Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अंतिम अधिसूचना येईपर्यंत नामांतर नाही’; राज्य सरकारची उच्च न्यायालयात हमी

औरंगाबादचे 'छत्रपती संभाजीनगर' नामांतरण करण्याबाबतची अंतिम अधिसूचना येईपर्यंत औरंगाबादच्या जिल्हा आणि महसूल विभागाच्या दस्ताऐवजांवरील नावं बदलण्यात येणार नाहीत, अशी हमी सोमवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 24, 2023 | 09:48 PM
Court Decision

Court Decision

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ नामांतरण करण्याबाबतची अंतिम अधिसूचना येईपर्यंत औरंगाबादच्या जिल्हा आणि महसूल विभागाच्या दस्ताऐवजांवरील नावं बदलण्यात येणार नाहीत, अशी हमी सोमवारी राज्य सरकारने उच्च न्यायालयात (Mumbai High Court) दिली.

जुलै 2022 मध्ये औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर करण्याचा निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. याचिकेवर प्रभारी मुख्य न्या. संजय गंगापूरवाला आणि न्या. संदीप मारणे यांच्यासमोर सुनावणी झाली. तेव्हा, टपाल कार्यालये, महसूल विभाग, स्थानिक पोलीस, कनिष्ठ न्यायालयांवरही संभाजीनगरचा उघडपणे उल्लेख सुरू असल्याची याचिकाकर्त्यांकडून तक्रार करण्यात आली. मात्र, या संदर्भात हरकती, आक्षेप मागविल्या असून, 10 जूनपर्यंत नामांतरणाला निर्णय घेणार नाही, असे महाधिवक्त्यांनी सांगितल्याची आठवण खंडपीठाने याचिकाकर्त्यांना करून दिली. त्यावर महसूल विभाग आणि जिल्हा अधिकाऱ्यांना नावात बदल न करण्याच्या सूचना दिल्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी पुन्हा एकदा न्यायालयाला सांगितले. त्याची दखल घेऊन न्यायालयाने प्रकऱण ७ जून रोजी अंतिम सुनावणीसाठी निश्चित केले.

इतिहासाचा शस्त्र म्हणून वापर

सुनावणीदरम्यान, याचिकाकर्त्यांनी बाजू मांडताना अनेक आरोप राज्य सरकारवर केले त्यानुसार, राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेला नामांतराच्या निर्णयाला कोणताही कायदेशीर आधार नाही हा एक राजकीय फायदा मिळवून घेण्यासाठी घेतलेला निर्णय़ आहे, असा दावा याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ युसूफ मुच्छाला यांनी केला. आपला देश धर्मनिरपेक्ष म्हणून ओळखला जातो. येथील नागरिक गुण्यागोविदांने राहत असताना आता देशाला भूतकाळाच्या कैदेत जखडून ठेवायचे आहे का? असे वाद निर्माण कऱणारे मुद्दे का काढायचे ? इतिहासाचा शस्त्र म्हणून वापर करायचा आहे का असे सवालही मुच्छाला यांनी उपस्थित केले.

मुस्लिम बहुल भागात नामांतराची मोहीम

मुस्लिम बहुल भागात नामांतराची मोहीम हाती घेण्यात आली आहे. हे मूलभूत अधिकाराचे उल्लंघन नाही का? इतिहासाची उजळणी सुरू आहे का? या प्रवृत्तीला आळा घालणे आणि अंकुश ठेवणे आवश्यक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले असल्याचा दाखलाही मुच्छला यांनी दिला. तसेच जुलै २०२२ मध्ये तातडीच्या सुनावणीची मागणी करून याचिका करण्यात आली होती. परंतु वेळेच्या कमतरतेचे कारण देऊन अयोग्य पद्धतीने नामांतरणाची प्रक्रिया जोमाने सुरू असल्याचतेही ते म्हणाले. मात्र, नामांतर हा धार्मिक मुद्दा असल्याचा याचिकाकर्त्याचा गैरसमज असल्याचा दावा करून महाधिवक्त्यांनी याचिकाकर्त्यांच्या युक्तिवादाला विरोध केला.

काय आहे प्रकरण?

औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नाव बदलण्याचा प्रयत्न यापूर्वीही करण्यात आला असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मविआ सरकारने राजकीय फायद्यासाठी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या अंतिम बैठकीत दोन्हीं शहरांच्या नामांतराचा ठराव बेकायदेशीरपणे मांडला. त्यानंतर १६ जुलै २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्त्वाखालील सरकारने या नामकरणावर शिक्कामोर्तब केले. मात्र सरकारचा हा निर्णय राज्यघटनेतील संबंधित तरतुदींचे उल्लंघन असल्याचा आणि दोन समाजांत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

Web Title: No name change till final notification guarantee of state government to high court nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2023 | 09:48 PM

Topics:  

  • aurangabad
  • Court Decision
  • maharashtra
  • Mumbai
  • Mumbai High Court

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर
3

तुमचा देखील होईल सन्मान! Navabharat Influencer Summit 2025 च्या नॉमिनेशनची शेवटची तारीख 5 ऑक्टोबर

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…
4

चंद्रकांत पाटलांनी आयोगाच्या घोषणेआधीच फोडलं वेळापत्रक; आगामी निवडणुकीबाबत थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.