
मुंबईच्या समुद्रात जाणारा प्लास्टिक कचरा आता रोखला जाणार; मालाडमध्ये 'इंटरसेप्टर' प्रकल्प सुरू
महानगरपालिकेला करावा लागणार नाही खर्च
या प्रकल्पाच्या प्रायोगिक टप्यात ‘इंटरसेप्टर’ प्रणालीद्वारे कचरा संकलित करण्यासाठी मुंबई पालिकेला कोणताही खर्च करावा लागणार नाही. या मोफत सेवेमुळे सागरी पर्यावरणाचे रक्षण होण्यासोबतच पालिकेच्या सार्वजनिक निधीची मोठी बचत होण्यास मदत होणार आहे. अलीकडेच झालेल्या मुसळधार पाऊस आणि समुद्राच्या उधाणाव्या भरती दरम्यान जुहू किना-यावर हजारो टन प्लास्टिक आणि कचरा वाहून आल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले होते. नाल्यामधून समुद्रात गेलेला कचरा भरतीच्या वेळी पुन्हा किनाऱ्यावर येतो, ज्यामुळे सागरी जीवसृष्टी चोक्यात येतेच, शिवाय हा कचरा किनाऱ्यावरून हटवण्यासाठी पालिकेला कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त खर्च करावा लागतो, अशा परिस्थितीत कचरा समुद्रात पोहोचण्यापूर्वीच नदी-नाल्यांमध्ये अडवणारी ही ‘इंटरसेप्टर यंत्रणा अत्यंत प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
Mumbai Local Update: लोकलमधील चोरी, हाणामाऱ्या रोखण्यासाठी सर्व डब्यांवर सीसीटीव्हीची नजर
नदी, नाले, समुद्रात कचरा न फेकण्याचे आवाहन
भाजपचे नगरसेवक तेजिंदरसिंग लिवाना यांनी नुकतीच या प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या दर्जाचा आणि प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी तेजिंदरसिंग तिवाना म्हणाले की, ‘एक लोकप्रतिनिधी म्हणून केवळ सूचना देणे किंवा प्रकल्पांचे उद्घाटन करून मोकळे होची पुरेसे नसून, कामाव्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्याची गुणवत्ता तपासणे आणि जनतेच्या हिताचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक मालाड घडवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहू, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला, तसेब मुंबईकरांना आवाहन करताना त्यांनी नदी, नाले किया थेट समुद्रात कचरा न फैकता ओला व सुका कचरा वेगळा करून त्याची विल्हेवाट लावण्याची सूचना केली.
(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)