
'रस्ते की खड्डे?' सिंहस्थाच्या नावाखाली निधीची उधळपट्टी; नागरिकांचा प्रशासनावर संताप
पावसाळा सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी या खड्यामध्ये जमा झालेले आहे. त्यामुळे वाहनचालकांना हा रस्ता आहे की खड्डा, हे कळत नाही आणि त्यामुळे या ठिकाणी मोठ्खा प्रमाणात अपघात होत आहेत. रस्ते तयार होत नसतील तर किमान अशा खड्चांमध्ये मुरूम, खडी टाकून तरी हे खड्डे बजवावेत, ही माफक अपेक्षा नागरिकांनी आहे, मात्र महापालिका प्रशासन आणि शासन यांना याकडेही बघायला वेळ नाहीं. केवळ निधीची उधळपट्टी करायची म्हणून कामे सुरू करून ठेवली आहेत, आता ही कामे होणार कची? आणि तोपर्यंत किती जणांचा बळी घेणार? हाच खरा प्रश्न आहे.
सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत गेल्या अनेक महिन्यापासून रस्त्यांची दूरवस्था झाली आहे. याबाबत महापालिका प्रशासन, आयुक्तांना वारंवार पत्र देण्यात आले. मात्र तांत्रिक कारणे पुढे करून रस्ते दुरूस्तीच्या कामात चालढकल करण्यात येत आहे. किमान मूलभूत प्रश्नांकडे तरी प्रशसानाने गांभीर्याने पहाण्याची गरज आहे. औद्योगिक वसाहतीतील रस्त्यावरील खड्डे मनपा बुजवू शकत नसेल तर ते प्रशसान अन् शासन काय कामाचे? असा उद्विग्न प्रश्न निमाचे अध्यक्ष आशीष नहार यांनी उपस्थित केला.
खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे अनेकांना जीव गमवावा लागल्याने आता नागरिकांचाही संयम सुटू लागला आहे. खड्चात पडून अपघात झाल्याने घरातील कर्त्यांचा मृत्यू झाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर पडली आहेत. त्यामुळे प्रशासनाने विकासाच्या नावाखाली खोदून ठेवलेल्या खड्डयातूनच ‘झुरळ’ बाहेर येतील अन् तेच प्रशासन आणि मत्र्यांना या खोदलेल्या रस्त्यांचा जाब विचारतील, याची जाणीवही ठेवायला हवी.
सिंहस्थासाठी शहरात सोयीसुविधा व्हाव्यात, यात कुणाचेही दुमत नाही. मात्र या कामांचे नियोजन होणेही गरजेचे आहे. शहरातील बहुतांश परिसरातील रस्ते खड्डयात गेले आहेत. या ठिकाणी साधे फलक लावण्याचे सौजन्यही महापालिका अन् ते ठेकेदार दाखवत नाहीत. त्यामुळे अपघातांत मोठी वाढ होऊन लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. औद्योगिक वसाहतीत असलेल्या रस्त्यांचीही मोठ्या प्रमाणात दूरवस्था झाली आहे. या रस्त्यांचे काम लवकरात लवकर मार्गी लावू, असे आश्वासन महापौरांनी सत्काराच्यावेळी दिले होते. मात्र या रस्त्यांचे कामही अजून झालेले नाही. किंबहूना त्यानंतर काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.