Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाळेतील विषारी समोसा, मुलांच्या आरोग्याशी खेळ थांबणार तरी कधी? राज्य सरकारचे मार्गदर्शक नियम धाब्यावर

पुन्हा एकदा राज्य सरकारचे नियम धाब्यावर बसवत शाळांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. घाटकोपरमधील शाळेतील मुलांना समोसा खाऊन विषबाधा झाल्याची घटना आता समोर येतेय, नक्की काय घडले

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 18, 2025 | 10:31 PM
घाटकोपरमधील शाळेत समोसा खाल्ल्याने मुलांना विषबाधा (फोटो सौजन्य - Google Gemini AI)

घाटकोपरमधील शाळेत समोसा खाल्ल्याने मुलांना विषबाधा (फोटो सौजन्य - Google Gemini AI)

Follow Us
Close
Follow Us:
  • परिपत्रकाबाबत वरिष्ठ शिक्षणअधिकाऱ्यांना कल्पना नाही 
  • शिक्षण विभाग उदासीन
  • प्रत्येक पालकासाठी धोक्याची सूचना
मुंबई/नीता परबः घाटकाेपर येथील केव्हीके या शाळेत साेमवारी विषबाधेची घटना घडली. शाळेच्या कॅन्टीनमधून समोसे खाल्ल्यानंतर १०-११ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना उलट्या, चक्कर आणि पोटदुखीचा तीव्र त्रास सुरू झाला हाेता.  पाच विद्यार्थी बाधित झाले असले तरी, तब्बल वीस मुलांना याचा त्रास झाल्याचे समोर आले.

शाळेच्या कॅन्टीनमधील एक साधा समोसा खाल्ल्याने अनेक मुले बाधित झाली आणि पुन्हा एकदा  विद्यार्थ्यांच्या आराेग्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. आता ही गंभीर बाब असल्याचे तज्ज्ञ सांगतात. शालेय शिक्षण  विभागाकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी स्पष्ट नियम असूनही, शाळांमध्ये जंक फूडचा विळखा इतका घट्ट आणि धोकादायक असल्याबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे.

दूषित तेलात तळलेले समाेसे विद्यार्थ्यांना का दिले?

शाळेच्या प्राचार्या, रिमा डिसूझा, यांनी सांगितले की, कॅन्टीनमधील एका कर्मचाऱ्याकडून समोसे तळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलात चुकून कापूर पडला होता.  कापूर पडल्याने हे तेल दूिषत झाले तर मग तेल फेकून न देता त्याच तेलात समोसे तळून मुलांना खायला का दिला असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे ही घटना निष्काळजीपणा आणि स्वच्छता मानकांच्या भीषण स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचे वरिष्ठ अधिकारी सांगतात.

उन्हाळ्यात होऊ शकते अन्नातून विषबाधा; अन्नपदार्थांची अशी घ्या काळजी

कागदावरचा कायदा: शाळांमध्ये जंक फूड बंदीचा विसर

मुलांमध्ये वाढणारी लठ्ठपणा आणि आरोग्याच्या समस्या रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अनेक वर्षांपूर्वी परिपत्रक जारी करून शाळा कॅन्टीनमध्ये जंक फूडच्या विक्रीवर बंदी घालण्यात  आली हाेती. या नियमानुसार ‘उच्च चरबी, मीठ आणि साखर’ असलेल्या पदार्थांवर बंदी आहे. शासनाने मुलांच्या ताटातून धोकादायक पदार्थ काढून टाकण्यासाठी परिपत्रक जारी केले हाेते. पण या नियमांबाबत आजघडीला वरिष्ठ शिक्षण अधिकाऱ्यांना पुसटशी कल्पना नसल्याचे  दिसून  आले.

