• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • No One Political Party Will Be Allowed To Roam The Village Nrka

…तर कोणत्याही राजकीय पक्षाला गावात फिरकू देणार नाही; शेतकरी संघटनेचा निर्धार

शेतीक्षेत्राला खुली अर्थव्यवस्था, खुलेकरणाचे वारे लागल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. सर्व शेतमालावरील व तंत्रज्ञानावरील निर्यात बंदी उठली पाहिजे, दोन कारखान्यांमधील अंतराची अट रद्द झाली पाहिजे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 23, 2022 | 05:02 PM
…तर कोणत्याही राजकीय पक्षाला गावात फिरकू देणार नाही; शेतकरी संघटनेचा निर्धार
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

इस्लामपूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : शेतीक्षेत्राला खुली अर्थव्यवस्था, खुलेकरणाचे वारे लागल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. सर्व शेतमालावरील व तंत्रज्ञानावरील निर्यात बंदी उठली पाहिजे, दोन कारखान्यांमधील अंतराची अट रद्द झाली पाहिजे. या मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाला गावात फिरकू दिले जाणार नाही, असा निर्धार शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इस्लामपुरात केला.

येथील निर्मला सांस्कृतिक भवन मध्ये शेतकरी मेळावा झाला. यावेळी राज्य उपाध्यक्ष ऍड. अजित काळे, कार्याध्यक्ष कालिदास आपेट, महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष वर्षा काळे उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा अध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी स्वागत केले.

शेतकरी नेते रघुनाथ पाटील म्हणाले, केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी विरोधात आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून हे अनुभवत आलो आहे. शेतकरी हिताच्या विरोधी भूमिका आहे. शेतकऱ्यांचे वाटोळे करण्याचे काम सध्या सुरू आहे. ऊस उत्पादकांसाठी असणारा एसएमपीचा कायदा शरद पवार आणि त्यांच्या पाळीव शेतकरी संघटनांनी एकत्रित येते २००९ ला रद्द केला. आता पुन्हा एफआरपीच्या कायद्यातील शेतकऱ्यांचे हक्क हिरावून घेतले आहेत. शेतकऱ्यांना दर मागण्यासाठी कोणत्याही तरतुदी ठेवलेल्या नाहीत.

ते म्हणाले ,”देशातील भाजप सरकार आणि राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या चारही राजकीय पक्षांना त्यांची जागा दाखवून द्या. ऊस व इथेनॉल कारखान्याची अंतराची अट जाणीवपूर्वक ठेवण्यात आली आहे. नव्याने कोणालाही इथेनॉलची निर्मिती करता येणार नाही. कायद्यानेच राजकारण्यांनी ही तरतूद केली आहे. शेतकऱ्यांना गरीब करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऊसाला भावही देत नाहीत आणि दुसरे कारखाने उभे करू दिले जात नाहीत. चारही राजकीय पक्षांना सळो की पळो करा असा सल्लाही त्यांनी दिला.

धनंजय काकडे म्हणाले, “कारखान्याच्या माध्यमातून राजकारणी दलाल झाले आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी शेतकऱ्यांचे कधीही भले केले नाही. त्यांनी शेती व्यवस्था मोडीत काढली आहे.”

माणिक शिंदे म्हणाले,”ज्या राजकारण्यांनी तुम्हाला तुटले त्यांनाच तुम्ही मतदान करता त्यांना मतपेटीतून बाजूला सारा.” वर्षा काळे म्हणाल्या,”महिलांनी संघटित होणे गरजेचे आहे.”

ऊस नियंत्रण समितीचे सदस्य बाळासाहेब पठारे म्हणाले,”उसाला योग्य भाव मिळाला नाही तरी शेतकरी ऊस उत्पादना पासून बाजूला जाईल. मूठभर लोकांच्या हाती कारखादारी आहे, तोपर्यंत तरी शेतकरी आर्थिक दृष्ट्या सक्षम होणार नाही. उत्तर प्रदेश आणि गुजरात येथे खाजगी कारखानदारी आहे. तेथे उसाला दर मिळतो. याउलट महाराष्ट्रात सहकारी तत्त्वावरील कारखानदारी राजकारण्यांनी मोडीत काढली आहे.आणि खासगी कारखानदारी ताब्यात घेतली आहे.ते शेतकरी हित पाहतच नाहीत.”

शिवाजीनाना नांदखिले यांचे भाषण झाले. धनपाल माळी यांनी आभार मानले. शेतकरी संघटनेचे लक्ष्मण पाटील, केतन जाधव, प्रणव पाटील, माणिक पाटील, रवींद्र पिसाळ, माणिक व परशुराम माळी,नंदू पाटील शंकरराव मोहिते, प्रदीप पवार यांनी संयोजन केले.

