्मार्टफोनच्या शोधात असणाऱ्या युजर्ससाठी हा एक उत्तम पर्याय ठरणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हे डिव्हाईस वायर्ड रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच या स्मार्टफोनमध्ये अनेक ढासू फीचर्स देण्यात आले आहेत.
19 Aug 2025 02:38 PM (IST)
शेअर बाजाराच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स-निफ्टी स्थिर होते, परंतु दुपारच्या व्यवहारात चांगली वाढ दिसून आली. दुपारी १:१८ वाजता, प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ४१५ अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता, तर निफ्टी ५० निर्देशांक ११५ अंकांच्या वाढीसह व्यवहार करत होता. दरम्यान, अनिल अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्येही ५ टक्क्यांची वाढ झाली आहे. सरकारी कंपनी एनएचपीसीकडून ऑर्डर मिळाल्यानंतर त्यांचे शेअर्स तेजीत आले आहेत.
19 Aug 2025 02:37 PM (IST)
ठाणे : राज्यात कोकण विभाग तसंच मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाने झोडपून काढले आहे. याचपार्श्वभूमीवर हवामान खात्याने आता ठाणे जिल्हाला देखील अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सर्व विभागांमध्ये सतर्क ठेवण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून खाडीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.
19 Aug 2025 02:37 PM (IST)
Carlos Alcaraz Cincinnati Open Winner: कार्लोस अल्काराजने सिनसिनाटी ओपन जिंकून मध्ये रचला आहे. या विजयामुळे कार्लोस अल्काराजचे एक मोठे स्वप्न पूर्ण झाला आहे. मंगळवारी खेळवण्यात आलेल्या जानिक सिनरविरुद्ध कार्लोसने शानदार खेळ दाखवला आणि विजेतेपद जिंकले. कार्लोस अल्काराजने पाहिल्यांदाच सिनसिनाटी ओपनचे जेडेपद जिंकले आहे.
19 Aug 2025 02:37 PM (IST)
साताऱ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दारूच्या नशेत असलेल्या बेभान झालेल्या रिक्षाचालकाने आधी अनेक वाहनांना धडक दिली त्यानंतर महिला पोलीस कॉन्स्टेबलला रिक्षातून फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जवळपास २०० मीटर फरफटत नेलं. हा धक्कादायक प्रकार दुकानांमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सातारा पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे.
19 Aug 2025 02:18 PM (IST)
पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. दररोज वेगवेगळ्या भागात गुन्हेगारी दहशत माजवत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भिती निर्माण होत आहे. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. दारू पित असताना पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी चिंचवड येथील ऑरा हॉटेलमध्ये घडली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
19 Aug 2025 02:18 PM (IST)
अलिकडेच आमिर खानचा भाऊ फैसल खानने आमिर खानच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक दावे केले आहेत. यानंतर आमिरच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित एक जुनावाद पुन्हा एकदा समोर आला आहे. जाणून घ्या कोण होती ती ब्रिटिश पत्रकार ज्याचे नाव आमिरशी जोडले गेले होते? आमिर खानचा भाऊ फैसल खानने याबद्दल काय म्हटले आहे हे जाणून घेऊयात.
19 Aug 2025 02:18 PM (IST)
ज्याप्रमाणे ज्योतिषशास्त्रात दिवसाच्या शुभ काळाचे वर्णन केले आहे, त्याचप्रमाणे अशुभ काळाचे देखील वर्णन केले आहे. सामान्य लोकांमध्ये, राहुकाल हा सर्वात अशुभ काळ मानला जातो आणि भाद्रमध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की राहुकालसारखा आणखी एक अशुभ काळ आहे, जो दिवसातून एकदाच येतो. हा अशुभ काळ मृत्यूच्या देवता यमराजाशी संबंधित आहे. यमराजाच्या काळात काही कामे करणे टाळावे कारण ती अयशस्वी होऊ शकतात किंवा त्यांचे परिणाम अशुभ ठरू शकतात. काही कामे ‘मृत्यूला’ आमंत्रित करण्यासारखी असतात.
