औसा मतदारसंघातील महिला बचत गटांना स्वतःची हक्काची व सुसज्ज जागा उपलब्ध करून देत त्यांच्या सक्षमीकरणाला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.
शिवसेनेचे (शिंदे) दोन सदस्यही भाजपच्या बाजूने असल्याचा भाजपचा प्रबळ दावा असून एकूण ३१ सदस्यांचे संख्याबळ आपल्या बाजूने असल्याचे भाजपने सांगितले आहे. या संख्याबळावर मॅजिक फिगर आपल्याकडे असल्याचा भाजपचा दावा आहे.
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी डीपीडीसीमध्ये मंजूर केलेली शहर विकासाची २६ कोटींची कामे काँग्रेसच्या नगरसेवकांनी थांबविण्यामागे टक्केवारीचाच सोस दिसतो, असा भाजप नेत्याने आरोप केला आहे.
लातूर शहर महानगरपालिकेची मंगळवारी झालेली पहिली विशेष सर्वसाधारण सभा विविध मुद्यांवरून चांगलीच गाजली. स्थायी समिती व परिवहन समिती सदस्यांची निवड, स्वीकृत सदस्यांची नियुक्ती अशा मुद्द्यावर वाद झाला.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील विविध पाच रस्त्यांच्या कामांसह दोन मोठ्या पुलांच्या बांधकामासाठी आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नांतून राज्याच्या अर्थसंकल्पात तब्बल ३० कोटी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
उदगीर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदाची निवड ९ मार्च रोजी होणार आहे. सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या आरक्षणासाठी राखीव असल्याने या पदासाठी तिरंगी चुरस निर्माण झाली आहे.
लातूर-आज पासून होळीचा महिना सुरू झाला. होळी पेटवताना लोक जी 'कृती' करतात, ती करण्याची पाळी लातूरच्या नागरिकांवर येणार की काय, अशी शंका भेडसावू लागली आहे.
चाकूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निकालाने अनेक राजकीय दिग्गजांना धक्का दिला आहे. आवश्यक किमान मते न मिळाल्याने तब्बल २६ उमेदवारांची अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त झाली.
लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांनी मिळवलेल्या यशानंतर राज्याचे माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विकास कामे दिलेल्या वेळेत पूर्ण करून घेण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना दिले आहे.
सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे सत्ताधारी भाजप व मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचे धोरण असून निवडणुकीच्या काळात मतांचा बाजार मांडणाऱ्यांना जनता धडा शिकवेल असा विश्वास आ. अमित देशमुख यांनी व्यक्त…
लातूर जिल्हा परिषद निवडणूक विकास, मूलभूत प्रश्न आणि योजनांच्या चौकटीबाहेर जाऊन सत्तेसाठीच्या थेट रणसंग्रामात रूपांतरित झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने एकमेकांविरोधात पूर्ण ताकद पणाला लावली आहे.
लातूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांमध्ये सध्या अटीतटीची लढत सुरू…
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी नेमके काय होणार, याबाबत मोठी उत्सुकता होती. मात्र, सकाळी साडेअकराच्या सुमारास २० ते २५ गाड्यांच्या ताफ्यासह येत अंजना चौधरी यांनी स्वतःचा अर्ज मागे घेतला.
लातूर, शिवसेना (उबाठा) या पक्षाच्या अस्तित्वावरच जिल्हा प्रमुख संतोष सोमवंशी यांच्या औसा तालुक्यात भले मोठे प्रश्नचिन्ह लागले आहे. शिवसेना (ठाकरे गट) पक्षातील कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार आहेत.
ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेसने नेहमीच ठोस आणि लोकांच्या गरजांवर आधारित विकास मॉडेल राबवलं आहे. याउलट, भाजपाकडून दिखाऊ उपक्रमांमुळे दिशाभूल केली जात असल्याचा घणाघात काँग्रेस नेते धीरज देशमुख यांनी केला.
लातूर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी जळकोटमध्ये प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून, सर्व संबंधितांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी केले.
लातूर महानगरपालिकेचे रणांगण आटोपल्यानंतर निकाल जाहीर होताच, स्वीकृत सदस्य म्हणून वर्णी लागण्यासाठी काँग्रेस आणि BJP या दोन्ही पक्षांकडे इच्छुकांची गर्दी जमू लागली आहे. राजकारणी मुंडावळ्या बांधलेले इच्छुक देखील जमू लागले.
राज्य निवडणूक आयोगाने लातूर जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताच राजकीय वातावरण तापले आहे. जिल्ह्यातील तब्बल ११८ गणांमध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी विविध पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी हालचाली सुरू केल्या