Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 12 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईला 36 तासांसाठी अलर्ट; हवामान खात्याकडून जाहीर

उंच लाटांमुळे किनारपट्टी भागात रहिवासी असलेल्या नागरिकांनीदेखील योग्य ती खबरदारी बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 04, 2024 | 12:56 PM
मुंबईला 36 तासांसाठी अलर्ट; हवामान खात्याकडून जाहीर
Follow Us
Follow Us:

भारतीय हवामानशास्त्र विभाग : भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशियन इनफॉर्मेशन सर्व्हिस (INCOIS) या संस्थेच्या विद्यमानाने प्राप्त झालेल्या माहितीनुसार, शनिवार, दि. 4 मे रोजी सकाळी 11.30 वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी रात्री म्हणजे रविवार, दि. 5 मे रोजी रात्री 11.30 वाजेपर्यंत 36 तासांमध्ये समुद्रात भरतीच्या (High tide) वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची (swell surge waves) शक्यता वर्तविली आहे. समुद्र किनारपट्टी परिसरात तसेच सखल भागांमध्ये उसळणाऱ्या लाटांचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भरतीच्या कालावधीत समुद्राच्या लाटांची उंची सरासरी 0.5 मीटर ते 1.5 मीटर इतकी वाढ होणार आहे. परिणामी, येत्या 36 तासांमध्ये नागरिकांनी आणि मच्छीमारांनी समुद्रकिनारी जाण्याचे टाळावे. सर्व यंत्रंणानी सतर्क राहवे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

समुद्रात उसळणाऱ्या उंच लाटाचा इशारा लक्षात घेऊन महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी महानगरपालिकेच्या सर्व साहाय्यक आयुक्तांना पोलिसांसोबत समन्वय साधण्याचे आवाहन केले आहे. तसेच, महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षक यांच्या मदतीने नागरिकांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेषतः उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने समुद्र किनाऱ्यांवर वाढणारी पर्यटकांची संख्या लक्षात घेता अतिरिक्त खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. उंच लाटांमुळे किनारपट्टी भागात रहिवासी असलेल्या नागरिकांनीदेखील योग्य ती खबरदारी बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

मच्छीमार बाधवांना प्रशासनाकडून महत्त्वाच्या सूचना

समुद्रावर उसळणाऱ्या लाटांमुळे मच्छीमार बाधवांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी आपल्या बोटी सुरक्षित अंतरावर ठेवावे, असे आवाहन करण्यात येत आहे. जेणेकरून समुद्रावर उसळणाऱ्या लाटांमुळे बोटी एकमेंकावर धडकून नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

या संपूर्ण परिस्थितीवर बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस तसेच इतर यंत्रणा लक्ष ठेवून आहेत. पर्यटक व किनारपट्टीवर वास्तव्यास असलेल्या सर्व नागरिकांनी घाबरून न जाता दक्ष राहावे, समुद्रात जाऊ नये. तसेच, समुद्र किनारी तैनात असलेले महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक, जीवरक्षक तसेच अधिकारी, कर्मचारी आणि सर्व यंत्रणांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Mumbai alerted for 36 hours announced by meteorological department government of india maharashtra fisherman badhav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2024 | 12:56 PM

Topics:  

  • Government of India
  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणीला सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत असणार मुदत
1

कृषी अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणीला सुरुवात; ‘या’ तारखेपर्यंत असणार मुदत

MPSC नोकर भरतीचा घोटाळा व्यापमपेक्षा मोठा, ऑनलाईन परीक्षा पद्धत तातडीने रद्द करा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी
2

MPSC नोकर भरतीचा घोटाळा व्यापमपेक्षा मोठा, ऑनलाईन परीक्षा पद्धत तातडीने रद्द करा; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अव्वल; एबीसीमध्ये तब्बल ३९.६७ लाख विद्यार्थ्यांचे क्रेडिट्स जमा
3

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अव्वल; एबीसीमध्ये तब्बल ३९.६७ लाख विद्यार्थ्यांचे क्रेडिट्स जमा

मुंबईत साकारणार जगातील सर्वात मोठा ‘Water Metro’ प्रोजेक्ट! 6066 कोटी खर्चून बदलणार मुंबईचं रूप, कसा असेल रुट?
4

मुंबईत साकारणार जगातील सर्वात मोठा ‘Water Metro’ प्रोजेक्ट! 6066 कोटी खर्चून बदलणार मुंबईचं रूप, कसा असेल रुट?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.