Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नीरा देवघरच्या पाण्यासाठी रास्ता रोको; खासदार मोहिते पाटलांनी सरकारला दिला इशारा

गारवाडपाटी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) इथे नीरा देवघर पाणी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित रास्ता रोको आंदोलनात खासदार मोहिते पाटील बोलत होते.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 07, 2025 | 04:58 PM
नीरा देवघरच्या पाण्यासाठी रास्ता रोको; खासदार मोहिते पाटलांनी सरकारला दिला इशारा

नीरा देवघरच्या पाण्यासाठी रास्ता रोको; खासदार मोहिते पाटलांनी सरकारला दिला इशारा

Follow Us
Close
Follow Us:

अकलूज/कृष्णा लावंड : माळशिरस तालुक्यातील 22 गावांच्या माथ्यावरील दुष्काळाचा कलंक कायमचा पुसून टाकण्यासाठी नीरा देवघरचे पाणी मिळणे गरजेचे आहे. आम्ही संबंधित विभागाला काम सुरु करण्यासाठी 50 दिवसांचा कालावधी देत आहोत. काम सुरु झाले नाही तर मंत्रालयात घुसून आंदोलन करावे लागले तरी मागे हटणार नाही. सरकार बहिरे झाले आहे. त्याच्या कानावर शेतकऱ्याची हाक जात नाही. या सरकारला जाग आणण्यासाठी आमचा लढा सुरु असल्याचे मत माढा मतदार संघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.

गारवाडपाटी (ता. माळशिरस, जि. सोलापूर) इथे नीरा देवघर पाणी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित रास्ता रोको आंदोलनात खासदार मोहिते पाटील बोलत होते. यावेळी आमदार उत्तमराव जानकर, संग्रामसिंह जहागीरदार, शहाजी ठवरे, बाबासाहेब माने, पांडुरंग वाघमोडे, गौतम माने, तुकाराम देशमुख, आप्पा कर्चे, दत्ता मगर, अजय सकट, सादिक सय्यद, सुरेश टेळे, डॉ. मारुती पाटील, विष्णू घाडगे जीवन जाणकर मामा घाडगे व शेकडोच्या संख्येने 22 गावातील नागरिक उपस्थित होते.

मोहिते पाटील पुढे म्हणाले, सरकारकडे हजारो कोटी रुपयांचे रस्ते करण्यासाठी पैसे आहेत. पण शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न असलेल्या नीरा देवघरच्या पाणी योजणेसाठी पैसे नाहीत. गेली 30 वर्षे सरकार माळशिरस तालुक्याला पाणी देण्यासाठी टाळाटाळ करत आहे. मागील खासदारांनी पैसे मंजुर झाले, आता लगेच काम सुरु होईल म्हणून इथल्या शेतकऱ्यांना गाजर दाखवले. पण या योजनेचे काम काही सुरु झाले नाही. पाणी काही आले नाही. मी आणि आमदार जानकर वाट्टेल ती किंमत मोजू पण तुमच्या शिवारात पाणी आणल्याशिवाय राहणार नाही.

आमदार जानकर म्हणाले, सरकारला जाग आणण्यासाठी, येथील शेतकऱ्यांची व्यथा, वेदना सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही शिंगोर्णी ते कोथळे अशी 103 किमी पायी संघर्ष यात्रा काढली. या नीरा देवघरच्या पाण्यासाठी मी विधानसभेत प्रश्नही विचारला. निरा देवघरच्या पाण्याच्या प्रकल्पाइतका कोणताही जुना प्रकल्प महाराष्ट्रात मागे राहिला नाही. गोसे खुर्द योजनेला सरकार 30 हजार कोटी रुपये देऊ शकते पण नीरा देवघरच्या प्रकल्पसाठी तुमच्याकडे 2 हजार कोटी रुपये नाहीत. सरकार मुद्दाम मतांच्या राजकारणासाठी हा प्रकल्प रखडवत आहे. पण आम्ही तुमच्या नरड्यात हात घालून डिसेंबर 26 पूर्वी पाणी शिंगोर्णीच्या डोंगरात सोडल्याशिवाय राहणार नाही. असं जानकर म्हणाले.

मान्यता, मंजुरी आणि निधी हा लबाड खेळ खेळत तुम्ही गेली 30 वर्षे येथील शेतकऱ्याला पाण्यापासून वंचित ठेवले आहे. येत्या 50 दिवसात जर या कामाचे टेंडर नाही निघाले तर तुमचे दात कसे पाडायचे ते आम्ही ठरवू. तुमच्या छाताडावर बसून आम्ही या गावात पाणी आणू. आजचे आंदोलन शांततेच्या मार्गाने करतो आहोत. पण काम सुरु झाले नाही तर येथील शेतकऱ्यांना घेऊन मंत्रलयात घुसायला कमी करणार नाही, असाही इशारा जानकर यांनी दिला.

या गावांसाठी होतेय पाण्याची मागणी

पिंपरी, फडतरी-निटवेवाडी, लोणंद, लोंढे – मोहितेवाडी, गिरवी, भांब, रेडे, कण्हेर, गोरडवाडी, इस्लामपूर, कारुंडे, कोथळे, चांदापुरी, जळभावी, तरंगफळ, पठाणवस्ती, सुळेवाडी, शिंगोर्णी, बचेरी, गारवाड, झिंजेवस्ती, काळमवाडी व पिलीव.

नीरा देवघर प्रकल्पाचे भोर, खंडाळा, फलटण आणि माळशिरस हे लाभक्षेत्र आहे. प्रकल्प सुरु होऊन कित्येक वर्षे झाली पण अजून याची कामे पूर्ण झाली नाहीत. राजकीय चढ उतार पाहून विविध खात्यामध्ये मंजुरीच्या फाईल अडकून पडल्या आहेत. या प्रकल्पची कामे पूर्ण होताच माळशिरस तालुक्याला 3 टीएमसी पाणी मिळेल अशी आशा आहे.

Web Title: Mp dhairyasheel mohite patil has warned the government on the water issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2025 | 04:58 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Malshiras
  • Solapur

संबंधित बातम्या

धक्कादायक! गणपती बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; चाकण परिसरात चार तरुण पाण्यात बुडले
1

धक्कादायक! गणपती बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; चाकण परिसरात चार तरुण पाण्यात बुडले

गाडी न दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला; लोखंडी पाईप डोक्यात घातला अन्…
2

गाडी न दिल्याच्या रागातून तरुणावर हल्ला; लोखंडी पाईप डोक्यात घातला अन्…

अजित पवारांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवरुन काँग्रेसची टीका; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
3

अजित पवारांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवरुन काँग्रेसची टीका; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

सातारा गॅझेटबाबत मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचं मोठं विधान, म्हणाले; येत्या महिनाभरात…
4

सातारा गॅझेटबाबत मंत्री शिवेंद्रसिंहराजेंचं मोठं विधान, म्हणाले; येत्या महिनाभरात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.