Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजित पवार-संजय राऊत यांच्यात ‘त्या’ मुद्यावरून शाब्दिक चकमक; इंडिया आघाडीला…

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. आता शेतकरी कर्जमाफीचा विषय अजित पवारांच्या भाषणात नव्हता, हे सांगणे म्हणजे शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ करण्यासारखे आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jan 14, 2025 | 12:28 PM
'माळेगाव'च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच अजित पवारांची 'मेगा मीटिंग'; सर्व कामकाजासह कारखान्याच्या स्थितीची घेतली माहिती

'माळेगाव'च्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच अजित पवारांची 'मेगा मीटिंग'; सर्व कामकाजासह कारखान्याच्या स्थितीची घेतली माहिती

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा कधीच आपल्या भाषणाचा भाग नव्हता, असे स्पष्ट करत राजकीय चर्चेला उधाण आणले आहे. त्यांच्या या विधानावर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी महायुतीतील भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला.

हेदेखील वाचा : Maharashtra Politics : या महिन्यात वाजणार महापालिका निवडणुकांचं बिगुल? कामाला लागण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

संजय राऊत यांनी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केल्याचे ठळकपणे नमूद करत अजित पवार यांना लक्ष्य केले. “शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. आता शेतकरी कर्जमाफीचा विषय अजित पवारांच्या भाषणात नव्हता, हे सांगणे म्हणजे शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळ करण्यासारखे आहे,” असे राऊत म्हणाले. अजित पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना राऊत यांनी सरकारवर ताशेरे ओढले. “महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी फक्त आश्वासनांची खैरात केली आहे. शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा अजित पवारांच्या भाषणात नसेल, तर तो महायुतीच्या जाहीरनाम्यात का होता?” असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान, राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा नेहमीच संवेदनशील राहिला आहे. अजित पवार यांच्या विधानामुळे विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. संजय राऊत यांच्या टीकेनंतर अजित पवार आणि महायुती सरकारची भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा राजकीय रणधुमाळीचे केंद्रबिंदू बनत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

इंडिया आघाडीला जिवंत ठेवलं नाही तर…

देशामध्ये इंडिया आघाडी नक्कीच राहिल. महाविकास आघाडीही नक्कीच राहिल. जर आम्ही इंडिया आघाडीला जिवंत ठेवलं नाही, तर विरोधक शिल्लक राहणार नाहीत. हे विरोधकांना संपवतील. हे हुकूमशाह आहेत. आमच्यासमोर खूप खतरनाक लोक आहेत. इंडिया आघाडी ही फक्त लोकसभा निवडणुकांसाठीच बनवली होती. पण आता ती तशीच कायम ठेवणं देशाची गरज आहे. लोकशाहीची गरज आहे.

दिल्लीत विधानसभा निवडणुका होणार

दिल्लीत विधानसभा निवडणुका होतात. काँग्रेस आणि आप हे एकत्र लढले होते. त्यांची एकही जागा निवडून आली नाही. जर बसून या गोष्टी चर्चेने संपल्या असत्या तर आम्हालाही आनंद वाटला असता. महाराष्ट्रातही आम्ही ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, त्या आम्ही स्वबळावर लढू असे सांगितले आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला युती करणं कठीण असते.

हेदेखील वाचा : Pune News: शिक्षण संस्थांची गळचेपी सुरू असताना सरकार गप्प का? ‘या’ प्रकरणात राजीव गांधी स्मारक समिती आक्रमक

Web Title: Clashes between sanjay raut and ajit pawar nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 12:28 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Criticism of Sanjay Raut

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश
2

Ajit Pawar: ‘या’ विमानतळांच्या विकासासाठी त्वरित कार्यवाही करावी; अजित पवारांचे स्पष्ट निर्देश

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक
3

Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक

पैशाचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका; अजित पवारांच्या वक्तव्याचा संजय राऊतांनी घेतला समाचार
4

पैशाचं सोंग आणता येत नाही तर सरकार चालवू नका; अजित पवारांच्या वक्तव्याचा संजय राऊतांनी घेतला समाचार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.