Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बेरोजगार युवक-युवतींची संख्या मोठी असली, तरी…’; काय म्हणाले Mangal Prabhat Lodha?

Mangal Prabhat Lodha: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न देशासमोर ठेवले आहे. हे स्वप्न आता टप्प्याटप्प्याने साकार होताना दिसत असून, भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे, असेही लोढा यांनी सांगितले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 11, 2026 | 04:58 PM
‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’

‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’

Follow Us
Follow Us:
  • उद्योग व आस्थापनाच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचा रोजगार मेळाव्याला पाठिंबा
  • येत्या २९ सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’
  • रोजगार उपलब्ध करून देणे हे केवळ सरकारचे काम नसून, आपले सामाजिक उत्तरदायित्व
मुंबई/Mangal Prabhat Lodha: युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे हे केवळ सरकारचे काम नसून, आपले सामाजिक उत्तरदायित्व आहे. देशात आज शांतता आणि स्थैर्याचे वातावरण आहे त्यामुळे उद्योगधंदे, व्यापार तसेच कुटुंबव्यवस्था सुरळीतपणे सुरू आहे. महाराष्ट्रात बेरोजगार युवक-युवतींची संख्या मोठी असली, तरी त्याचवेळी रोजगाराच्या संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र, अनेकदा नोकरीच्या मुलाखतीला गेल्यानंतर आवश्यक कौशल्ये किंवा आत्मविश्वासाच्या अभावामुळे युवक काही बाबतीत कमी पडतात आणि त्यांना अपेक्षित रोजगार मिळत नाही, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.

येत्या २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी वांद्रे पूर्व येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कौशल्य विकास विभाग आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून ‘एम्प्लॉयर राऊंड टेबल’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा बोलत होते.

मंगल प्रभात लोढा पुढे म्हणाले की, आज प्रत्येक युवकाचे चांगल्या नोकरीचे स्वप्न आहे. विशेषतः कौशल्याधारित क्षेत्रातील रोजगाराच्या संधींकडेही युवकांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. परदेशात कौशल्याधारित क्षेत्रात काम करणाऱ्या युवकांना चांगले वेतन आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील युवकांना कौशल्याधारित आणि चांगल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी उद्योगांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

‘नामांकित संस्था, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांनी…’; Mangal Prabhat Lodha यांचे सर्वांना आवाहन

महाराष्ट्रातील नामांकित ३२ उद्योग व आस्थापना विभागाच्या मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. येत्या रोजगार मेळाव्याबाबत उद्योग व आस्थापनांच्या काही सूचना, हरकती किंवा अडचणी असल्यास त्यांनी त्या लवकरात लवकर कळवाव्यात. कौशल्य विकास विभागाच्या वतीने उद्योग व आस्थापनांसाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. संबंधित उद्योग व आस्थापनांनी हा अर्ज लवकरात लवकर भरून नोंदणी करावी. ऑनलाईन अर्ज भरताना कोणत्याही कंपनीला तांत्रिक अडचण किंवा समस्या उद्भवल्यास त्यांनी कौशल्य विकास विभाग अथवा संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. संपूर्ण महाराष्ट्रातील उद्योग व आस्थापनांनी या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहनही मंत्री लोढा यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या विकासासाठी ज्या पद्धतीने काम करत आहेत, त्याचप्रमाणे राज्याच्या विकासासाठी आपणही आपल्या परीने हातभार लावला पाहिजे, अशी मानसिकता प्रत्येक कंपनीमध्ये असली पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे स्वप्न देशासमोर ठेवले आहे. हे स्वप्न आता टप्प्याटप्प्याने साकार होताना दिसत असून, भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे, असेही लोढा यांनी सांगितले.

Industry and Government must work together to create an employment ecosystem that responds to the needs of a changing economy. At the Employer Round Table in Mumbai, we engaged with industry representatives to understand their hiring requirements, emerging workforce needs and the… pic.twitter.com/oLj54wgUh2 — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) September 11, 2026

कंपन्यांकडे उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या रिक्त जागांची माहिती आम्हाला द्यावी. त्यासाठी आवश्यक कौशल्ये असलेले योग्य युवक-युवती आम्ही उपलब्ध करून देऊ. महाराष्ट्रातील युवक-युवती आपलेच आहेत. त्यांना प्रेम, सहकार्य आणि योग्य संधी देण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यातील कंपन्यांनी या उपक्रमात सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करावे. रामराज्य निर्माण करणे आपल्या हातात नसले, तरी त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणे नक्कीच आपल्या हातात आहे. आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले, तर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासाच्या दिशेने निश्चितच एक पाऊल पुढे टाकता येईल, असे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटले.

गणेशोत्सवातून ‘ड्रग्स फ्री मुंबई’चा संदेश द्या; गणेश मंडळांना मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे आवाहन

याप्रसंगी, कौशल्य विकास विभागाचे आयुक्त अमित सैनी यांनी पीपीटी सादर करून उद्योग व आस्थापनाच्या मनुष्यबळ व्यवस्थापनांच्या प्रतिनिधींना रोजगार मेळाव्याची इंतभूत माहिती दिली. यावेळी, मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार हे देखील उपस्थित होते.

Web Title: Mangal prabhat lodha said providing employment opportunities to youth is social responsibility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • Mangal Prabhat Lodha
  • Mumbai News
  • New employment

संबंधित बातम्या

ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांचा गैरव्यवहार? १०० कोटींच्या नुकसानीवर तडजोडीचा आरोप
1

ग्लोबल रुग्णालयातील १५ टक्के राखीव खाटांचा गैरव्यवहार? १०० कोटींच्या नुकसानीवर तडजोडीचा आरोप

Maharashtra Breaking News Today 2026: नवी दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषदेचा बिगुल, बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप
2

Maharashtra Breaking News Today 2026: नवी दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषदेचा बिगुल, बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप

‘तुम्हीच आरोपींना फरार होण्याची संधी दिली’;रुग्णालयातील मारहाण प्रकरणी हायकोर्ट संतप्त, पोलिसांच्या दिरंगाईवर हायकोर्टाचे ताशेरे
3

‘तुम्हीच आरोपींना फरार होण्याची संधी दिली’;रुग्णालयातील मारहाण प्रकरणी हायकोर्ट संतप्त, पोलिसांच्या दिरंगाईवर हायकोर्टाचे ताशेरे

Mumbai News: प्रसूतीनंतर महिलेला चादरीतून रुग्णालयात नेण्याची वेळ! आरोग्य व्यवस्थेचे धक्कादायक वास्तव
4

Mumbai News: प्रसूतीनंतर महिलेला चादरीतून रुग्णालयात नेण्याची वेळ! आरोग्य व्यवस्थेचे धक्कादायक वास्तव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.