Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे नुकसान भरपाई मिळणार का? राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी स्पष्टच सांगितलं

राज्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले असून शहरी आणि गावाकडील भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. यावर आशिष जसस्वाल यांनी माहिती दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 13, 2025 | 02:12 PM
तिसऱ्या दिवशीही अवकाळीचा पुन्हा कहर

तिसऱ्या दिवशीही अवकाळीचा पुन्हा कहर

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : राज्याला अवकाळी पावसाने झोडपले आहे. अवकाळी पावसाचा जोर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान होत आहे. यामुळे बळीराजांची चिंता वाढली आहे. विदर्भ, मराठवाड्यासह राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने थैमान घातले असून, एकीकडे शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना, अवकाळीमुळे बळी गेल्याचीही घटना घडल्या आहेत. यामध्ये आता राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी अवकाळी पावसाबाबत झालेल्या बैठकीबाबत माहिती दिली आहे.

अवकाळी पावसामुळे खरीप हंगामाबाबत राज्य सरकारने बैठक घेतली. याबाबत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, “राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री हे खरीपची बैठक घेत आहेत. खताचा तुटवडा कृषी साहित्य विक्री दुकानात कुठे तुटवडा आहे का किंवा शेतकऱ्यांना कोणती अडचण असतील याचा एकूण आढावा घेणे सुरू आहे. विकेल ते पिकेल ही संकल्पना राबवून महाराष्ट्रातील उत्पादन कसा वाढवता येईल आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींचे तात्काळ निवारण कसा करता येईल. पिक विमा योजनेसह सर्व योजनेचा आढावा घेण्यात आला,” अशी माहिती आशिष जयस्वाल यांनी दिली आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढे ते म्हणाले की, “सध्या मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणुकीची योजना आपण आणली आहे. पिक विमा योजना पूर्वीप्रमाणे करून त्यातील गैरप्रकार टाळण्यासाठी आढावा घेतला. तेव्हा लक्षात आलं की सुमारे दहा हजार पाचशे कोटीचा निधी विमा कंपनीकडे गेलेला आहे. आता पिक विम्याच्या स्वरूपात जाणारे सर्व पैसे यातील बहुतांश रक्कम भांडवली गुंतवणुकीची योजना केली आहे. आणि पहिला अर्ज करेल त्याला पहिली मंजुरी अशी प्राधान्याची योजना तयार करून शेतीमध्ये क्रांती कशी होईल त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे,” अशी ग्वाही राज्यमंत्री आशिष जसस्वाल यांनी दिली आहे.

पंचनामा करून नियमानुसार मदत

राज्यामध्ये सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे सर्वात मोठे नुकसान हे शेतकऱ्यांचे होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. याबाबत आशिष जसस्वाल यांना विचारले असता ते म्हणाले की, “परवा सुद्धा अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात झाला आहे. Sdrf ndrf चे निकष आहेत. त्यानुसार पंचनामा करून नियमानुसार जे मदत आहे ते करत असतो,” अशी माहिती ग्वाही राज्यमंत्री आशिष जसस्वाल यांनी दिली आहे.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये जोरदार पाऊस

अवकाळी पावसामुळे उष्णता कमी झाली असली तरी शेतकऱ्यांच्या आंबा, डाळिंब आणि इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात देखील सलग सहाव्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरु आहे. यातच सोमवारी दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळी मुंबईतील काही भागांत पाऊस होताना दिसत आहे. कुर्ला, घाटकोपर या भागांमध्ये पाऊस होत आहे. अचानक आलेल्या या पावसामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहे.

 

 

Web Title: Minister of state ashish jaiswal informed about compensation to farmers due to unseasonal rains

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 02:12 PM

Topics:  

  • Maharashtra Weather
  • Unseasonal Rain
  • Weather Report Today

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert:  महाराष्ट्रात पावसाचा कहर! धोका वाढला; काळाकुट्ट अंधार अन्…. , काही तास अत्यंत महत्वाचे
1

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात पावसाचा कहर! धोका वाढला; काळाकुट्ट अंधार अन्…. , काही तास अत्यंत महत्वाचे

Maharashtra Rain: काही तास कोकणासाठी महत्वाचे! पाऊस असा कोसळणार की…; IMD चा ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट
2

Maharashtra Rain: काही तास कोकणासाठी महत्वाचे! पाऊस असा कोसळणार की…; IMD चा ‘या’ जिल्ह्यांना हायअलर्ट

राज्यातील अनेक भागांत पावसाची अद्याप प्रतीक्षाच; खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत
3

राज्यातील अनेक भागांत पावसाची अद्याप प्रतीक्षाच; खरीप हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत

India Rain Alert: आज ‘या’ राज्यांत पाऊस घालणार धुमाकूळ; IMD च्या अलर्टने वाढवली चिंता
4

India Rain Alert: आज ‘या’ राज्यांत पाऊस घालणार धुमाकूळ; IMD च्या अलर्टने वाढवली चिंता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.