Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : वाहतूक कोंडीमुळे फायर ब्रिगेडच्या मार्गात अडचणी, आगीत 4 जणांचा बळी, जबाबदार कोण?

नवी मुंबईतील वाशी परिसरात लागलेल्या भीषण आगीत 4 निरपराध नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.आग लागल्यानंतर फायर ब्रिगेडला घटनास्थळी पोहोचायला विलंब झाला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Oct 25, 2025 | 02:27 PM
Navi Mumbai : वाहतूक कोंडीमुळे फायर ब्रिगेडच्या मार्गात अडचणी, आगीत 4 जणांचा बळी, जबाबदार कोण?
Follow Us
Close
Follow Us:
  • वाहतूक कोंडीमुळे फायर ब्रिगेडच्या मार्गात अडचणी
  • आगीत 4 जणांचा बळी, जबाबदार कोण?
  • प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नागरिकांचा संतप्त सवाल

नवी मुंबई/सावन वैश्य : नवी मुंबईतील वाशी परिसरात लागलेल्या भीषण आगीत 4 निरपराध नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.आग लागल्यानंतर फायर ब्रिगेडला घटनास्थळी पोहोचायला विलंब झाला, कारण होतं गल्लीबोळांत अनियंत्रित पार्किंग. या बेशिस्त पार्किंगमुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना आत शिरण्याचा मार्गच नव्हता. ही दुर्घटना केवळ अपघात नसून, शहरातील वाहन व्यवस्थेतील अराजकतेचे आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा बळी ठरला आहे.

रस्त्यांवर गाड्यांचा कब्जा आपत्कालीन सेवांचा जीवघेणा अडथळा कारणीभूत ठरला.  वाशी, ऐरोली, नेरूळ, घणसोली,कोपरखैरणे आणी कामोठे, पनवेल, उलवे या परिसरांमध्ये रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना वाहनं उभी केलेली दिसतात. काही ठिकाणी भंगार गाड्यांचा ढिगारा आणि काही ठिकाणी घराबाहेर कायमस्वरूपी पार्क केलेल्या वाहनांमुळे वाहतुकीसाठी रस्तेच शिल्लक राहिले नाहीत. या बेशिस्त पार्किंगमुळे फायर ब्रिगेड आणि ॲम्बुलन्स सारख्या आपत्कालीन अत्यावश्यक सेवांना वेळेवर पोहोचणं जवळजवळ अशक्य होत आहे.

Karjat News : शिवप्रेमींसाठी पर्वणी; दिवाळीनिमित्ताने रायगड किल्ल्याचं भव्य प्रदर्शन

खरंतर ‘सिस्टम’लाच लागली आहे आग! महानगरपालिका आणि वाहतूक विभाग यांच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचा संयम आता संपत चालला आहे.
नियम असूनही बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई होत नाही, आणि परिणामस्वरूप निष्पाप नागरिकांना जीव गमावावे लागतात. “आजचे बळी हे केवळ अपघाताचे नाहीत, तर निष्काळजी प्रशासनाचे परिणाम आहेत,” अशी भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

नागरिकांनीही जबाबदारी घ्यायला हवी…

अशी बिकट परिस्थिती पुन्हा आलीच तर  नागरिकांनी देखील तितकीच महत्त्वाची भूमिका घ्यायला पाहिजे. गल्ल्यांमध्ये किंवा अरुंद रस्त्यांवर वाहन पार्क करताना प्रत्येकाने हे लक्षात ठेवायला हवं की, उद्या कुठे आग लागली, अपघात झाला, किंवा एखाद्याला ॲम्बुलन्सची गरज पडली तर त्या गाड्यांना मार्ग मिळणं गरजेचं आहे. अशा वेळी प्रत्येक नागरिकाने तत्काळ सहकार्य करून रस्ता मोकळा करणे, वाहन हलवून देणे आणि एकमेकांना मदत करणे हे कर्तव्य आहे. या क्षणी आपली जबाबदारी ओळखणं हेच खऱ्या अर्थाने मानवतेच्या दृष्टीने शहराचं सुरक्षाकवच ठरू शकतं.

प्रशासनाला जाग येईल का?
घटनेनंतर अधिकाऱ्यांनी नवी मुंबईतील गल्लीबोळांचा प्रत्यक्ष आढावा घेतला. त्यांनी सांगितलं की, काही ठिकाणी अशी स्थिती आहे की रिक्षा सुद्धा जाऊ शकत नाही.या समस्येवर तातडीने उपाययोजना करावी, तसेच शहरातील रस्त्यांवर अनेक दिवसांपासून धुळखात पडलेल्या भंगार गाड्यांची विल्हेवाट लावणे, पार्किंगसाठी नियोजन करणे आणि वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

नवी मुंबई ही आधुनिक आणि नियोजित शहर म्हणून ओळखल जाणार शहर आहे. परंतु या घटनेने हे स्पष्ट झालं आहे की, नियम केवळ कागदावर असले तरी पुरेसं नाही. प्रशासनाने नियमानुसार कठोर कारवाई करावी आणि नागरिकांनी शिस्त पाळावी. हाच या आगीमधून मिळणारा खरा धडा  आहे असं म्हणता येईल.

‘मतदार नोंदणीसाठी आता ऑनलाईन सुविधा उपलब्ध’; विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची माहिती

 

Web Title: Navi mumbai traffic jam causes difficulties for fire brigade 4 killed in fire who is responsible

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2025 | 02:23 PM

Topics:  

  • fire Accident
  • latest news
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Navi Mumbai : दिवाळीतील बहिरीनाथच्या उत्सवात रंगला फटाक्यांचा उत्सव ; आगळ्या वेगळ्या आतिषबाजीची सोशल मीडियावर चर्चा
1

Navi Mumbai : दिवाळीतील बहिरीनाथच्या उत्सवात रंगला फटाक्यांचा उत्सव ; आगळ्या वेगळ्या आतिषबाजीची सोशल मीडियावर चर्चा

Mumbai : मीरा-भाईंदर शहर म्हणजे राजकीय प्रयोगशाळा नाही– प्रताप सरनाईक
2

Mumbai : मीरा-भाईंदर शहर म्हणजे राजकीय प्रयोगशाळा नाही– प्रताप सरनाईक

Ratnagiri News : रस्त्याची दुरावस्था संपता संपेना; मांडवे ते साकूर फाटा रस्त्याची दयनीय अवस्था
3

Ratnagiri News : रस्त्याची दुरावस्था संपता संपेना; मांडवे ते साकूर फाटा रस्त्याची दयनीय अवस्था

Mumbai : दिवाळीत परंपरेचा सोहळा, शाश्वत कॉम्प्लेक्समध्ये मातीच्या किल्ल्याने वेधले सर्वांचे लक्ष
4

Mumbai : दिवाळीत परंपरेचा सोहळा, शाश्वत कॉम्प्लेक्समध्ये मातीच्या किल्ल्याने वेधले सर्वांचे लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.