Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mosoon Update : पेरणीची घाई करू नका : राज्य सरकारचं शेतकऱ्यांना आवाहन

बदलेलेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी झाली होती. आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून पेरणीची घाई करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 03, 2025 | 12:20 AM
पेरणीची घाई करू नका : राज्य सरकारचं शेतकऱ्यांना आवाहन

पेरणीची घाई करू नका : राज्य सरकारचं शेतकऱ्यांना आवाहन

Follow Us
Close
Follow Us:

बदलेलेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी झाली होती. आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. मान्सूनचा प्रवास किमान १० जूनपर्यंत तरी थांबणार असल्याचा अंदाज आहे. या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही इतर भागात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून पेरणीची घाई करू नये, असं आवाहन राज्याच्या कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. राज्यातील बहुतांश भागात मात्र कोरडे हवामान असण्याचा अंदाज आहे. त्यामुळ तापमानात वाढ होणार आहे. विदर्भात ४० अंशापर्यंत कमाल तापमान राहण्याची राहिल तर मराठवाडा आणि खानदेशात ३५ ते ४० अंशांपर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे.

Thane News : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा; बुधवारी शहरातील ‘या’ भागात पाणीकपात

मुंबई, ठाण्यात पावसाची शक्यता

पालघर, ठाणे, मुंबई या जिल्ह्यांमध्ये २ ते ४ जूनपर्यंत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. २ जून रोजी मुंबईसह ठाण्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर पालघरमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांमध्ये मध्यम पावसाची शक्यता आहे. तर पुढचे ४८ तास रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

इशान्य भारतात थैमान

मान्सूनच्या आगमनापासून इशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे अरूणाचल प्रदेश, मिझोरम, सिक्कीमआणि आसाममध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्तर सिक्कीममध्ये सुमारे दीड हजार पर्यटक अडकले आहेत. तर मेघालयमधील भुस्खलनात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ८ पर्यटकांचा शोध अद्यापही सुरू आहे. भूस्खलनामुळे अनेक ठिकाणी रस्ते बंद आहेत. अरुणाचलमध्ये पूर आणि भूस्खलनाशी संबंधित घटनांमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला.

दुकानदारांनो सावधान! शेतकऱ्यांची फसवणूक पडेल महागात; कृषी विभागाकडून भरारी पथके तयार

मदतीपासून राज्यातील गावांना वंचित ठेवू नये सातारा जिल्ह्यातील

माण तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेकडो गावे बाधित झाली आहेत. यामुळे शेतांचे, घरांचे, गुरांचे आणि रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी परिसराची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच कोणतेही बाधित गाव सरकारी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी माण तालुक्यातील पूरग्रस्त गावांची पाहणी केली. तसेच, ज्या ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत त्यांची तातडीने दुरुस्ती करावी.

Web Title: Monsoon delayed dont rush to sow crops maharashtra government appeals to farmers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2025 | 11:49 PM

Topics:  

  • Agriculture News
  • Maharashtra Government
  • Monsoon Update

संबंधित बातम्या

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
1

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

पूरस्थितीत शेती गेली वाहून…! राज्य सरकार कधी देणार मदत स्वतःहून
2

पूरस्थितीत शेती गेली वाहून…! राज्य सरकार कधी देणार मदत स्वतःहून

Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय
3

Devendra Fadnavis: “अजूनही काही भागात पूरस्थिती, त्यामुळे…” मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय

ST Fare Hike: ‘लालपरी’ महागली! ऐन दिवाळीआधी सर्वसामान्यांचा खिसा फाटणार; तिकीट दरात तब्बल…
4

ST Fare Hike: ‘लालपरी’ महागली! ऐन दिवाळीआधी सर्वसामान्यांचा खिसा फाटणार; तिकीट दरात तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.