
"मुंबईतील समूह पुनर्विकास योजना देशभर राबवा...", मिलिंद देवरा यांची राज्यसभेत मागणी
मुंबईमध्ये यशस्वीपणे राबविण्यात येत असलेल्या परवडणाऱ्या गृहनिर्माणाद्वारे साध्य होणाऱ्या शाश्वत विकासाविषयी खासदार देवरा यांनी राज्यसभेत विचार मांडले. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी त्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन केले. ही योजना देशभरात राबविली गेल्यास सामान्य आणि कष्टकरी नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळविण्यास मदत होईल, असा विश्वास खासदार देवरा यांनी व्यक्त केला.
खासदार देवरा पुढे म्हणाले की, भारताची एक तृतीयांश लोकसंख्या शहरी भागात वास्तव्यास आहे. शहरांचे देशाच्या ‘जीडीपी’मध्ये दोनतृतीयांश योगदान आहे. २०३० पर्यंत ते ‘जीडीपी’च्या तीन चतुर्थांश इतके होईल. शहरीणकरण भारतासाठी एक मोठी संधी आहे. राज्यघटनेतील सुधारणेनंतर महापालिकांना विकासाचे जादा अधिकार मिळाले. जागतिक पातळीवर अमेरिका, चीन या देशांमध्ये दोन शहरांमध्ये विकासासाची निकोप स्पर्धा असते. त्याप्रमाणे भारतातही राज्यांमधील स्पर्धेबरोबच शहरांमध्ये निकोप स्पर्धा होणे आवश्यक आहे. यासाठी सरकारच्या धोरणांमध्ये शहरी सुधारणा केंद्रस्थानी असायला हव्यात, असे खासदार देवरा म्हणाले. डिजिटल सेवा, कालबद्ध परवानग्या, विविध शुल्कांमध्ये पारदर्शकपणा यांचा अंतर्भाव असावा. जे शहरांमध्ये सुधारणा करतील त्यांचा गौरव व्हायला हवा, असेही ते म्हणाले.
यशस्वी शहरीकरणासाठी परवडणारी घरे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. यामध्ये विकासाच्या मोठ्या संधी आहेत, असे खासदार देवरा म्हणाले. ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील महायुती सरकारने मुंबईतील रमाबाई आंबेडकर नगर ते कामाठीपुरा तसेच धारावी ते भेंडी बाजारपर्यंत क्लस्टर रिडेवलपमेंटच्या माध्यमातून गृहनिर्माण क्षेत्रात क्रांती होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्याचे गृहनिर्माण खाते झोपडपट्टी आणि चाळींमध्ये राहणाऱ्या हजारो वंचित नागरिकांना समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून त्याच ठिकाणी हक्काची सुसज्ज घरे देत आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने १९९५ पासून आजतागायत अडीच लाख कुटुंबियांना त्यांच्या हक्काची घरे दिली आहेत. केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने मुंबईच्या समूह पुनर्विकास योजनेचा अभ्यास करायला हवा. शाश्वत पुनर्विकासाचे मुंबई मॉडेल देशासाठी शाश्वत शहरी विकासातील महत्वाची भूमिका बजावेल. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्रालयाला याचे सादरणीकर करतील. ही योजना देशभरात राबविली गेल्यास सामान्य आणि कष्टकरी नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळविण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास खासदार देवरा यांनी व्यक्त केला.
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा अवकाळीचे सावट, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट