
Latur Zilla Parishad: चाकूरमध्ये राजकीय भूकंप! २६ उमेदवारांची डिपॉझिट जप्त
Latur Zilla Parishad: चाकूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाने अनेक राजकीय दिग्गजांना धक्का दिला आहे. आवश्यक किमान मते न मिळाल्याने तब्बल २६ उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त झाली. निकालानुसार जिल्हा परिषदेच्या ७ तर पंचायत समितीच्या १९ उमेदवारांना मतदारांनी स्पष्ट नकार दिला. विशेष म्हणजे या यादीत शिवसेनेचे आठ व काँग्रेसचे सहा उमेदवार असल्याने या दोन्ही पक्षांवर आत्मपरीक्षणाची वेळ आल्याची चर्चा रंगली आहे.
Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद विजयाचा जल्लोष; दिलीपराव देशमुखांच्या हस्ते सत्कार
चाकूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या पाच व पंचायत समितीच्या दहा जागांसाठी चुरशीची निवडणूक झाली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व भारतीय जनता पक्ष यांच्यात तिरंगी लढत रंगली होती. जिल्हा परिषदेच्या पाच जागांसाठी २० तर पंचायत समितीच्या दहा जागांसाठी तब्बल ४५ उमेदवार रिंगणात उतरले होते. जिल्हा परिषदेच्या पाच गटांपैकी चार गट राष्ट्रवादीकडे गेले, तर भाजपला एका गटावर समाधान मानावे लागले. पंचायत समितीच्या दहा गणांपैकी आठ गण जिंकत राष्ट्रवादीने तालुक्यात सर्वांत मोठा पक्ष म्हणून आपले वर्चस्व सिद्ध केले. काँग्रेस, शिवसेना व अपक्ष उमेदवारांना अपेक्षित यश मिळाले नाही.
अनेक पारंपरिक गटांतही मतदारांनी बदलाचा कौल दिल्याचे स्पष्ट झाले. एकूणच निकालातून तालुक्यातील राजकारणात बदलाची चाहूल लागल्याचे दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनबळ व स्थानिक समीकरणे यांचा अचूक मेळ साधत बाजी मारल्याचे दिसते, तर अनेक ठिकाणी प्रमुख दोन उमेदवारांमध्येच थेट लढत रंगल्याने इतर उमेदवार मागे पडले. मतांच्या अष्टमांश मर्यादेपर्यंतही मते न मिळाल्याने २६ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.
अॅड. नारायण नागरगोजे (शिवसेना). झरी बू गण संगीता जाधव (शिवसेना), कौसरबी शेख (वंचित बहुजन आघाडी). चापोली गण मुसद्दीक देशमुख (काँग्रेस), सांबदेव जोशी (वंचित बहुजन आघाडी). अजनसोंडा गण रोहिणी येणगे (अपक्ष) रोहिणा गण विजयमाला लामतुरे (काँग्रेस), अशा 66 जिल्हा परिषद वातायात समितीच्या निवडणुकीत तालुक्यातील उमेदवारांना आवश्यक किमान मते मिळाली नसल्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. – नरसिंग जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, चाकूर या तालुक्यातील २६ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली असून आगामी काळात राजकीय समीकरणांमध्ये बदलाची चर्चा सुरू आहे.