Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नवी मुंबईत केवळ 111 जागा आणि BJP मध्ये तब्बल 700 पेक्षा अधिक इच्छुक, छाननी करून प्रदेशाकडे पाठवण्यात येणार यादी

नवी मुंबईमध्ये आता निवडणुकांचे बिगुल वाजले असून काही दिवसांमध्येच तारखा घोषित होतील. दरम्यान भाजपमध्ये 700 पेक्षा अधिक इच्छुक उमेदवारांचे अर्ज आल्याचे आता समोर आले आहे, जाणून घ्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 12, 2025 | 01:23 PM
नवी मुंबईत १११ जागांसाठी तब्बल ७०० पेक्षा अधिक अर्ज (फोटो सौजन्य - iStock)

नवी मुंबईत १११ जागांसाठी तब्बल ७०० पेक्षा अधिक अर्ज (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे बिगुल
  • नवी मुंबईच्या लवकरच होणार जाहीर 
  • भाजपच्या ७०० उमेदवारांचे अर्ज 
नवी मुंबई/सिद्धेश प्रधान: नवी मुंबईत पालिका निवडणूक काही दिवसांत घोषित होण्याची शक्यता आहे.  भाजपकडून इच्छुकांचे अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. भाजपमधून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली असून तब्बल ७०० हून अधिक इच्छुकांनी अर्ज जिलाध्यक्षांकडे भरून दिले आहेत. या अर्ज स्वीकृतीसोबतच भाजपने इच्छुक उमेदवारांचा प्रभागनिहाय सर्व्हे प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या उमेदवारात जिंकण्याची क्षमता असेल तसेच स्थानिक नागरिकांचा प्रतिसाद उमेदवाराबाबत कसा आहे? याचा अभ्यास करून तिकिट वाटप  होणार आहे. जे जरी असले तरी आयत्यावेळी इतर पक्षांतील.उमेदवारांना देखील पक्षात रेड कार्पेट अंथरून त्यांचे स्वागत केले जाणार आहे. युती न झाल्यास २८ प्रभाग लढविण्याची तयारी भाजपा करत असल्याचे यानिमित्ताने पाहायला मिळत आहे.

निवडणुकांचे वेध 

कोरोनामुळे तब्बल १० वर्षांनी निवडणूक होणार आहेत. त्यामुळे पक्षात कार्य करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला या निवडणुकीचे वेध लागले असून, अनेकजणांना नगरसेवकपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. यंदाची निवडणूक ही  प्रथमच प्रभाग पद्धतून होणार असल्याने, उमेदवारांना आर्थिक गणितांची देखील जुळवाजुळव करावी लागणार आहे. त्यामुळे ७०० पेक्षा अधिक जण भाजपातून इच्छुक असले तरी कोणता उमेदवार किती खर्च करू शकेल या पडद्याआड असणाऱ्या महत्वाच्या पैलूचा देखील विचार पक्षाला करावा लागणार आहे. 

Nerul–Mumbai Ferry: नवी मुंबईकरांसाठी खुशखबर! नेरुळ-मुंबई जलप्रवास ‘या’ दिवसापासून होणार सुरू; अवघ्या ३० मिनिटांचा प्रवास

पक्षाकडून अंतर्गत सर्वेला सुरुवात

आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा संघटनात्मक पातळीवर तयारीला वेग आला आहे. मंडळ निहाय, प्रभागनिहाय पदाधिकारी बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकींच्या माध्यमातून प्रभागस्तरावरील राजकीय व संघटनात्मक तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. उमेदवार निश्चितीसाठी पक्षाकडून अंतर्गत सर्वे खासगी एजन्सी नेमून पूर्ण केले जात आहेत. त्यातून उमेदवारांच्या ताकदीचा, सक्षमतेचा तसेच नागरिकांमध्ये उमेदवाराची असलेली लोकप्रियता याबाबतचे निकष तपासले जाणार आहेत. यात संघाची भूमिका देखील तितकीच महत्वाची राहणार आहे. 

