Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बाळासाहेब ठाकरे हे दिलदार व्यक्तिमत्त्व होतं, पण…’; गणेश नाईक यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

1997 मध्ये राज्यात पहिल्यांदाच शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेवर आले होते. उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समूहात माझी कामगार संघटना कार्यरत होती'.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 02, 2025 | 12:03 PM
'बाळासाहेब ठाकरे हे दिलदार व्यक्तिमत्त्व होतं, पण...'; गणेश नाईक यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

'बाळासाहेब ठाकरे हे दिलदार व्यक्तिमत्त्व होतं, पण...'; गणेश नाईक यांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे तसे दिलदार व्यक्तिमत्त्व पण ते हलक्या कानाचे होते. याचा अनुभव मी घेतला आहे. मनात एक, पोटात एक, डोक्यात एक असे त्यांच्या बाबतीत कधी घडलं नाही. ते स्पष्टवक्ता होते, पण कोणी एखाद्याने त्यांचे कान भरले आणि ते त्यांना क्लिक झाले की ती गोष्ट ते मनात घर करून बसायची. पण कालांतराने त्यांना त्यांची चूक कळली तर ती चूक कबूल करण्यात त्यांनी कधी संकोच बाळगला नाही, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी म्हटले आहे.

वनमंत्री नाईक यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. मनात एक, पोटात एक, डोक्यात एक असे त्यांच्या बाबतीत कधी घडलं नाही. ते स्पष्टवक्ता होते. हा त्यांच्या मनाचा मोठेपणा होता, असे बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी वाशी येथील एका कार्यक्रमात म्हटले. यावेळी वनमंत्री नाईक म्हणाले की, ‘1997 मध्ये राज्यात पहिल्यांदाच शिवसेना-भाजप युती सरकार सत्तेवर आले होते. उद्योगपती धीरूभाई अंबानी यांच्या रिलायन्स उद्योग समूहात माझी कामगार संघटना कार्यरत होती’.

तसेच बाळासाहेब ठाकरे, धीरूभाई अंबानी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन हे चांगले मित्र होते. ते आठ-पंधरा दिवसांनी धीरूभाई अंबानी यांच्या मुंबईतील घरात चर्चा करण्यासाठी भेटत होते. तेव्हा कधीतरी गप्पांच्या ओघात धीरूभाई अंबानी यांनी ‘बाळासाहेबांना मला मुख्यमंत्री करा’ असे सुचवले. पण, बाळासाहेबांना हा प्रस्ताव आवडला नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

राजकारणात ‘टांग’ मारणे मला कधीही आवडले नाही

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्यानंतर बाळासाहेबांनी माझ्यावर गटनेतेपदाची जबाबदारी जबरदस्तीने टाकली. पक्षात इतर ज्येष्ठ नेते, नेते असताना त्यांना डावलून मला गटनेते पद देणे मला आवडेले नाही. राजकारणात आलेली संधी सोडू नये, असे म्हणतात. राजकारणात इतरांना टांग मारूनच पुढे जायचे असते, असे सांगितले जाते. पण माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत तेथे अशाप्रकारे टांग मारणं, मला कधी आवडलं नाही, असा टोला नाईक यांनी लगावला.

Web Title: Minister ganesh naik talked about balasaheb thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2025 | 12:03 PM

Topics:  

  • Balasaheb Thackeray
  • Mumbai News

संबंधित बातम्या

नरीमन पाईंटलाच पक्षाला नवीन कार्यालय बांधून द्या, अन्यथा…; काँग्रेसचा इशारा
1

नरीमन पाईंटलाच पक्षाला नवीन कार्यालय बांधून द्या, अन्यथा…; काँग्रेसचा इशारा

Mumbai News : “वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याची सर्व पक्षांची मागणी”
2

Mumbai News : “वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर कारवाई करण्याची सर्व पक्षांची मागणी”

शासकीय कर्मचाऱ्यांनो, कार्यालयात ओळखपत्र लावूनच फिरा; अन्यथा होणार कारवाई
3

शासकीय कर्मचाऱ्यांनो, कार्यालयात ओळखपत्र लावूनच फिरा; अन्यथा होणार कारवाई

Eknath Shinde: एलफिस्टन ब्रिज भागातील बाधित रहिवाशांना दिलासा; DCM शिंदेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय
4

Eknath Shinde: एलफिस्टन ब्रिज भागातील बाधित रहिवाशांना दिलासा; DCM शिंदेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.