
या निर्णयावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. परीक्षा सुरक्षितपणे घेण्यासाठी लष्कराची मदत घ्यावी लागत असेल, तर ते सरकारचे अपयश असल्याचे त्यांनी म्हटले.
मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “कालच मराठवाड्यात एका नीट विद्यार्थ्याने आत्महत्या केली. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत. त्यांच्या भविष्याबाबत भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.” त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले.
संजय राऊत म्हणाले की, “जसा दहशतवाद्यांचा अड्डा असतो, तसाच नीट पेपरफुटीचा अड्डा तयार झाला आहे. राज्य सरकारकडे अत्याधुनिक गुप्तचर यंत्रणा आहे. मात्र ती फक्त विरोधकांवर पाळत ठेवण्यासाठी आणि फोन टॅपिंगसाठीच वापरली जाते का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
त्याचवेळी “महाराष्ट्र हे देशातील पेपरफुटीचे मोठे केंद्र बनले असून या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या काही आरोपींचा संबंध भाजपशी असल्याचा दावा त्यांनी केला.” संजय राऊत म्हणाले की, नीटचे प्रमुख प्रदीप जोशी हे आरएसएसशी संबंधित आहेत. भाजप आणि आरएसएसच्या जवळच्या व्यक्तींनाच अशा पदांवर नियुक्त केले जाते,” असा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावी, अशी मागणीही संजय राऊतांनी यावेळी केली.
विधान परिषद निवडणुकांच्या जागावाटपाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, विधान परिषदेच्या 17 जागांपैकी किती जागा लढाव्यात त्याचा लवकरात लवकर निर्णय होईल. मात्र आमच्याकडे जागा जिंकण्याचं संख्याबळच नाही. महायुतीमध्ये भांडण जरी असेल तरी त्याचा फायदा आम्हाला होणार नाही, आमच्याकडे तेवढ्या जागा जिंकण्याचे संख्याबळ नाही. पक्षातील आणि महाविकास आघाडीतील नेत्याचे म्हणणे आहे की, विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होऊ नये यासाठी उमेदवार दिले जातील काँग्रेसला अधिका जागा लढायच्या असतील तर लढू द्या. पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारी आणि संघटना मजबूत करण्याची तयारी केली पाहिजे, असं लमता वाटते.