Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वागळेंच्या हल्लेखोरांवर 307 गुन्हा दाखल करा; आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी

पुण्याच्या कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी हल्लेखोरांवर कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Feb 10, 2024 | 05:54 PM
वागळेंच्या हल्लेखोरांवर 307 गुन्हा दाखल करा; आमदार रवींद्र धंगेकर यांची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुण्यामध्ये पुरोगामी संघटना विरुद्ध हिंदुत्ववादी संघटनांमध्ये राजकीय वादंग निर्माण झाला आहे. ‘निर्भय बनो’ या सभेला (Nirbhay Bano Sabha) भाजप (BJP) पक्षाने केलेला तीव्र विरोध आणि जेष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) यांच्या गाडीवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर विरोधक आक्रमक भूमिका घेत आहेत. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या कसबा विधानसभेचे आमदार रवींद्र धंगेकर (MLA Ravindra Dhangekar) यांनी हल्लेखोरांवर कलम 307 (Section 307) अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

‘निर्भय बनो’ सभेला प्रमुख वक्ते म्हणून आलेल्या पत्रकार निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, ॲड. असिम सरोदे यांच्या गाडीवर हल्ला करत त्यांना जिवे मारण्याचा प्रकार भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला. या हल्लाचा आमदार रवींद्र धंगेकर यांनी तीव्र शब्दात निषेध केला. याबद्दल बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज,फुले, शाहू, आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात भाजपचे कार्यकर्ते विचारवंतांवर हल्ले करत आहे. दडपशाही माजवत आहेत. त्यांच्या वाहनांवर दगडफेक करून जिवे मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. हे महाराष्ट्र कधीच खपवून घेणार नाही. हल्लेखोरांवर पोलिसांनी भारतीय दंड संहितेतील कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.

तसेच पुढे  आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, “ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, विश्वंभर चौधरी, ॲड. असिम सरोदे यांच्यासह त्यांच्या संरक्षणासाठी पुढे आलेले महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला. हा हल्ला जीवघेणा होता. लोकशाहीत प्रत्येकाला आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. असे असताना स्वतःला ‘महासत्ता’ म्हणवून घेणारे भाजपचे लोक सर्वसामान्य लोक म्हणणं मांडत आहेत तर का घाबरत आहेत?” असा सवालही त्यांनी केला.

पुण्याच्या वैचारिक, सांस्कृतिक वातावरणाला काळीमा फासणारी घटना

“पोलिसांना हाताशी धरून आणि बहुजन समाजातील तरुणांची डोकी भडकावून भाजपने हा पूर्वनियोजित हल्ला घडवून आणला. ही पुण्याच्या वैचारिक, सांस्कृतिक वातावरणाला काळीमा फासणारी घटना भाजपने केली आहे. भाजपच्या नेत्यांनी एक चौक सांगावा तिथं विरोधक येऊन थांबतील. भाजपच्या नेत्यांनी हातात दगड घेऊन विरोधकांनी मारावीत. म्हणजे पोलीस मारणाऱ्यांवर गुन्हा दाखल करतील. पुणेकर भाजपला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाहीत,” असे मत आमदार रवींद्र धंगेकर यांनी मांडले आहे.

Web Title: Mla ravindra dhangekar demands to file a case under section 307 against the bjp who attacked nikhil wagle nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2024 | 05:47 PM

Topics:  

  • BJP
  • MLA ravindra dhangekar

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
2

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?
3

Bihar Election 2025: “बिहार निवडणुका दोन टप्प्यात घ्याव्यात,” भाजपने निवडणूक आयोगाच्या बैठकीत काय मागणी केली?

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ
4

“भाजपा मित्र उद्योजकाला कंत्राट देण्यासाठी कुकर्म…”, मिठी नदी स्वच्छता, निविदा प्रक्रियेत घोळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.