सुमनताई अग्रवाल यांना लाखाची थैली ..!

शेतकरी संघटनेच्या माध्यमातून राज्यभरात आवाज उठवण्याचे काम करणाऱ्या पहिल्या फळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या महिला आघाडीच्या माजी अध्यक्ष सुमनताई अग्रवाल यांना एक लाख रुपये देत क्रांतिवीर आप्पासाहेब ऊर्फ रामचंद्र भाऊराव पाटील प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ व कमल पाटील यांनी सत्कार केला. यावेळी प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.
सुमनताई अग्रवाल मुळच्या वरुड -वर्धा येथील आहेत.

शेतकरी निर्धार..!

लोकसभा, विधानसभेसह कोणतेही राजकीय व्यासपीठावरून साखर कारखानदार निवडणूक लढवीत असेल तर त्याला पराभूत करा. महामंडळाच्या नावाखाली टनाला दहा रुपये कपात करण्याच्या आदेशाची होळी करा.

वीज बिल भरताना आपल्या शेतात असणाऱ्या वीज वितरण कंपन्यांच्या तारा, खांब, डीपी असल्याची जाणीव करून द्या. स्वातंत्र्यपूर्व काळात याबाबत कायदा असल्याची माहिती देत दबाबतंत्र वापरा. शेतीक्षेत्राला खुली अर्थव्यवस्था, खुलेकरणाचे वारे लागल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.

रघुनाथदादा व्हिलचेअर..!

शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील हे दोन महिन्यांपूर्वी एका अपघातात जखमी झाले आहेत. ते आजच्या मेळाव्यात व्हिलचेअरवरून आले होते. शेतकऱ्यांच्या प्रती असलेल्या भावनेचे अनेक वक्त्यांनी कौतुक केले. तीन तासांहून अधिक वेळ ते व्यासपीठावर व्हिलचेअरवरून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत होते.

Web Title: No one political party will be allowed to roam the village nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2022 | 05:02 PM

Topics:  

  • Raghunath Patil

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘कराड आणि मलकापूरमध्ये भाजपचाच नगराध्यक्ष असेल’; आमदार अतुल भोसलेंचा विश्वास

‘कराड आणि मलकापूरमध्ये भाजपचाच नगराध्यक्ष असेल’; आमदार अतुल भोसलेंचा विश्वास

Nov 19, 2025 | 11:43 AM
Su-57E Transfer : ‘अदृश्य विमान’ देऊन रशियाने भारताला करून दिली मैत्रीची आठवण; 100% तंत्रज्ञान हस्तांतरणाची तयारी

Su-57E Transfer : ‘अदृश्य विमान’ देऊन रशियाने भारताला करून दिली मैत्रीची आठवण; 100% तंत्रज्ञान हस्तांतरणाची तयारी

Nov 19, 2025 | 11:43 AM
आयफोन युजर्स तुम्हालाही Siri आवडत नाही का? Apple लवकरच मोठा बदल करण्याची शक्यता, साईड बटनमध्ये मिळणार ही खास सुविधा

आयफोन युजर्स तुम्हालाही Siri आवडत नाही का? Apple लवकरच मोठा बदल करण्याची शक्यता, साईड बटनमध्ये मिळणार ही खास सुविधा

Nov 19, 2025 | 11:41 AM
Aadhaar Card Update News: तुमच्या भेटीला येत आहे नवीन आधार कार्ड; अधिक सुरक्षित, गोपनीय अन् आधुनिक!

Aadhaar Card Update News: तुमच्या भेटीला येत आहे नवीन आधार कार्ड; अधिक सुरक्षित, गोपनीय अन् आधुनिक!

Nov 19, 2025 | 11:35 AM
उच्चशिक्षणात डिजिटल परिवर्तनाची गती! मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मुंबईतील कार्यक्रमात निर्देश

उच्चशिक्षणात डिजिटल परिवर्तनाची गती! मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मुंबईतील कार्यक्रमात निर्देश

Nov 19, 2025 | 11:30 AM
‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे पोटात वाढते तीव्र उष्णता, पोटदुखी वाढून आम्लपित्तमुळे पोहचेल शरीराला हानी

‘या’ पदार्थांच्या सेवनामुळे पोटात वाढते तीव्र उष्णता, पोटदुखी वाढून आम्लपित्तमुळे पोहचेल शरीराला हानी

Nov 19, 2025 | 11:28 AM
World Toilet Day: 19 नोव्हेंबरला का साजरा केला जातो जागतिक शौचालय दिन? इतिहास, महत्त्व आणि थीम घ्या जाणून

World Toilet Day: 19 नोव्हेंबरला का साजरा केला जातो जागतिक शौचालय दिन? इतिहास, महत्त्व आणि थीम घ्या जाणून

Nov 19, 2025 | 11:21 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.