भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आलीय. खरातला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी झालीय. तर तिसऱ्या गुन्ह्यात SIT खरातचा ताबा घेण्यात येणार आहे.
विलास लाड हे राज्य सरकारच्या वित्त आणि नियोजन विभागात चेंबर ऑफिसर होते. त्यांना नुकतेच खारघरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने (एसीबी) ६,३७,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.
नाशिकमध्ये रवींद्र एरंडे प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून, अश्लील व्हिडिओ आणि प्राण्यांच्या अवयवांबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
अशोक खरात प्रकरणात नाशिक पोलिसांची निष्क्रियता आणि SITची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बड्या व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले असून या प्रक्रियेत साधू- महतांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नाशिकमध्ये भोंदू बाबा अशोक खरातने कमी किंमतीत जमिनी खरेदी केल्याचा आरोप आहे. 60 लाखांची जमीन 22 लाखात घेतल्याचा दावा आहे. SIT तपासात एजंट आणि महसूल अधिकाऱ्यांची भूमिका तपासली जात आहे.
नाशिकमध्ये इंस्टाग्राम चॅटवरून संतापलेल्या पतीने पत्नीवर भररस्त्यात मारहाण करून कार चढवण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी पत्नीचा जीव नागरिकांनी वाचवला. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली.
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून सुमारे 28 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे.
नाशिकच्या दिंडोरीत भरधाव कार विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 9 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बचावकार्य सुरू असतानाही सर्वांचा मृत्यू झाला.
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील अनुष्का गेल्या दोन वर्षांपासून आधार कार्डासाठी धडपड करतेय. या प्रकरणातून ग्रामीण भागातील सरकारी सेवांतील विलंब आणि नागरिकांच्या अडचणींचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.
नाशिक जिल्ह्यात अवकाळीच्या तडाख्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली असून २ गावे आणि २१ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामीण भागात जलस्रोत आटत चालल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबई, उपनगरांमध्ये देखील आज हलक्या सरींची शक्यता असून काही भागात गारपीट होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला…
नाशिकमध्ये वाढत्या उष्णतेमुळे दररोज सुमारे ८० कोंबड्यांचा मृत्यू होत असून, पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. दररोज शेकडो कोंबड्यांचा मृत्यू होत असल्याने पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
विशाखापट्टणममध्ये एक भीषण घटना समोर आली आहे. एका २९ वर्षीय महिलेची हत्या करून तिच्या शरीराचे तुकडे केल्याप्रकरणी भारतीय नौदलातील एका ३५ वर्षीय तंत्रज्ञाला अटक करण्यात आली.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्रे सुलभ करण्यासाठी 10वी-12वीचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकाच कागदावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दहावी व बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर गुणपत्रक व प्रमाणपत्र स्वतंत्र्य दिले जाते.
नाशिक मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना उष्माघातापासून संरक्षण देण्यासाठी ‘वॉटर बेल’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे. उष्माघातासारख्या आजारांपासून त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.
नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे त्या अनुषंगानं त्र्यंबकेश्वरसह इतर जिल्ह्यात विकास कामांवर जोर दिला जात होता. पण इंधनाच्या तुटवड्यामुळे या सगळ्यावर याचा परिणाम होताना दिसून येत आहे.
वावी येथील १२१७ सालातील यादवकालीन वैजेश्वर मंदिर पाडण्याचा ‘ऊर्जा नाही’ असा दावा करत कॅप्टन अशोककुमार खरात यांनी दिलेला सल्ला पुन्हा चर्चेत आला. ग्रामस्थ संभ्रमात पडले आणि अखेरीस या विषयाला बगल…
नाशिकची भूमी ही कलावंतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि याच परंपरेचा वारसा पुढे चालवत अवघ्या १४ वर्षांच्या विद्यार्थ्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपलं नाव कोरलं आहे. नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे,