मंत्री छगन भुजबळ (फोटो- ट्विटर)
मुंबई: मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे परिणाम राज्यातील लोकसभा निवडणुकीत दिसले आले. मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतच काही ठिकाणी उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती. मात्र आता निवडणूक लढवणार नाही, पण उमेदवारी पाडणार असे म्हणत जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. सोमवारी (4 नोव्हेंबर) सकाळी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. त्यावर राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी माघार घेतल्यानंतर छगन भुजबळ नेमके काय म्हणाले आहेत, ते पाहुयात.
मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील संघर्ष सर्वांना माहितीच आहे. मात्र निवडणुकीतून माघार घेतल्यावर भुजबळ यांनी जरांगे पाटील यांचे कौतुक केल्याचे पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जो निर्णय घेतला आहे, त्याचे मी स्वागत करतो. एका समाजावर निवडणूक लढवणे शक्य नसते. आता मराठा समाज मोकळेपणाने निवडणुकीत भाग घेऊ शकतो. सर्वच पक्षाने जे उमेदवार दिले आहेत, त्यात ५० त ६० टक्के मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे जरांगे पाटील यांचा निर्णय अत्यंत योग्य आहे, असे भुजबळ म्हणाले आहेत.
मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूकीतून माघार घेतली आहे. मित्रपक्षांची यादी न आल्यामुळे मनोज जरांगे यांनी माघार घेतली आहे. एकाच जातीवर निवडणूक कसं लढवणार,एकाच जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही. त्यामुळे आपल्याला निवडणूक लढवायची नाही. मराठा समाजातील सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावेत. एकानेही अर्ज कायम ठेवू नये, असे आवाहन मनोज जरंगे यांनी केले आहे.
काल समाजबांधवाशी मतदारसंघावर सविस्तर चर्चा झाली. पहाटे तीन-चार वाजेपर्यंत ही चर्चा सुरू होती. मित्रपक्षांची यादी अजून आलेली नाही. एका जातीवर निवडून येणं कसं शक्य आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. याला पाड,त्याला पाड म्हणायची इच्छा नाही, पण मला खवळलं तर बघू, दोन्ही शहाणे नाहीत.तुम्ही कुणालाही पाडा आणि कुणालाही निवडणू आणा, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मनोज जरांगे यांनी माघार घेतानाच मराठा समाजाला मोठा मेसेजही दिला. त्याशिवाय याला माघार म्हणता येणार नाही. हा गनिमी कावा आहे. असं देखील म्हणाले.