मुंबई महानगरपालिकेने नेमलेल्या मे. इलेक्ट्रोफाईन रिसायकलिंग कंपनी ही मोहीम राबवत आहे. ई-कचऱ्यात शिसे, पारा, कॅडमियम यांसारखी घातक रसायने असतात. ती माती, पाणी आणि हवेत मिसळल्यास गंभीर प्रदूषण होते.
राज्यातील वनक्षेत्र ३३ टक्के करण्यासाठी मिशन मोडवर हा कार्यक्रम हाती घ्यावा. या कार्यक्रमाच्या समन्वयासाठी हरित महाराष्ट्र प्राधिकरण स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा, असे फडणवीस म्हणाले.
पालखी मार्गावरून प्रवास करणारे वाहनचालक, वारकरी आणि स्थानिक नागरिक झाडांच्या अनुपस्थितीमुळे हळहळ व्यक्त करत आहेत. या महामार्गाच्या कामांमध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या, त्यांना नियमानुसार मोठा मोबदला शासनाने दिला.
भारत एक मजबूत सागरी शक्ती बनण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करत आहे. हे आता केवळ दीर्घकालीन ध्येय राहिलेले नाही; देशाच्या अंदाजे ७,५०० किलोमीटरच्या किनारपट्टीवर या संदर्भातील चिन्हे स्पष्टपणे दिसून येत आहेत.
शेखर गायकवाड यांनी नवीन पिढीला निसर्गाशी जोडण्यासाठी प्रत्यक्ष नदी, तलाव, डोह येथे नेऊन अनुभव देण्याची गरज व्यक्त केली. नद्या व तलावांचे पुनरुज्जीवन केल्यास मानवी स्थलांतर थांबवता येते, असे सांगितले.
सिनारमास प्रकल्पासाठी पोहोच रस्ता तयार करण्याच्या नावाखाली हा विध्वंस उघडपणे करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी जिल्हाधिकारी किशन जावळे यांना तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
भारतातील हरित अर्थव्यवस्था २०४७ पर्यंत ४.१ ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स गुंतवणूक आकर्षित करू शकते, ज्यामुळे ४८ दशलक्ष एफटीई रोजगार निर्माण होऊ शकतात. सीईईडब्ल्यू संशोधनाने ३६ हरित मूल्य साखळ्यांना निदर्शनास आणले आहे.
आईच्या दुधाची युरेनियमची पातळी वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे नवजात बालकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्यासोबतच शरीराला कॅन्सरसारख्या गंभीर आजाराची लागण होऊ शकते.
वनक्षेत्रातील छावण्या, स्फोट आणि वाहतूक मार्गांची वाढ यांमुळे जैवविविधतेला धोका निर्माण होतो. मात्र, संघर्षोत्तर काळात वनविभागाने पुनर्संचयितीकरणासाठी विविध उपक्रम राबवले आहेत.
तज्ज्ञांच्या मते, वाढते ध्वनिप्रदूषण पक्षी, प्राणी आणि मानवांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणारे ठरत असून, पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची गरज अधिक भासू लागली आहे.
कॉसमॉस ही मूळ मेक्सिकोतील वनस्पती असून ती सूर्यफूल कुटुंबातील (ॲस्टेरेसी) सदस्य आहे. या झाडांना मोठ्या प्रमाणावर फुले येतात आणि त्यांची बियाणे वाऱ्याद्वारे किंवा इतर माध्यमांतून सहजपणे पसरतात.
महाराष्ट्र हे देशातील एक उद्योगस्नेही राज्य असून उद्योग आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक उद्योगस्नेही राज्य असून दळणवळणाच्या चांगल्या सु