मुंबई महापालिकेतील मलिदा समोर दिसत असल्याने ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. मात्र मुंबईकर जनता त्यांचा कुटील डाव यशस्वी होऊ देणार नाहीत, अशी घणाघाती टीका शंभूराज देसाई यांनी केली.
विरोधकांनी पराभवाची कारणे शोधणे सुरु केले असले तरीही स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाप्रणित महायुतीच जिंकणार असा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
बावधन-कोथरूड प्रभागातील मतदार याद्यांमध्ये तब्बल बाराशेहून अधिक मतदारांची नावे दुबार असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस बाळा शेडगे यांनी केला आहे.
मनसेला महाविकास आघाडीत सहभागी करुन घेण्याबाबत नाराजी आहे किंवा टोलवाटोलवी सुरु आहे या फक्त माध्यमांतील चर्चा आहेत, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.
मनसे महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. यावरुन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
भिवंडीमध्ये मराठी बोलण्याची गरज आहे का असा प्रश्न उपस्थित करून अबू आझमी यांनी वाद निर्माण केला आहे. त्यांनी हिंदी आणि मराठीतील फरकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, मनसे आक्रमक
राज ठाकरे यांच्या आदेशाने मनसेने काही पदाधिकाऱ्यांची पक्षातून थेट हकालपट्टी केली आहे. पक्षाच्या नियमांचे आणि धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे तसेच पक्षविरोधी कार्य केल्यामुळे मनसेने मोठी कारवाई केली आहे.
महाराजांच्या 12 गडांना युनेस्कोचा दर्जा प्राप्त. राज ठाकरे म्हणाले की, सरकारने जागतिक वारसा दर्जा हलक्यात घेऊ नये कारण जर निकषांचे योग्य पालन केले नाही तर तो काढून घेतला जाऊ शकतो.
कोंढव्यात बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर घटनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र निषेध करत आंदोलन केले आहे. अमित शहा आणि फडणवीस यांच्या ताफ्याला अडवण्याचा प्रयत्न मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे.
हिंदी भाषेवरील विवादानंतर फडणवीस म्हणाले की, भाषांवरील वाद अनावश्यक आहे आणि सरकार सर्व भारतीय भाषांना समान आदर देऊ इच्छिते. काँग्रेसने याला हिंदी लादण्याचे सुनियोजित षड्यंत्र म्हटले आहे
महाराष्ट्राचे दमदार व्यक्तीमत्त्व राज ठाकरे यांचा 14 जून रोजी वाढदिवस असतो आणि त्यांच्या आयुष्यातील सर्वात जवळची व्यक्ती पत्नी शर्मिला यांच्यासह भेट कशी झाली याची उत्सुकता सर्वांनाच आहे, जाणून घ्या
मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील अपघातानंतर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. राज ठाकरे यांनी भाजप युती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे, काय म्हणाले?
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात किती संवाद आहे हे मला माहीत नाही, त्यामुळे ‘बेगानी शादी में… मला ‘अब्दुला दिवाना व्हायचे नाही’, अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.