
फोटो सौजन्य सोशल मीडिया
Nagpur : कंत्राटदारांकडून या नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. मनपाचा ‘दणका’ केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याचे दिसून येत आहे. ‘पर्यावरण (बांधकाम आणि पाडकाम) कचरा व्यवस्थापन नियम २०२५’ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मनपाने कंत्राटदारांवर ही अट लादली होती. मात्र, प्रत्यक्ष कामांमध्ये या नियमाचे पालन होत नसल्याचे हा ढिसाळ कारभार असून याची जबाबदारी कोण पुढे येऊन घेईल असे वाटत नाही असे सूत्रांनी सांगितले.
Nagpur : महिंद्रा सुसाट, जेएसडब्ल्यू ‘ भटकला ‘ ; महिंद्राला मिळणार ८०० एकर जमीन !
मनपाच्या नवीन निविदांनुसार गार्डन पाथ-वे, पदपथ (फूटपाथ), ड्रेनेज व सीवर लाईनच्या खोदकामानंतरचे भराव कार्य, बेडिंग वर्क आणि ग्रॅन्युलर सब-बेस यासारख्या कामांमध्ये किमान १० टक्के रिसायकल साहित्य वापरणे बंधनकारक करण्यात आले होते.
नियमानुसार, कंत्राटदारांना भाडेवाडी प्लांटमधून खरेदी केलेले पावती बिल सादर केल्याशिवाय आणि संबंधित अभियंत्याने १० टक्के वापराचे प्रमाणपत्र दिल्यास अंतिम देयक दिले जाणार नव्हते. तसेच प्लांटमध्ये साहित्य उपलब्ध नसल्यास चालकाला दरमहा व्हीएनआयटीकडून चाचणी अहवाल आणि साहित्यांचे दरपत्रक मनपाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या सर्व कड़क अटी कागदावरच राहिल्याने नैसर्गिक संसाधनांची बचत आणि कचरा व्यवस्थापनाचा उद्देश धुळीस मिळाला आहे.
Nagpur : १३ ऑगस्टला हॉकीचे अस्तित्व संपणार ; भवितव्यावर प्रश्नचिन्ह