
औषध विक्रेत्यांचा व्यवसाय संकटात! ई-फार्मसीला विरोध : मेडिकल चालकांचा देशव्यापी आंदोलनाचा इशारा
ई-फार्मसीमुळे मुंबई महानगरासह देशातील पारंपरिक औषध विक्रेत्यांचा व्यवसाय संकटात आला असून, ई-फार्मसीविरोधात २० मे रोजी देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा मेडिकल्स व्यावसायिकांनी दिला आहे. ई-फार्मसी प्लॅटफॉर्मवर घरपोच औषधे तसेच मोठ्या प्रमाणात सवलत दिली जाते, त्याचा परिणाम पारंपरिक विक्रेत्यांवर होत आहे.ऑनलाईन कंपन्यांच्या आक्रमक मूल्य नीतीमुळे पारंपरिक औषध विक्रेत्यांचा धंद्यावर परिणाम, ग्राहकांची संख्या आणि नफ्यात सातत्याने घट होत आहे. कित्येक ई-फार्मसी प्लॅटफॉर्म कमकूवत नियमांचा फायदा उचलत प्रिस्क्रिप्शनची औषध विक्री, रुग्णांच्या मेडिकल डेटाचा गैरवापर सारख्या गंभीर अनियमिततेला बढावा देण्याचे काम करत आहे. याविरोधात औषध विक्रेत्यांनी २० मे रोजी देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.(फोटो सौजन्य – AI)
Mumbai News: मुंबईकरांचे पाणी आता अधिक शुद्ध होणार! जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता वाढणार
८८ ई-फार्मसी कंपन्या स्थानिक विक्रेत्यांच्या खरेदी खर्वरिक्षा कभी औषधे विकत आहेत. या कंपन्या तोट्यात औषधे विकून किरकोळ विक्रेत्यांना संपवण्याची आणि नंतर नफा कमावण्यासाठी बाजारपेठेवर नियंत्रण मिळवण्याची योजना आखत आहेत. ऑनलाइन फार्मसींनी औषध बाजारातील अंदाजे १० टक्के हिस्सा आधीच काबीज केला आहे, असे मत अजय जोशी, संघटनात्मक सचिव, रिटेल अॅण्ड डिस्पेंसिंग केमिस्ट्स असोसिएशन यांनी व्यक्त केले आहे.
किरकोळ औषध विक्रेत्यांच्या मते, या बदलाचा सर्वाधिक परिणाम पारंपरिक स्थानिक औषध दुकानांवर झाला आहे. जिथे आधीच मर्यादित असलेला नफा आणखी कमी झाला आहे. एमएमआर प्रदेशात अंदाजे ७,००० नोंदणीकृत फार्मसी आहेत. यापैकी अनेक दुकानांनी गेल्या काही वर्षांत ग्राहक संख्या आणि विक्रीमध्ये लक्षणीय घट अनुभवली आहे.
औषध विक्रेत्यांचा आरोप आहे की, कॉर्पोरेट समर्थित ई-फार्मसी कंपन्या बाजारपेठ काबीज करण्यासाठी तोट्यात औषधे विकत आहेत. त्यांच्या मते, कमकुवत नियम आणि देखरेखीचा अभाव यामुळे प्रिक्रिप्शन औषधाची अवैध ऑनलाइन विक्री, बनावट औषधांचा पुरवठा आणि रुग्णांच्या संवेदनशील वैद्यकीय माहितीचा गैरवापर यासारख्या गंभीर समस्यांना खतपाणी मिळत आहे. सध्या देशभरात २०० हून अधिक ऑनलाइन फार्मसी कंपन्या कार्यरत आहेत, कमी किमती आणि सोयीस्कर वितरणामुळे अधिकाधिक ग्राहक डिजिटल प्लॅटफॉर्मकडे आकर्षित होत आहेत. महाराष्ट्र राज्य केमिस्ट आणि फार्मास्युटिकल असोसिएशनचे सरचिटणीस अनिल नवंदर यांनी आरोप केला की, ऑनलाइन फार्मसीच्या वाढीमुळे बनावट औषधांचा धोकाही वाढला आहे. ते म्हणाले की, नैराश्य, निद्रानाश आणि मानसिक आरोग्यावरील औषधे योग्य प्रिस्क्रप्शनशिवाय ऑनलाइन विकली जात आहेत, जे रुग्णांसाठी धोकादायक ठरू शकते.