19 Aug 2025 01:55 PM (IST)
२०२३ ऑक्टोबर मध्ये सुरु झालेले इस्रायल हमास युद्ध (Israel Hamas War) आता संपायच्या मार्गावर आहे. मात्र गाझामध्ये अद्यापही इस्रायलच्या कारवाया सुरु आहेत. इस्रायलने गाझावर पूर्ण नियंत्रण मिळवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. याअंतर्गत अनेक भागांमधून हमासच्या सैनिकांना हटवण्यात येत आहे. दरम्यान एक मोठी माहिती समोर आली आहे. हमासने सोमवारी (१८ ऑगस्ट) गाझामध्ये (Gaza) ६० दिवसांच्या युद्धबंदीला मान्यता दिली आहे.
19 Aug 2025 01:50 PM (IST)
निवडणूक आयोग भाजपसाठी काम करत आहे, तीनही निवडणूक आयुक्तांनी एक गोष्ट समजून घ्यावी, तुम्ही तुमचं काम केलं नाही तर, जेव्हा बिहार आणि दिल्लीत इंडिया आघाडीचं सरकार येईल तेव्हा तुमच्यावर कठोर कारवाई केली जाईल, आम्ही तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. इतकेच नव्हे तर, ज्यावेळी केंद्रात आमचे सरकार येईल, तेव्हा तुम्ही कुठेही असलात, तुम्ही निवृत्त झाले असलात तरीही आम्ही तुमच्यावर कारवाई करणार, हे लक्षात ठेवा. असंही राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला खडसावलं आहे.
19 Aug 2025 01:45 PM (IST)
हिमाचल प्रदेशमध्ये गेले काही दिवस अत्यंत मुसळधार पाऊस कोसळत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये कुल्लू येथे ढगफुटी झाली आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये गेले काही दिवस निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान कुल्लू यथे ढगफुटी झाल्याने मोठे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे.
19 Aug 2025 01:35 PM (IST)
राज्यामध्ये पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा गाजणार आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये येण्याचा इशारा देण्यात आला आहे. यानंतर आता ओबीसी नेत्यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने नागपूरमधून मंडल यात्रेला सुरुवात झाली आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये काल (दि.18) या यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष ओबीसीचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
19 Aug 2025 01:15 PM (IST)
उत्तर कोरियाने (North Korea) अमेरिका आणि दक्षिण कोरियाला खतरनाक धमकी दिली आहे. यामागाचे कारण म्हणजे अमेरिका आणि दक्षिण कोरियाने संयुक्त लष्करी सराव सुरु केला आहे. या कृतीवर उत्तर कोरियाने संताप व्यक्त केला आहे. यामुळे उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन (Kim Joung Un) यांनी या लष्करी सरावाला युद्धासाठी उकसवणारी कारवाई म्हणून वर्णने केले असून सराव थांबवण्याचा इशारा दिला आहे. यामुळे तणाव अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
19 Aug 2025 01:05 PM (IST)
मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतेक भागात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे मुंबईची परिस्थिती वाईट आहे. आजही सततचा मुसळधार पावसामुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहे. मंगळवारी सकाळपासून पाऊस आणखी तीव्र झाला आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचले आहे. याचदरम्यान आता हवामान विभागाकडून नवीन अलर्ट जारी करण्यात आला.
19 Aug 2025 12:59 PM (IST)
उल्हासनगर शहरात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पावसाची संतप्त धार सुरू आहे. शहरात सरासरी 118 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून कानसई रोड येथील भरत नगर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. पाण्याचा विसर्ग वाढल्याने अंदाजे 170 घरांमध्ये पाणी शिरले आहे.या परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अग्निशमन दलाचे जवान, प्रभाग समिती क्र. 4 चे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि मनपा कर्मचारी यांच्या मदतीने भरत नगरमधील रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले.