७०० हून अधिक अर्ज

तब्बल १११ जागांसाठी तब्बल ७०० हून अधिक इच्छुकांनी अर्ज भरून दिले आहेत. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या प्रचंड  असतानाच विरोधी पक्षातील इच्छुकांसाठी देखील पक्षाची दारे उघडी ठेवावी लागणार आहेत.  त्यामुळे निष्ठावंत बाजूला आणि बाहेरचे उमेदवार आत अशी स्थिती निर्माण होऊन ऐनवेळी नाराजी देखील उफाळून येण्याची शक्यता आहे.

एका घरात किती तिकिटे ?

भाजपात सर्वात महत्वाचा फॅक्टर एका घरात एक तिकिट हा आहे. लोकसभा, विधानसभेला कटाक्षाने पक्षाकडून हे सूत्र पाळले जाते.मात्र नुकत्याच झालेल्या नगर परिषदा निवडणुकांमध्ये अनेक आमदारांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे पालिका निवडणुकांमध्ये देखील अनेक ठिकाणी पक्षाकडून आमदारांच्या नातेवाईकांना तिकिटे दिली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजपात एका कुटुंबातून अनेकजण इच्छुक आहेत.अनेकजण माजी नगरसेवक राहिलेले आहेत. त्यांना त्या संपूर्ण उमेदवारांसह, जादा तिकिटांची अपेक्षा आहे.  तर दुसरीकडे नवी मुंबईतील जुन्या नव्यांचा वाद कायम असून, यंदा निष्ठावंतांना देखील पक्षाला मानाचे स्थान द्यावे लागणार आहे.अन्यथा नाराजी उफाळून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपला ही आव्हान पेलावे लागणार आहे.

नवी मुंबई पालिका निवडणुकीसाठी ७०० पेक्षा जास्त अर्ज आले आहेत. अद्याप इच्छुक अर्ज घेऊन जात आहेत. त्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मंत्री गणेश नाईक प्रभारी तर संजीव नाईक निवडणूक प्रमुख आहेत. आ. मंदा म्हात्रे तसेच मी स्वतः असे आम्ही मिळून उमेदवार निवडीची प्रक्रिया राबविणार आहोत. अधिवेशन झाल्यावर बैठक लावण्यात येईल. इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जातील.निवडून येण्याची क्षमता, नागरिकामध्ये असलेली पकड, अंतर्गत सर्वे करून मग उमेदवारांची यादी प्रदेशकडे पाठवून, प्रदेश पातळीवरून निश्चिती होणार आहे – डॉ. राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष, भाजपा, नवी मुंबई

Thane Ghodbunder Road: ठाणेकरांची होणार वाहतूक कोंडी, घोडबंदर रोडवर शुक्रवारपासून वाहतूकीत बदल, असे असतील पर्यायी मार्ग

Web Title: More than 700 aspirants in bjp in navi mumbai list will be vetted at local level and sent to the region

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 01:23 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Marathi News
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : सागर नाईक म्हणजे सहभागृह का? शिवसेनेचे शिवराम पाटील यांचा खडा सवाल
1

Maharashtra Politics : सागर नाईक म्हणजे सहभागृह का? शिवसेनेचे शिवराम पाटील यांचा खडा सवाल

‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ नाटकाची जोरदार चर्चा; मराठी अस्मिता आणि इतिहासाला भिडणारी प्रभावी कलाकृती
2

‘महाराष्ट्र माझा, मुंबई कुणाची’ नाटकाची जोरदार चर्चा; मराठी अस्मिता आणि इतिहासाला भिडणारी प्रभावी कलाकृती

Ahilyanagar News: अकोल्यात अनधिकृत लॅबचा सुळसुळाट! डॉक्टरांची साथ अन् आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
3

Ahilyanagar News: अकोल्यात अनधिकृत लॅबचा सुळसुळाट! डॉक्टरांची साथ अन् आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

Ahilyanagar News: जिल्ह्यातील 20 हजार शेतकऱ्यांना गारपीटीचा फटका, प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु
4

Ahilyanagar News: जिल्ह्यातील 20 हजार शेतकऱ्यांना गारपीटीचा फटका, प्रशासनाकडून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरु

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.