Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘प्रवाशांची पर्वाच नाही, महायुती सरकारचे लक्ष्य केवळ निवडणूक’…मुंबई रेल्वे अपघातानंतर राज ठाकरेंनी सुनावले

मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील अपघातानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. राज ठाकरे यांनी भाजप युती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे, काय म्हणाले?

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 10, 2025 | 12:40 PM
राज ठाकरेंची महायुतीवर सडकून टीका (फोटो सौजन्य - Instagram/iStock)

राज ठाकरेंची महायुतीवर सडकून टीका (फोटो सौजन्य - Instagram/iStock)

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांनी ठाणे ते मुंब्रा ट्रेन अपघातामध्ये झालेल्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त केले. या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी आहेत. या महाभयानक घटनेनंतर राज ठाकरे यांनी महायुतीच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राज्य सरकारवर तोफ डागली असून सडकून टीका केली आहे. राज ठाकरे यांनी याबाबत एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यात निशाणा साधला. राज यांच्या म्हणण्यानुसार वास्तविक मुद्द्यांऐवजी राज्य सरकार केवळ निवडणुकांवर लक्ष केंद्रीत करत आहे. 

राज ठाकरे कडाडले

वृत्तसंस्था ANI मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, मनसे प्रमुखांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, “आज मुंबईत झालेला रेल्वे अपघात दुर्दैवी आहे. या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला, परंतु मुंबईत दररोज अशाच घटना घडत आहेत. मुंबईत दररोज प्रवासी जखमी होत आहेत आणि तरीही कोणीही मदत करण्यासाठी काहीही करत नाही.” ते म्हणाले, “आमचे संपूर्ण लक्ष फक्त निवडणुका आणि प्रचारावर आहे. राज ठाकरे-उद्धव ठाकरे युती करतील का? या प्रश्नापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे आज मुंबईत प्रवास कसा चालला आहे, शहरांमध्ये आणि संपूर्ण राज्यात लोक कसे राहत आहेत.” या प्रश्नाकडे कोणालाच लक्ष द्यावेसे वाटत नाही. 

Mumbai Local Accident: मुंब्रा लोकल अपघाताला २४ तास पूर्णहोताच दिसले भयावह दृश्य; दिवा स्थानकात एसी लोकलच्या दरवाजाला प्रवाशी…

सरकारवर सडकून टीका 

मुंबई लोकल ट्रेनसाठी स्वतंत्र प्रशासकीय महामंडळाची मागणी न केल्याबद्दल त्यांनी सध्याच्या आणि मागील राज्य सरकारांवर टीका केली. ते म्हणाले, “मुंबई रेल्वेसाठी स्वतंत्र महामंडळाची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. आम्हीही ही मागणी केली होती, परंतु आजपर्यंत कोणत्याही सरकारने या मागणीकडे लक्ष दिलेले नाही. आज शहरांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. प्रचंड गर्दी येत आहे. त्यांच्यासाठी मोठे रस्ते, पूल, महानगरे बांधली जात आहेत. उंच इमारतींना परवानगी दिली जात आहे, परंतु पार्किंगसाठी कोणतीही योजना नाही.”

मानवी जीवनाचे मूल्यच नाही 

रेल्वे स्थानकांवर गर्दी पाहून मला धक्का बसला आहे असे सांगून त्यांनी खासदार, आमदार आणि मंत्र्यांसह राजकीय नेत्यांना प्रश्न विचारला की ते परदेश दौऱ्यावर जातात आणि सार्वजनिक वाहतुकीबद्दल त्यांच्या दौऱ्यांमधून काही शिकतात का? “मी स्वतः मुंबईत बऱ्याच काळापासून ट्रेनने प्रवास करत आहे. पण तेव्हा परिस्थिती थोडी चांगली होती. आता रेल्वे स्थानकांवर गर्दी पाहून मला धक्का बसला आहे. हे खासदार, आमदार, मंत्री परदेशात जातात – ते तिथून काही शिकतात का? जर अशी घटना परदेशात घडली असती तर तिथे ती कशी हाताळली गेली असती? आपल्याकडे काहीही नाही. इथे मानवी जीवनाचे मूल्य नाही,” अशी खंत यावेळी त्यानी व्यक्त केली आहे. 

Mumbai Local Accident News: मुंबई लोकल अपघातात वेगळाच संशय; जखमी प्रवाशाने नेमकं काय सांगितलं?

आदित्यनेही केली टीका 

सोमवारी तत्पूर्वी, शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यावर टीका केली आणि त्यांच्यावर मृत्यूसाठी जबाबदार असल्याचा आरोप केला. “रेल्वेमंत्री रील मंत्री बनले आहेत. गेल्या २-३ वर्षांत अनेक भयानक रेल्वे अपघात झाले आहेत, परंतु जबाबदारी घेण्यासाठी कोणीही पुढे येत नाही. ही पूर्णपणे रेल्वे विभाग आणि रेल्वेमंत्र्यांची जबाबदारी आहे… भारतातील लोकांनी अनेक वेळा त्यांचा राजीनामा मागितला आहे, पण ते अजूनही त्यांचे काम करत आहेत.” 

सोमवारी सकाळी चालत्या ट्रेनमधून सुमारे १० प्रवासी पडल्याची घटना घडली. त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. प्रचंड गर्दीमुळे प्रवासी असुरक्षितपणे दरवाज्यांना लटकत होते.

Web Title: Mns chief minister raj thackeray lashes out at state government and mahayuti over mumbai local train accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 12:40 PM

Topics:  

  • Accident News
  • MNS Chief Raj Thackeray
  • Mumbai Railway

संबंधित बातम्या

श्रीनगरच्या बडगाममध्ये दोन वाहनांमध्ये भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू
1

श्रीनगरच्या बडगाममध्ये दोन वाहनांमध्ये भीषण अपघात; चार जणांचा जागीच मृत्यू

ओव्हरटेकचा प्रयत्न जीवावर बेतला; ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
2

ओव्हरटेकचा प्रयत्न जीवावर बेतला; ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.