नागरिकांना जवळील महापालिकेचे समाज मंदिर तसेच बुद्ध विहार येथे स्थलांतरित करण्यात आले असून तेथे अंदाजे 500 नागरिकांसाठी चहापाणी व नाश्त्याची व्यवस्था महापालिकेतर्फे करण्यात आली आहे.दरम्यान, पावसाची संतप्त धार सुरूच असून शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी सतत गस्त घालत आहेत. नागरिकांचे जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी महापालिका सतर्क असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
19 Aug 2025 12:48 PM (IST)
नाशिकच्या राजकीय वर्तुळात पुन्हा पक्षप्रवेशाचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या दीड महिन्यात शिंदे सेनेला ‘जय महाराष्ट्र करत काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या आणि नाशिक महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या डॉ. हेमलता पाटील या आपल्या समर्थकांसह आज मंगळवारी (दि. १९) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश करणार आहेत. दरम्यान कॉंग्रेस नेत्यांवर त्यांनी गंभीर आरोप केले आहेत.
19 Aug 2025 12:44 PM (IST)
SOLAPUR | बार्शी शहर तालुक्यात जोरदार पाऊस, भोगावती नदीची पाणी पातळी वाढली. बार्शी तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे नदी, नाले, ओढे भरून तुडुंब भरले आहेत. वैराग परिसरातून वाहणाऱ्या भोगावती नदीची पाणी पातळी वाढल्याने अनेकांच्या शेतात शिरलं पाणी आहे. तसंच वैराग जवळील जवळगाव मध्यम लघु प्रकल्प भरल्यामुळे प्रकल्प ओव्हर फ्लो झालाय. बार्शी तालुक्यात 18 दिवसात 163 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून उडीद मूग पिकाची कापणी खोळंबली आहे.
19 Aug 2025 12:35 PM (IST)
कल्याण पूर्व-पश्चिम ‘नदीचे स्वरूप’; अडवली-ठोकली परिसरात पाण्याचा पूर, राघुबाई चौक-केतन पार्क जलमय. अनेक सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने नागरिक घरातच अडकले. बाहेर पडण्याचे सर्व मार्ग पूर्णपणे बंद; नागरिक घरातच आहेत.
19 Aug 2025 12:30 PM (IST)
मुंबईत अजूनही पाऊस सुरूच असून आज पहाटे 4 ते सकाळी 11 पर्यंत सरासरी 150 मिमी पेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. उपनगरात हे प्रमाण अधिक आहे. मिठी नदीची उंची 3.9 मीटर इतकी वाढली असून कुर्ला क्रांतीनगर येथून 350 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्याने आढावा घेत असून महापालिका आयुक्त परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
19 Aug 2025 12:25 PM (IST)
बीड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असून, जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. माजलगावच्या गंगामसला इथल्या मोरेश्वर मंदिर पाण्याखाली गेलं असून गंगामसला इथल्या गावकऱ्यांना जिल्हा प्रशासनानं सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. कुठल्याही क्षणी गावांमध्ये पाणी घुसू शकते, अशी स्थिती बीडच्या माजलगाव तालुक्यातील गंगामसला इथं निर्माण झाली आहे. गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे पाणी गावामध्ये शिरले असून गावांमधील मोरेश्वर मंदिर पाण्यासाठी गेले आहे.
19 Aug 2025 12:11 PM (IST)
मुंबईसह रायगड आणि पुणे जिल्ह्यात पुढील चार ते तीन तासांत पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता आहे. समुद्राला भरती आली असून, पाण्याच्या लाट किनाऱ्यावर आदळत आहेत. दरम्यान, पावसामुळे मुंबईतील रेल्वे मार्गांवर पाणी साचले आहे. त्यामुळे रेल्वे सेवा संपूर्णपणे ठप्प आहे. मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचल्यानं नदीचं स्वरुप आलं आहे. मुंबईसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी वाहतूक सुरू होती. पण पावसाच्या साचलेल्या पाण्यात वाहनं बंद पडल्याने वाहतूक सेवा कोलमडली आहे.
19 Aug 2025 11:59 AM (IST)
राज्याच्या सर्वच भागामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली आहे. या परिस्थितीवर प्रशासनाकडून पूर्ण लक्ष ठेवले जात आहे. या संदर्भात आज 11 वाजता मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार आहे. त्याचबरोबर 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक आहे. 36 जिल्ह्यांतील प्रशासन अलर्ट मोडवर आहे, अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.
19 Aug 2025 11:50 AM (IST)
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस कोसळत असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचबरोबर शेतीचे देखील मोठे नुकसान झाले आहे