ravindra chavhan
मुंबई : गणेशोत्सवात कोकणात (Konkan) जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या खूप जास्त असते. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांमुळे (Mumbai-Goa Highway) चाकरमान्यांना खडतर प्रवास करावा लागतो. परंतु कोकणात जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास कमी खडतर आणि सुखकर व्हावा यासाठी आता मुंबई-गोवा हायवेवरील डागडुजीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे आज मुंबई गोवा हायवेच्या (Mumbai Goa high way) पाहणी दौऱ्यावर आहेत. पनवेलनजीकच्या पळस्पे येथून हा दौरा सुरू झाला आहे.
[read_also content=”आशिया कप पूर्वी विराट कोहलीची ‘७+१८’ ही पोस्ट चर्चेत https://www.navarashtra.com/sports/before-the-asia-cup-virat-kohlis-post-718-is-in-discussion-319501.html”]
पाहणी दौऱ्यादरम्यान मंत्री रवींद्र चव्हाण या संपूर्ण महामार्गावरील कामाची पाहणी करणार आहेत. रवींद्र चव्हाण यांनी स्वत: कामगारांना सूचना देत मुंबई गोवा महामार्गावर खड्डे भरणीला सुरूवात केली आहे. गेली ११ वर्ष मुंबई गोवा महामार्गाचं काम रखडलं आहे. तसेच साल २०१८ पासून मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भातील याचिकाही प्रलंबित आहे. अखेर गणेशोत्सवाच्या तोंडावर खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी महामार्गाचा तातडीचा पाहणी दौरा आज हाती घेतला आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील रायगडच्या पहिल्या टप्प्यातील काम अतिशय संथ गतीनं सुरू आहे. पळस्पे ते इंदापूर या भागात रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात इथं दर आठवड्याला खड्डे भरणी करावी लागते.