
घराघरातही हा उत्सव मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. लोक घरात स्वच्छता करून सजावट करतात, रामाची मूर्ती किंवा चित्राची पूजा करतात आणि प्रसाद म्हणून पंचामृत, फळे व गोड पदार्थ अर्पण करतात.श्रीराम जन्मोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सत्य, धर्म, कर्तव्य आणि आदर्श जीवनाचे प्रतीक आहे. भगवान रामांचे जीवन आपल्याला आदर्श आचरण, संयम आणि कर्तव्याची जाणीव असणं असे संदेश देते.
याचपार्श्वभूमीवर मुंबईकरांना देखील रामजन्मोत्सवाचा आनंद घेता येणार आहे. अष्टविनायक क्रीडा मंडळ, चिंचपोकळीच्या वतीने मंडळाचे यंदा अमृत महोत्सव श्रीराम जन्मोत्सव सोहळा दिनांक 26 मार्च ते 29 मार्च या काळात हा उत्सव मोठ्या थाटामाटात संपन्न होणार आहे. श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यासोबत , श्रीराम रथयात्रा, श्रीराम भंडारा, श्री सत्यनारायणाची महापूजा, विभागीय महिलांकरिता हळदीकुंकू समारंभ, विभागीय बालकांसाठी बालक मेळावा असे अनेक कार्यक्रम या उत्सव काळात आयोजित करण्यात आलेले आहेत. तसेच आगामी काळात मोठ्या स्तरावरचा क्रीडा महोत्सव घेण्याचा देखील मंडळाचा मानस आहे.
१९५२ पासून कला, क्रीडा, शैक्षणिक आणि सांस्कृतिक या उद्दिष्टांसोबत उपरोक्त मंडळ लालबाग चिंचपोकळी सारख्या गिरण गावामध्ये कार्यरत असणारे एक अग्रगण्य मंडळ आहे असे मंडळाचे कोषाध्यक्ष विनय गजानन सावंत यांनी आपल्याला माहिती दिली.अमृत महोत्सवी वर्षात मंडळ अध्यक्ष विकास गजानन सावंत सचिव विद्याधर सदैव घाडी आणि कोषाध्यक्ष विनय गजानन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सोहळा कार्यान्वित करणार आहेत. त्यामुळे चिंचपोकळी परिसरात राहणाऱ्या भाविकांना महापूजेचा लाभ घेता येणार आहे.