शासनाने बंदी घातलेल्या पदार्थांची यादी:

१. बटाटा चिप्स, पिझ्झा, बर्गर

२. केक, बिस्किटे, चॉकलेट, कँडीज

३. कार्बोनेटेड आणि सर्व प्रकारची हवाबंद शीतपेये

४. वडापाव आणि समोसे यांसारखे तळलेले पदार्थ

त्याऐवजी, सरकारने आरोग्यदायी पर्यायांची शिफारस केली होती

१. चपाती/पराठे, भात, भाज्या, डाळी

२. इडली सांबार, गव्हाचा उपमा, खिचडी

३. नारळ पाणी, लिंबू सरबत, जलजीरा

नियमांच्या अंमलबजावणीची जबाबदारी शाळांच्या मुख्याध्यापकांवर

या नियमांच्या अंमलबजावणीची जबाबदारी शाळांचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापनावर टाकण्यात आली होती. सरकारी परिपत्रकात स्पष्टपणे म्हटले आहे की,  एचएफएसएस पदार्थांमध्ये पोषक तत्वे कमी असतात आणि मीठ, साखर व मैद्याचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि इतर आजार होतात, जे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यक्षमतेवर परिणाम करतात. त्यामुळे, शाळेच्या कॅन्टीनमध्ये जंक फूडचा साठा आणि विक्री प्रतिबंधित करत आहोत आणि शाळेचे मुख्याध्यापक व व्यवस्थापनाने याची अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले  आहे.

शासकीय वसतिगृहातील 50 हून अधिक मुलींना जेवणातून विषबाधा, 30 मुलींवर उपचार सुरू

राष्ट्रीय आदेश: कॅन्टीनसाठी FSSAI चे कठोर नियम

केवळ राज्य सरकारच नाही, तर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने देखील ‘अन्न सुरक्षा आणि मानक (शालेय मुलांसाठी सुरक्षित अन्न आणि आरोग्यदायी आहार) विनियम, २०२०’ अंतर्गत कडक नियम लागू केले आहेत.

  • एफएसएसएआय परवाना अनिवार्य: कायद्यानुसार, प्रत्येक शाळेच्या कॅन्टीनला अन्न व्यवसाय चालवणारे  म्हणून नोंदणी करणे आणि अन्न सुरक्षा व गुणवत्तेसाठी  एफएसएसएआय परवाना घेणे बंधनकारक आहे
  • ५० मीटरचा नियम: या नियमानुसार, केवळ शाळेच्या कॅन्टीनमध्येच नव्हे, तर शाळेच्या आवाराच्या ५० मीटर परिसरातही जंक फूडची विक्री किंवा जाहिरात करण्यास पूर्णपणे बंदी आहे
  • विक्रेत्यांसाठीही नियम: शाळांनी हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की, शाळेच्या आवारात किंवा जवळ परवानगी असलेले बाहेरील विक्रेते किंवा केटरर्स देखील या अन्न सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतील.

Web Title: Poisonous samosas in schools children s health is in danger state government s guidelines not followed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2025 | 10:31 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Mumbai News

संबंधित बातम्या

“राज्य शासनाकडे ‘आयटीआय’च्या माध्यमातून…”; काय म्हणाले मंत्री Managl Prabhat Lodha?
1

“राज्य शासनाकडे ‘आयटीआय’च्या माध्यमातून…”; काय म्हणाले मंत्री Managl Prabhat Lodha?

Eknath Shinde: “मुंबईतील उड्डाणपुलांच्या रस्त्यांचे…”; एकनाथ शिंदेंचे ‘या’ संस्थांना स्पष्ट निर्देश
2

Eknath Shinde: “मुंबईतील उड्डाणपुलांच्या रस्त्यांचे…”; एकनाथ शिंदेंचे ‘या’ संस्थांना स्पष्ट निर्देश

Kolhapur News : कुठे आघाडी तर कुठे बिघाडी; जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत नव्या समीकरणांची मांडणी
3

Kolhapur News : कुठे आघाडी तर कुठे बिघाडी; जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीत नव्या समीकरणांची मांडणी

राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी यांची नियुक्ती
4

राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी यांची नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.