
ड्रग्ज नको, मैदानी खेळांना प्राधान्य द्यायला हवे! खासदार संजय दिना पाटील यांचा युवकांना व्यसनमुक्तीचा संदेश
वाढत्या ड्रग्जच्या विळख्यात अडकत चाललेल्या तरुण पिढीला योग्य दिशा मिळावी, युवकांनी व्यसनापासून दूर राहून क्रीडा आणि सकारात्मक उपक्रमांकडे वळावे तसेच समाजात ड्रग्जविरोधी जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने स्व. दिना बामा प्रतिष्ठान व सैयद अझरुद्दीन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विक्रोळी, टागोरनगर येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेला मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमी, स्थानिक नागरिक व युवकांनी उपस्थित राहत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या स्पर्धेच्या माध्यमातून युवकांना ‘ड्रग्जला नाही, क्रीडेला होकार’ असा सामाजिक संदेश देण्यात आला.(फोटो सौजन्य – istock)
गंभीर आव्हान बनले असून अनेक तरुण चुकीच्या मार्गाला अवलंबत आहेत. व्यसनाधीनतेमुळे केवळ व्यक्तीच नव्हे तर संपूर्ण कुटुंब उद्धवस्त होत असून समाज व देशाच्या भवितव्यावरही त्याचा परिणाम होत आहे.ईशान्य मुंबई परिसरात वाढत्या ड्रग्जच्या समस्येविरोधात खासदार संजय दिना पाटील यांनी यापूर्वीही वेळोवेळी आवाज उठविला आहे. विविध बैठका, पोलिस प्रशासन व संबंधित अधिकाऱ्यांसोबतच्या चचांमध्ये त्यांनी ड्रग्जविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.परिसरात सुरू असलेल्या अवैध ड्रग्ज व्यवहारांवर अंकुश आणण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, युवकांमध्ये जनजागृती करावी तसेच शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात अधिक दक्षता प्रशासनाकडे केली आहे. घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी सातत्याने प्रशासनाकडे केली जात आहे.
ईशान्य मुंबईतील युवकांना क्रिकेटसारख्या खेळांमध्ये मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पाटील यांनी सांगितले. अनेक गुणवंत खेळाडूंना आर्थिक अडचणीमुळे पुढे जाता येत नाही, त्यामुळे अशा स्पर्धांमधून त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले. क्रीडा क्षेत्रामुळे युवकांमध्ये शिस्त, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता अधिक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“शासन, समाजाने नशामुक्तीचा संदेश …”; काय म्हणाले मंत्री Mangal Prabhat Lodha?
याच पार्श्वभूमीवर युवकांना व्यसनमुक्त जीवनाची प्रेरणा मिळावी व त्यांच्यात क्रीडा संस्कृती वाढीस लागावी यासाठी या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या अंतिम सामन्यांना ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील, कळवा-मुंब्रा विधानसभेचे आमदार जितेंद्र आव्हाड तसेच प्रभाग क्रमांक ११४ च्या नगरसेविका राजोल पाटील यांनी उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन दिले. यावेळी खा. संजय दिना पाटील यांनी युवकांशी संवाद साधताना ड्रग्जविरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज अधोरेखित केली. युवकांनी व्यसनाच्या आहारी न जाता शिक्षण, क्रीडा आणि सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.