Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रेवदंडा तलाठी कार्यालयात चाललंय तरी काय ! सातबारा उताऱ्यावर वारस नोंदीसाठी 5000 रुपयांची लाच घेताना अधिकाऱ्यांना पकडले

भ्रष्टाचाराच्या घटना सातत्याने वाढताना दिसत आहे. अशीच एक घटना रेवदंड्यात घडली आहे. रेवदंडा महिला तलाठ्यासह चौल मंडळ अधिकारी यांना लाच घेताना पकडले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: May 07, 2025 | 08:51 PM
रेवदंडा तलाठी कार्यलयात चाललंय तरी काय ! सातबारा उताऱ्यावर वारस नोंदीसाठी पाच हजारांची लाच घेताना अधिकाऱ्यांना पकडले

रेवदंडा तलाठी कार्यलयात चाललंय तरी काय ! सातबारा उताऱ्यावर वारस नोंदीसाठी पाच हजारांची लाच घेताना अधिकाऱ्यांना पकडले

Follow Us
Close
Follow Us:

अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथे एका जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वारस नोंदवण्यासाठी प्रत्येकी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या चौल मंडळ अधिकारी व महिला तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड यांच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई दिनांक 7 मे 2025 रोजी पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.

नेमके प्रकरण काय?

तक्रारदार यांना अखत्यारपत्र दिलेल्या महिलेची जमीन मौजे आगरकोट, रेवदंडा, तालुका अलिबाग येथे असून त्या जमिनीचे सातबारा उताऱ्यावर वारस नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. यासाठी संबंधित कागदपत्रे जमा करण्यासाठी तक्रारदार दिनांक 5 मे 2025 रोजी चौल मंडळ अधिकारी विजय विश्वनाथ मापुसकर आणि तलाठी वसुंधरा धोंडू धुमाळ यांच्या कार्यालयात गेले होते. यावेळी दोघांनीही सातबारा उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी प्रत्येकी 5,000 रुपये, असे एकूण 10,000 रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने 6 मे रोजी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

Devendra Fadnavis: “आगामी 5 वर्षात महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात…”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तक्रारीच्या अनुषंगाने विभागाच्या पथकाने 6 मे रोजी पडताळणी केली असता, मंडळ अधिकारी आणि तलाठ्याने लाचेची मागणी केली असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार 7 मे रोजी सापळा रचण्यात आला. सापळा कारवाईदरम्यान तलाठी वसुंधरा धुमाळ यांनी तक्रारदाराकडून मागणी केलेली पाच हजार रुपयांची लाच पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत स्वीकारली. लाच स्वीकारल्यानंतर त्या कार्यालयातून निघण्याच्या तयारीत असताना तक्रारदाराच्या इशाऱ्यावरून त्यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले.

दुसरीकडे, मंडळ अधिकारी विजय मापुसकर यांनी स्वतःसाठी मागितलेली पाच हजार रुपयांची लाच नंतर आणण्याचा संकेत दिला होता. त्यांनीही लाचेची मागणी केल्यामुळे त्यांनाही पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

सदर कारवाई रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे यांच्या नेतृत्वाखाली विनोद जाधव, अरुण करकरे, महेश पाटील, सुषमा राऊळ आणि सागर पाटील यांच्या पथकाने केली.

चित्रकार रामदास लोभी यांच्या चित्रांचे मुंबईत प्रदर्शन, केव्हा आणि कुठे असणार ‘हे’ प्रदर्शन

महत्वाचे आवाहन: रायगड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणताही एजंट शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काशिवाय अतिरिक्त लाचेची मागणी करत असल्यास, कृपया तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रायगड-अलिबाग कार्यालयाशी संपर्क साधावा.

Web Title: Officials caught taking a bribe of rs 5000 for heir registration at satbara utara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2025 | 08:49 PM

Topics:  

  • corruption news
  • maharashtra
  • Marathi News

संबंधित बातम्या

Karjat News : आर्डे गावात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर, दिवसाआड केवळ15 मिनिटे पाणी
1

Karjat News : आर्डे गावात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर, दिवसाआड केवळ15 मिनिटे पाणी

Inflation Alert: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमती वाढण्याची भीती; नेमकं काय महागणार?
2

Inflation Alert: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमती वाढण्याची भीती; नेमकं काय महागणार?

Tata Sons IPO : Ratan Tata, Noel Tata यांच्या विचारांविरोधात जाणार निर्णय! इच्छा नसतानाही Tata Sons शेअर बाजारात उतरणार?
3

Tata Sons IPO : Ratan Tata, Noel Tata यांच्या विचारांविरोधात जाणार निर्णय! इच्छा नसतानाही Tata Sons शेअर बाजारात उतरणार?

Sindhudurg : सिंधुदुर्गात राज्यातील पहिली वातानुकूलित जिल्हा परिषद शाळा सुरू
4

Sindhudurg : सिंधुदुर्गात राज्यातील पहिली वातानुकूलित जिल्हा परिषद शाळा सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.