Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘फडणवीस यांचे कर्तृत्व काय? कुटुंब फोडलं, पक्ष फोडले’; रोहित पवार यांचे टीकास्त्र, अजित पवारांवर साधला निशाणा

शरद पवार गटाचा आज शेतकरी मेळावा आहे. यामधून आमदार रोहित पवार यांनी शेतकरी मेळाव्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 11, 2024 | 03:41 PM
rohit pawar on dcm devendra fadnavis

rohit pawar on dcm devendra fadnavis

Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर : राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बार्शीमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये शरद पवार गटाच्या नेत्यांनी तुफान राजकीय फटकेबाजी केली आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांवरुन राज्य सरकारला घेरले असून महायुतीवर निशाणा साधला आहे. या शेतकरी मेळाव्यामध्ये आमदरा रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र डागले. त्यांचे कतृत्व काय असा सवाल देखील रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील रोहित पवार यांनी लक्ष केले.

काय म्हणाले रोहित पवार?

आमदार रोहित पवार यांनी बार्शीमधून राजकीय टोलेबाजी केली. ते म्हणाले, “काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, इतिहासात कर्तृत्वाला स्थान असते, पण मला देवेंद्र फडणवीस यांचा इतिहास बघायचा आहे. त्यांचं कर्तृत्व काय? त्यांनी कुटुंब फोडलं, पक्ष फोडले. जेव्हा थोर व्यक्तींवर बोलल्या गेलं, तेव्हा ते शांत होते, जेव्हा तुकाराम महाराजांच्या विरोधात बोललं गेलं, तेव्हाही ते शांत होते. आज राज्यातला शेतकरी आत्महत्या करतो आहे, तेव्हा ते शांत आहेत, राज्यात आज गुंडांचे राज्य आलं आहे, पण ते शांत आहेत, मग याला काय म्हणायचं? हेच तुमचं कर्तृत्व आहे का? लोकसभेला जसं लोकांनी तुमचं कर्तृत्व धुवून काढलं, तसं या विधानसभेलाही लोक तुम्हाला धडा शिकवतील”, अशी घणाघाती टीका रोहित पवार यांनी केली आहे.

अजित पवारांनाही साधला निशाणा

आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही लक्ष्य केलं. “केंद्र सरकारने कांदा निर्यातीबाबत घेतलेल्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं पाच हजार कोटी रुपयांचे नुकसान झालं. मात्र, त्यावर राज्यातले नेते काहीही बोलत नाहीत. काही दिवसांपूर्वी अजित पवार म्हणाले की केंद्र सरकारने कांद्याबाबत घेतलेला निर्णय चुकीचा होता, पण खरं तर अजित पवार हे सत्तेत आहेत, ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना खरंच शेतकऱ्यांचा कळवळा असता, तर त्यांनी दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले असते”, अशी टीका त्यांनी अजित पवार यांच्यावर केली.

Web Title: Mla rohit pawar targeted deputy chief minister devendra fadnavis and ajit pawar nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2024 | 03:41 PM

Topics:  

  • DCM Ajit Pawar
  • DCM Devendra Fadnavis
  • political news
  • rohit pawar

संबंधित बातम्या

मराठा आरक्षणासाठी मुस्लिम मावळा हाजी गफूर पठाण मैदानात…! मराठा बांधवांना पाठवला मायेचा घास 
1

मराठा आरक्षणासाठी मुस्लिम मावळा हाजी गफूर पठाण मैदानात…! मराठा बांधवांना पाठवला मायेचा घास 

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये? गणेशोत्सवानंतर आरक्षणाची घोषणा होण्याची शक्यता
2

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका नोव्हेंबरमध्ये? गणेशोत्सवानंतर आरक्षणाची घोषणा होण्याची शक्यता

‘काशी-मथुरा’ प्रकरणावर RSS सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान; म्हणाले, “आंदोलनाचे समर्थन…”
3

‘काशी-मथुरा’ प्रकरणावर RSS सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान; म्हणाले, “आंदोलनाचे समर्थन…”

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील खाऊगल्ली बंद; सरकारच्या फतव्यामुळे आंदोलकांचे होणार हाल?
4

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील खाऊगल्ली बंद; सरकारच्या फतव्यामुळे आंदोलकांचे होणार हाल?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.