नाशिकच्या भोंडू बाबा उर्फ अशोक खरातवर तपास यंत्रणा आपली पकड घट्ट करत आहेत. या प्रकरणात अंमलबारी संचालनालयाने (ईडी) नाशिक, पुणे आणि शिर्डी येथे छापे टाकले आहेत.
मालेगाव येथे तापमान ४१.४ अंशांवर पोहोचत हंगामातील उच्चांक नोंदवला गेला, तर नाशिक येथे ३९.५ अंश तापमान नोंदले गेले. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
‘लँड जिहाद’ आणि ‘लव्ह जिहाद’ या चर्चांनंतर आता ‘कॉर्पोरेट जिहाद’ हा नवा मुद्दा पुढे येत आहे. विविध स्तरांवर या संकल्पनेवर चर्चा सुरू असून, कॉर्पोरेट क्षेत्रातील हस्तक्षेप आणि त्याच्या परिणामांवर मतभेद…
पिण्याच्या पाण्याची लाईन तोडणाऱ्यांवर पाचपट दंड आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, पाणीटंचाईच्या समस्येबाबत स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप केला.
नाशिक जिल्ह्यातील १८७ गाव आणि वाड्यांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहेत.
अनेक महिला कर्मचाऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या असून, आपल्यावर सातत्याने छळ होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि आरोपींना ताब्यात घेतले.
लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर अशोक खरात याचे आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू झाली असून, सिन्नर तालुक्यात त्यांच्या कुटुंबीयांकडे सुमारे ४५ एकर जमीन असल्याची माहिती समोर आली आहे.
महानगरपालिकेकडून नागरिकांना ‘फोन पे’द्वारे घरपट्टी भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या डिजिटल सेवेत देशातील १० महापालिकांचा समावेश करण्यात आला असून, यामुळे नागरिकांना घरबसल्या सोप्या पद्धतीने कर भरता येणार आहे.
नाशिकमध्ये AI चा वापर करून बनावट पोलीस फोटो तयार करत महिलांना प्रेमजाळ्यात ओढून 3 लाखांची फसवणूक करणारा आरोपी आसिफ तडवी अटकेत. पैसे न दिल्यास मॉर्फ फोटोद्वारे ब्लॅकमेल केल्याचे उघड.
भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आलीय. खरातला दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी झालीय. तर तिसऱ्या गुन्ह्यात SIT खरातचा ताबा घेण्यात येणार आहे.
विलास लाड हे राज्य सरकारच्या वित्त आणि नियोजन विभागात चेंबर ऑफिसर होते. त्यांना नुकतेच खारघरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने (एसीबी) ६,३७,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली.
नाशिकमध्ये रवींद्र एरंडे प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून, अश्लील व्हिडिओ आणि प्राण्यांच्या अवयवांबाबत गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
अशोक खरात प्रकरणात नाशिक पोलिसांची निष्क्रियता आणि SITची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. बड्या व्यक्तींना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करण्यात आले असून या प्रक्रियेत साधू- महतांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नाशिकमध्ये भोंदू बाबा अशोक खरातने कमी किंमतीत जमिनी खरेदी केल्याचा आरोप आहे. 60 लाखांची जमीन 22 लाखात घेतल्याचा दावा आहे. SIT तपासात एजंट आणि महसूल अधिकाऱ्यांची भूमिका तपासली जात आहे.
नाशिकमध्ये इंस्टाग्राम चॅटवरून संतापलेल्या पतीने पत्नीवर भररस्त्यात मारहाण करून कार चढवण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी पत्नीचा जीव नागरिकांनी वाचवला. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली.
नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले असून सुमारे 28 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती आहे.
नाशिकच्या दिंडोरीत भरधाव कार विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील 9 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. बचावकार्य सुरू असतानाही सर्वांचा मृत्यू झाला.
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील अनुष्का गेल्या दोन वर्षांपासून आधार कार्डासाठी धडपड करतेय. या प्रकरणातून ग्रामीण भागातील सरकारी सेवांतील विलंब आणि नागरिकांच्या अडचणींचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे.
नाशिक जिल्ह्यात अवकाळीच्या तडाख्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली असून २ गावे आणि २१ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. ग्रामीण भागात जलस्रोत आटत चालल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.