
विरोधी पक्ष उद्या संसदेत मांडणार अविश्वास प्रस्ताव
भाजपने आपल्या खासदारांना जारी केला व्हीप
भाजप खासदारांना थ्री लाइन व्हीप केला जारी
India Alliance: उद्या विरोधी पक्ष संसदेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव मांडणार आहे. यामुळे राजकारण तापले आहे. या अविश्वास प्रस्तावाला विरोध करण्यासाठी भाजप उदय संसदेत पूर्ण ताकदीसह उपस्थित राहणार आहे. भाजपने आपल्या सर्व खासदारांना व्हीप जारी केली आहे. भाजपच्या सर्व खासदारांना थ्री लाइन व्हीप जारी करण्यात आला आहे.
भाजप पक्षाच्या नेतृत्वाने उद्या सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यापासून संपेपर्यंत सर्व खासदारांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. 50 विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे, त्यामुळे उद्या सभागृहात जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
काय आहे भाजपचा प्लॅन?
भाजप विरोधी पक्ष मांडणार असलेला अविश्वास प्रस्ताव मोडून काढण्याचा प्रयत्न करेल. तसेच सर्व खासदारांची उपस्थिती दर्शवून आपली ताकद दर्शवण्याचा प्रयत्न करेल. भाजपने व्हीप जारी केला आहे. त्यामुळे कोणताही खासदार परवानगीशिवाय अनुपस्थित राहू शकणार नाही. व्हीपचे उल्लंघन झाल्यास खासदारावर कारवाई एलि जाऊ शकते.
कॉँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी सरकारवर टीका केली. सरकारचे नेतृत्व कमकुवत असल्याची टीका त्यांनी केली. अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने उभे राहिलेल्या 50 खासदारांमुळे सरकारला संसदेत पूर्ण ताकदीनिशी उपस्थित राहावे लागणार आहे, अशी टीका गोगोई यांनी केली आहे.
ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
काँग्रेस आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्धही असाच एक प्रस्ताव आणण्याची योजना आखत आहे. सोमवारी विरोधी पक्षांच्या दोन वरिष्ठ नेत्यांनी याबाबत सूचक विधान केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ओम बिरला यांच्या अविश्वास प्रस्तावाचा निकाल लागल्यानंतर, विरोधी पक्ष ज्ञानेश कुमार यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याचा विचार करत आहे. जर विरोधी पक्ष संसदेत महाभियोगाची सूचना देत असेल, तर देशातील पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांविरुद्ध महाभियोग प्रस्ताव आणला जाईल.
राहूल गांधींना धमकी दिल्यावरुन काँग्रेस आक्रमक; राज आमेरावर कारवाईची करण्याची मागणी
देशातील अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणूका झाल्या आहेत. यामध्ये सत्ताधारी भाजपचा दणाणून विजय झाला असून काँग्रेसला मोठा फटका बसला. यावेळी ईव्हीएमचा चुकीचा वापर झाला असून मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. याबाबत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदा देखील घेतल्या आहेत. यानंतर आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा प्रयत्न विरोधकांनी सुरु केला आहे.