राहुल गांधी महाकुंभमेळ्याला जाणार का? काय म्हणाले एकदा ऐकाच...
मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी (दि. 3) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात संसदेत गंभीर आरोप केले. राहुल गांधी म्हणाले की, “लोकसभा निवडणुका आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांदरम्यान काही महिन्यांत राज्यातील मतदारांची संख्या हिमाचल प्रदेशच्या लोकसंख्येइतकी वाढली आहे”. राहुल गांधी यांच्या या विधानावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘तुम्हाला महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही’, असे ते म्हणाले.
Introspect instead of insulting Maharashtra !
You have insulted the people of Maharashtra, the land of Chhatrapati Shivaji Maharaj, BharatRatna Dr. Babasaheb Ambedkar, Mahatma Phule and Veer Savarkar.
You have questioned the democratic mandate given by the people of Maharashtra…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) February 3, 2025
महाराष्ट्रातील राज्य निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान 70 लाख नवीन मतदारांचा मतदार यादीत समावेश झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. या आरोपांबाबत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींना माफी मागण्यास सांगितले आहे. त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करताना मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘तुमचा पक्ष हरला म्हणून तुम्ही एनडीएला महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या जनादेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आत्मपरीक्षण करण्याऐवजी तुम्ही बदनामी करण्यात मग्न आहात. यासाठी महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही. माफ करा राहुल गांधी जी’.
काय म्हणाले होते राहुल गांधी?
काँग्रेसचे खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत विधान केले होते. ते म्हणाले होते की, ‘मला या सभागृहाच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीची काही आकडेवारी आणि माहिती लक्षात आणून द्यायची आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान अचानक सुमारे 70 लाख नवीन मतदार आले. आम्ही निवडणूक आयोगाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील सर्व मतदारांची नावे, पत्ते आणि मतदान केंद्रे द्यावीत, जेणेकरून आम्हाला हे नवीन मतदार कोण आहेत याची गणना करता येईल. मला पूर्ण विश्वास आहे की निवडणूक आयोग आम्हाला ही माहिती देईल’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यावर आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाष्य केले आहे.
राहुल गांधींकडून ‘मेक इन इंडिया’चे कौतुक
याचवेळी त्यांनी केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेचे कौतुकही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘मेक इन इंडिया’चा विचार चांगला होता. पण त्यातून काहीही निष्पन्न झालेलं नाही. असं म्हणत नाही की पंतप्रधान मोदींनी प्रयत्न केले नाहीत. पण त्यांच्या प्रयत्नांना कोणतंही यश मिळाले नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. आम्ही उत्पादन चीनला सोपवले. मोबाईल उत्पादन चीनला देण्यात आले. भारताला उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले.