Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon News: अवकाळी पावसामुळे भातपिकांचे नुकसान; शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

Monsoon News: वडगाव मावळ परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 28, 2025 | 05:12 PM
NCP demands compensation for farmers' losses due to heavy rains in Vadgaon Maval

NCP demands compensation for farmers' losses due to heavy rains in Vadgaon Maval

Follow Us
Close
Follow Us:

Monsoon News: वडगाव मावळ : राज्यामध्ये तुफान पावसाने हजेरी लावली आहे. परतीच्या पावसामुळे सर्वांचे हाल झाले आहेत. मात्र सर्वात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचे होत आहे. वडगाव मावळ परिसरात झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार विक्रम देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

तहसील कार्यालयात निवेदन सादर

या वेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मंत्री नारायण ठाकर, ज्येष्ठ नेते शांताराम लष्करी, सरपंच शिवाजी करवंदे, भिकाजी भागवत, मारुती असवले, किसन गवारी, भास्कर पिचड, बुधाजी पिचड, सदाशिव निसाळ, माजी सरपंच मारुती खामककर, बळीराम भोईरकर यांसह पक्षाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मे महिन्यातील असमयिक पावसामुळे यावर्षी भात पेरणी वेळेत होऊ शकली नाही. शेतकऱ्यांनी रोपे गोळा करून अडचणींवर मात करत काही प्रमाणात लागवड केली होती. मात्र, कापणीच्या टप्प्यावर असताना झालेल्या अवकाळी पावसामुळे भात पिके जमिनीत कोसळली, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आता उदरनिर्वाह आणि कर्जफेडीचे संकट निर्माण झाले असून, त्यांना शासनाने दिलासा देणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

तातडीने पंचनामे आणि विमा भरपाईची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रशासनास विनंती केली आहे की, नुकसानग्रस्त भागातील सर्व शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत, तसेच नुकसानभरपाई आणि पीकविमा योजनेअंतर्गत भरपाई रक्कम तत्काळ वितरित करण्यात यावी.

“शेतकऱ्यांना मदत करणे ही शासनाची जबाबदारी”

या वेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. नैसर्गिक आपत्तीसमोर तो नेहमीच असहाय होतो. म्हणूनच शासनाने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पुढील काही दिवस पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय झाल्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. मध्यपूर्व अरबी समुद्रावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हा पट्टा पुढील तीन ते चार दिवस उत्तर दिशेला सरकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात किनारपट्टी लगतच्या भागासह इतर काही भागांमध्ये मोठा पाऊस होऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्र किनारपट्टीजवळून प्रवास करणार असल्याने, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक असेल. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यातील हवामान कोरडे होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Web Title: Ncp demands compensation for farmers losses due to heavy rains in vadgaon maval

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 05:12 PM

Topics:  

  • Maharashtra Rain
  • maval news
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: तीन दिवस छत्र्या घेऊनच फिरा; राज्यातील ‘या’ भागात पाऊस झोडपणार
1

Maharashtra Rain Alert: तीन दिवस छत्र्या घेऊनच फिरा; राज्यातील ‘या’ भागात पाऊस झोडपणार

वडगाव शहराला दिलासा! ३९.३३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेतील दोन जलशुद्धीकरण केंद्रांचे लोकार्पण
2

वडगाव शहराला दिलासा! ३९.३३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेतील दोन जलशुद्धीकरण केंद्रांचे लोकार्पण

Maval News : कार्ला येथे पालखी सोहळ्यानंतर दोन गटात भीषण हाणामारी; दगडफेकीने उडाली खळबळ
3

Maval News : कार्ला येथे पालखी सोहळ्यानंतर दोन गटात भीषण हाणामारी; दगडफेकीने उडाली खळबळ

Pune Mumbai Expressway Traffic : लोणावळा घाटात पुन्हा भीषण वाहतूक कोंडी; ४-५ किमी वाहनांच्या रांगा, प्रवासी त्रस्त
4

Pune Mumbai Expressway Traffic : लोणावळा घाटात पुन्हा भीषण वाहतूक कोंडी; ४-५ किमी वाहनांच्या रांगा, प्रवासी त्रस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.