Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpur News: दहशतवाद्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताने का केली नाही…? अतूल लोंढेंचा केंद्र सरकारला सवाल

ही एक मोठी संधी होती, पण तीही आपण गमावली. हे स्पष्ट दिसत आहे. पाकिस्तान आणि काश्मीरचा मुद्दा हा पूर्णतः द्विपक्षीय आहे. त्यामुळे तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप आम्ही कधीच मान्य करणार नाही,

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 13, 2025 | 10:34 AM
Nagpur News: दहशतवाद्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताने का केली नाही…? अतूल लोंढेंचा केंद्र सरकारला सवाल
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : “दहशतवाद्यांना आमच्या ताब्यात दिल्याशिवाय आम्ही युद्ध थांबवणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला ठणकावून सांगायला हवं होतं,” अशी तीव्र प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली आहे. नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर सवाल उपस्थित केले.

लोंढे म्हणाले, “जेव्हा देशावर राष्ट्रीय आपत्ती येते, तेव्हा सत्ताधारी आणि विरोधक असा भेद न ठेवता सर्वजण एकत्र येतात. तेव्हा आम्हीही एकजूट दाखवली होती. मात्र, प्रश्न असा आहे की जे लोक संसद आणि इतर ठिकाणी हल्ले करत आहेत, त्यांच्या प्रत्यर्पणाची मागणी का झाली नाही? पाकिस्तानने युद्ध थांबविण्याची विनंती केली, तेव्हा आपण अशा अतिरेक्यांना भारताच्या ताब्यात देण्याची अट का घातली नाही?” असा खडा सवाल अतूल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.

India-Pakistan Ceasefire: भारताने अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारली का? युद्धविरामावरून काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना थेट सवाल

“ही एक मोठी संधी होती, पण तीही आपण गमावली. हे स्पष्ट दिसत आहे. पाकिस्तान आणि काश्मीरचा मुद्दा हा पूर्णतः द्विपक्षीय आहे. त्यामुळे तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप आम्ही कधीच मान्य करणार नाही, असा करार आधीच झालेला आहे. मात्र तरीही अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जर धमकी दिली होती की ‘युद्ध थांबवा, नाहीतर व्यापार बंद करू’, तर त्या धमकीला ठाम उत्तर देणे गरजेचे होते. दुर्दैवाने पंतप्रधानांनी त्यावर कोणतीही ठाम भूमिका घेतली नाही.”

“आमची मागणी आहे की पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी. स्वतः पंतप्रधानांनी त्या बैठकीला उपस्थित राहावे आणि संसद अधिवेशन बोलवावे. जेणेकरून या विषयावर सविस्तर चर्चा होईल, तसेच सैन्याच्या पराक्रमाचं सर्वांनी अभिनंदन करावं,” अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

सकाळी उठल्यानंतर नियमित करा ‘या’ बारीक दाण्यांच्या पाण्याचे सेवन, पचनाच्या समस्येपासून तात्काळ मिळेल आराम

शरद पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया

शरद पवार यांच्या भूमिकेवर भाष्य करताना अतूल लोंढे म्हणाले, “सैन्याने केलेल्या पराक्रमाचं अभिनंदन करणं आवश्यक आहे. सर्वपक्षीय बैठकीत काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात, पण त्यातही विरोधी पक्षाला विश्वासात घेणं ही एक नैतिक आणि संवैधानिक जबाबदारी आहे. हे एक महत्त्वाचं प्रोटोकॉल आहे.”

Web Title: Nagpur news why did india demand extradition of terrorists atul londhencha central government question

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2025 | 10:34 AM

Topics:  

  • Atul Londhe
  • Congress
  • Nagpur News

संबंधित बातम्या

शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून…; हर्षवर्धन सपकाळ यांची टिपू सुलतान प्रकरणावर जाहीर माफी
1

शिवप्रेमी बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या म्हणून…; हर्षवर्धन सपकाळ यांची टिपू सुलतान प्रकरणावर जाहीर माफी

Congress News : राजीववादी होतो, राहुलवादी नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा टोला
2

Congress News : राजीववादी होतो, राहुलवादी नाही! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांचा टोला

Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय
3

Maharashtra Politics : अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सला आगीचा फटका; ‘डाल में कुछ काला है’ म्हणत वडेट्टीवारांचा संशय

माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं
4

माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी…; हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टच सांगितलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.