सोमवारी मध्य रेल्वेमार्गावरील मुंब्रा स्थानकाजवळ १३ प्रवासी चालत्या लोकल ट्रेनमधून खाली पडल्याची दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला होता तर नऊजण जखमी झाले. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. मध्य रेल्वेच्या उशिरा धावणाऱ्या लोकल ट्रेन आणि कोलमडलेल्या नियोजनामुळे वारंवार निर्माण होणाऱ्या समस्यांचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या दुर्दैवी घटनेमुळे मुंबईकरांकडून प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला आहे. आता या दुर्घटनेला २४ तास पूर्ण झालेला असून दुसऱ्याच दिवशी दिवा रेल्वे स्थानकात भयावह दृश्य दिसून आले आहे. दिवा स्थानकात एसी लोकल ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. ही गर्दी इतकी होती, की एसी लोकलचे दरवाजे बंद होत नव्हते. त्यामुळे एसी लोकल बराचवेळ दिवा स्थानकात थांबून राहिली. प्रवासी लोकल ट्रेनप्रमाणे एसी ट्रेनच्या दरवाजात लटकले होते. दारात लटकलेले प्रवासी काही खेळूया खाली उतरायला तयार नव्हते. या सगळ्या गोंधळामुळे मध्य रेल्वे मार्गावरील लोकल गाड्यांच्या अपुऱ्या संख्येचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Mumbai Local Accident News: मुंबई लोकल अपघातात वेगळाच संशय; जखमी प्रवाशाने नेमकं काय सांगितलं?
सकाळच्या वेळेत अनेकांना कार्यालय गाठायचं असत. काहींना वेळेत पोहोचायचं असत. दिवा रेल्वे स्थानकात कर्जत आणि कल्याणहून येणाऱ्या अप मार्गावरील लोकल ट्रेन भरून येतात. या कारणाने दिवा स्थानकातील प्रवाश्यांना ट्रेनमध्ये जागा नसते. तरीही प्रवासी लोकल ट्रेनच्या फुटबोर्डावर जागा मिळाली तरी ट्रेनमध्ये चढतात. कारण सकाळच्या वेळेत कार्यालय गाठणे गरजेचे असते. त्यामुळे दिवा स्थानकात प्रचंड गर्दी होते आणि यामुळे अनेकदा अपघात होतात. अनेकांचा जीवही जातो. आता सोमवारी झालेल्या अपघातात चार जणांचा जाणीव गेला असून नऊजण जखमी आहेत. त्याहून दोघांची प्रकृती गंभीर आहे. मात्र या दुर्दैवी घटनेनंतरही मध्य रेल्वे प्रशासनाला जाग आलेला दिसत नाही आहे. कारण मंगळवारी एसी लोकल ट्रेनमधील गर्दी आवरण्यासाठी स्थानकात रेल्वे पोलीस किंवा मध्य रेल्वेचे कर्मचारी यापैकी कोणीही उपस्थित नव्हते. यामुळे आता प्रशासनावर प्रश्न उपस्थित होत आहे.
विजेच्या धक्क्याने चिमुकल्याचा मृत्यू; घराच्या गच्चीवर खेळायला गेला अन्…