Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठ्यांना OBC तून आरक्षण मिळणार की नाही? मुख्यमंत्री देव्रेंद फडणवीस स्पष्टच म्हणाले – ‘कायद्याच्या चौकटीत…’,

जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि सरकारडून कोणत्याही हालचाली दिसत नाही आहे. त्यामुळे, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस म्हटले आहे...

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 31, 2025 | 06:15 PM
मराठ्यांना OBC तून आरक्षण मिळणार की नाही? मुख्यमंत्री देव्रेंद फडणवीस स्पष्टच म्हणाले – ‘कायद्याच्या चौकटीत…’,
Follow Us
Close
Follow Us:

Devendra Fadnavis On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे, तरीही सरकारकडून कोणताही तोडगा निघताना दिसत नाहीये. या पार्श्वभूमीवर, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

फडणवीस यांची स्पष्ट भूमिका

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनोज जरांगे पाटील ज्या मागण्या करत आहेत, त्याकडे सरकार सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत आहे. ते मराठा समाजाला सरसकट ओबीसीत समाविष्ट करण्याची मागणी करत आहेत. परंतु, न्यायालयाचे काही निर्णय आहेत आणि या निर्णयांचा अवमान करता येणार नाही.

फडणवीस यांनी स्पष्ट केले की, कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन जर असा निर्णय केवळ लोकांना खुश करण्यासाठी घेतला, तर तो न्यायालयात एकाही दिवसासाठी टिकणार नाही. अशा परिस्थितीत मराठा समाजाची फसवणूक झाल्याची भावना निर्माण होईल.

हे देखील वाचा: Supriya Sule: मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक, सुळे यांच्या गाडीचा ताफा अडवला; शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी

चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ उपसमिती यावर चर्चा करत आहे. तसेच, राज्याच्या महाधिवक्त्यांसोबत आणि कायदेशीर सल्लागारांसोबतही चर्चा सुरू आहे.

फडणवीस म्हणाले की, लोकशाहीमध्ये चर्चेतून तोडगा निघतो, आडमुठ्या भूमिकेतून नाही. सरकार कायद्यानुसार चालते. मंत्रिमंडळ उपसमितीने जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतले आहेत आणि जिथे कायदेशीर अडचणी आहेत, त्याची माहिती त्यांना दिली आहे.

सरकारने मराठा समाजासाठी सकारात्मक निर्णय घेतले

फडणवीस यांनी आपल्या भाषणात सांगितले की, राज्य सरकारने २०१४ ते २०२५ या काळात मराठा समाजाच्या हितासाठी अनेक सकारात्मक निर्णय घेतले आहेत. ते म्हणाले, “पहिलं आरक्षण माझ्या नेतृत्वात सरकारने दिलं, दुसरं एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात दिलं, आणि आता पुन्हा माझ्या नेतृत्वातील हे सरकार मराठा समाजाच्या हितासाठीच निर्णय घेत आहे.” या संपूर्ण परिस्थितीतून, फडणवीस यांनी सरकारची कायदेशीर आणि व्यावहारिक भूमिका स्पष्ट केली आहे.

Web Title: Will marathas get reservation from obc or not chief minister devendra fadnavis clearly said

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2025 | 06:00 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Manoj Jarang patil
  • maratha aarkshan
  • Maratha Arakshan news

संबंधित बातम्या

CM Devendra Fadnavis: ‘सौर ऊर्जा हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची ‘मास्टर की’;  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
1

CM Devendra Fadnavis: ‘सौर ऊर्जा हीच महाराष्ट्राच्या प्रगतीची ‘मास्टर की’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र जमीन धोरणामध्ये मोठा बदल! NA घेण्याची आवश्यकता नाही; कृषी क्षेत्रावर होणार विपरित परिणाम?
2

महाराष्ट्र जमीन धोरणामध्ये मोठा बदल! NA घेण्याची आवश्यकता नाही; कृषी क्षेत्रावर होणार विपरित परिणाम?

Devendra Fadnavis in Delhi: फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचा ‘सस्पेन्स’: केवळ सदिच्छा भेट की महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भुकंपाची नांदी
3

Devendra Fadnavis in Delhi: फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याचा ‘सस्पेन्स’: केवळ सदिच्छा भेट की महाराष्ट्रात मोठ्या राजकीय भुकंपाची नांदी

Devendra Fadnavis: “जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध…”,  देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती
4

Devendra Fadnavis: “जपानसोबतचे आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध…”, देवेंद्र फडणवीस यांनी दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.